Mumbai: अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसाला आहे .स्टार फलंदाज विराट कोहली दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाल्याने, त्याच्या जागी ऋतुराज गायकवाडला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बीसीसीआयने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नसली, तरी क्रिकेट वर्तुळात ऋतुराजला संधी देण्यात यावी अशी चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विराट कोहलीला हॅमस्ट्रिंगची गंभीर दुखापत झाल्याने तो संघातून बाहेर झाला आहे. या प्रकारच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरण्यासाठी साधारणता ३ ते ८ आठवडे लागू शकतात. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत त्याचा सहभाग होऊ सकत नाही अस म्हटलं जात आहे. दरम्यान, कोहलीच्या अनुपस्थितीत ऋतुराज गायकवाडला संधी देण्यात येऊ शकते. मात्र, ऋतुकाज गायकवाडला श्रीलंका दौऱ्यासाठी इंडिया A संघाचा उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. इंडिया विरुद्ध अफगानिस्थानच्या वनडे मालिकेची सुरुवात १३ जूनपासून होणार आहे. सलामीवीर आणि मधल्या फळीत फलंदाजी करण्याची क्षमता असल्याने तो संघ व्यवस्थापनासाठी योग्य पर्याय ठरू शकतो.
रजत पाटीदारलाही मिळू शकते संधी
ऋतुराज भारतीय संघात दाखल झाल्यास इंडिया ‘A’ संघात त्याची जागा रजत पाटीदार घेऊ शकतो. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करून चर्चेत आलेल्या पाटीदारने अलीकडेच आपल्या नेतृत्वाखाली संघाला यश मिळवून दिले आहे. त्यामुळे विराटच्या जागी त्यालाही संधी देण्यात येऊ शकते असं मानलं जात आहे.
बीसीसीआयच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
सध्या बीसीसीआयकडून विराटच्या दुखापतीबाबत अधिकृत वैद्यकीय अहवाल जाहीर झाला आहे. मात्र, जर तो मालिकेबाहेर गेला तर भारतीय संघाच्या फलंदाजी क्रमात मोठा बदल होणार हे निश्चित आहे. अशा परिस्थितीत ऋतुराज गायकवाडला मिळणारी संधी त्याच्या आंतरराष्ट्रीय करियकसाठी महत्त्वाचा टप्पा ठरू शकते.