Mumbai : गोरेगाव मुलुंड जोड मार्गाच्या जुळया बोगद्याच्या कामाला जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरुवात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग (जीएमएलआर) प्रकल्पाच्या टप्पा ३ - ब अंतर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात येत असलेल्या जुळ्या बोगद्यांच्या बांधकामासाठी बोगदा खनन संयंत्रा (टीबीएम) चे सुटे भाग ‘शाफ्ट’मध्ये जोडण्‍याचे कामकाज गतीने सुरू आहे. पहिल्‍या बोगदा खनन संयंत्राच्‍या जोडणीचे काम जून महिन्‍याच्‍या दुस-या आठवड्यापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. तर, दुस-या बोगदा खनन संयंत्राच्‍या जोडणीचे काम समांतरपणे वेगाने सुरू आहे.



महापालिका अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी या कामकाजाची आकस्मिक पाहणी केली . पहिल्‍या बोगदा खणन संयंत्राची संपूर्ण यंत्रणा प्रकल्‍पस्‍थळी स्थापित केल्यानंतर तिची कार्यक्षमता, सुरक्षितता आणि सर्व प्रणालींचे एकत्रित कार्य योग्यरित्या होत आहे की नाही, याची प्रत्यक्ष तपासणीसाठी प्रकल्‍पस्थळ स्वीकृती चाचणी करण्‍यात येईल. यात प्रामुख्‍याने यांत्रिक, विद्युत, हायड्रॉलिक, नियंत्रण व सुरक्षा प्रणालींची तपासणी करण्यात येईल. सर्व चाचण्या निर्धारित निकषांनुसार समाधानकारक आढळल्यावर प्रत्‍यक्षात बोगदा खोदकामास सुरूवात केली जाईल.



गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंड येथे खिंडीपाडा पर्यंत जुळा व भूमिगत बोगदा बांधण्‍यात येणार आहे. एकमेकांना समांतर असे हे जुळे बोगदे प्रत्‍येकी ४.७० किलोमीटरचे आहेत. या समांतर बोगद्यांचा व्यास १४.२० मीटर तर संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य परिसरात १३ मीटरचा आहे. निर्धारित वेळापत्रकानुसार दोन्‍ही बोगद्यांचे खोदकाम सुरू करून ऑक्‍टोबर २०२८ पूर्वी बोगद्यांचे खोदकाम पूर्ण करण्‍याचे उद्दिष्‍टय डोळयासमोर ठेवण्‍यात आले आहे. एकूणच, डिसेंबर २०२८ पर्यंत प्रकल्‍प पूर्ण करण्‍यासाठी महानगरपालिका प्रयत्‍नशील आहे, असे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Kolhapur Vaibhavwadi Railway Line :कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्ग दोन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन

मंत्री नितेश राणे; ऑक्टोबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजनासाठी प्रयत्न मुंबई (सुहास शेलार)

Vinayak Raut : विनायक राऊत यांच्या सुनेच्या छळ प्रकरणात न्यायालयात धक्कादायक खुलासे

- संशयित बाबाच्या दर्ग्यातून लिंबू, टाचण्या, सुगंधी द्रव्ये जप्त; अघोरी कृत्यांचा पोलिसांचा दावा मुंबई : उबाठा

Devendra Fadnavis : २६/११ हल्ल्याबाबत आर. व्ही. एस. मणी यांचे दावे धक्कादायक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी मुंबई : मुंबईवर झालेल्या २६/११ च्या भीषण

Chandrashekhar Bawankule : दुबार पेरणीचा खर्च आता सरकार उचलणार

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती; 'डीपीडीसी'मधून खर्चाची तरतूद करणार मुंबई : पावसाने ओढ दिल्याने आणि

Ashish Shelar : दरवर्षी नाट्यगृहांच्या भाड्यात केवळ 1 ते 2 टक्के वाढ

• कोविडपूर्वीचाच मूळ दर आधारभूत मानणार • नाट्यसृष्टीच्या गोडाऊन व वाहनतळाच्या प्रश्नासाठी महिनाभरात

Navnath Ban : संजय राऊत, इतरांकडे पाहण्यापेक्षा अडगळीत पडलेल्या उबाठाकडे लक्ष द्या - नवनाथ बन

मुंबई : नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले "जनाब संजय राऊत