Surat ST Bus Accident : गुजरातमध्ये भीषण एसटी अपघातात ७ जणांचा होरपळून मृत्यू तर ४१ प्रवासी जखमी; जाणून घ्या नेमका कसा घडला अपघात

सुरत : गुजरातमधील सुरत जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) दोन बसमध्ये झालेल्या भीषण अपघाताने मोठी दुर्घटना घडली. बारडोलीजवळ धुळे महामार्गावर समोरासमोर झालेल्या या धडकेत आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला असून ४१ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातानंतर लागलेल्या आगीमुळे अनेक प्रवासी गंभीररित्या भाजले गेले. मृतांची अवस्था इतकी विदारक आहे की, त्यांपैकी केवळ एका व्यक्तीची ओळख पटली असून उर्वरित मृतांची ओळख डीएनए चाचणीद्वारे निश्चित करावी लागणार आहे. (Surat ST Bus Accident)



अपघात नेमका कसा घडला?


मिळालेल्या माहितीनुसार, उवा गावाजवळ रस्त्यावर पाण्याचा टँकर पलटी झाला होता. त्याचवेळी धुळे आगाराची एसटी बस सुरतकडे जात होती. टँकर पलटी झाल्याची माहिती चालकाला वेळेत न मिळाल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. परिस्थिती सावरण्यासाठी चालकाने बस वळविण्याचा प्रयत्न केला; मात्र बस थेट महामार्गाच्या विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये गेली. याच वेळी समोरून येणारी सुरत-जामनेर एसटी बस त्या मार्गावरून जात होती. दोन्ही बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेनंतर सुरत-जामनेर बस रस्त्यालगतच्या पाटात कोसळली आणि काही क्षणांतच तिला आग लागली. त्यामुळे बसमधील प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी फारसा वेळ मिळाला नाही. (Surat ST Bus Accident)



मृतांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी :


बारडोली येथील सरदार शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भावेश पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या सात जणांपैकी फक्त एका व्यक्तीची ओळख पटली आहे. तो सुरत-जामनेर बसचा चालक असल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित सहा मृतदेह आगीत पूर्णपणे जळाल्याने त्यांची ओळख पटवणे अत्यंत कठीण झाले आहे. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांचे डीएनए नमुने घेऊन त्यांची तुलना करण्यात येणार आहे. नातेवाईक बारडोली येथे पोहोचल्यानंतर त्यांच्या नमुन्यांच्या आधारे मृतांची ओळख निश्चित करण्याची प्रक्रिया पार पडणार आहे. (Surat ST Bus Accident)



जखमींवर उपचार सुरू :


अपघातातील ४१ जखमींना तातडीने विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक प्रशासन, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य राबवले. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर बसमधील अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. (Surat ST Bus Accident)



मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला शोक :


या भीषण दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृतांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांनी राज्य सरकार मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी जखमी प्रवाशांना आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार आणि मदत पुरविण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच महाराष्ट्र एसटी प्रशासन, जळगाव जिल्हा प्रशासन आणि सुरत जिल्हा प्रशासन यांच्यात सतत समन्वय सुरू असून मदतकार्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Surat ST Bus Accident)


दरम्यान, या अपघातामुळे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून दुर्घटनेमागील नेमकी कारणे आणि संभाव्य निष्काळजीपणाचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू करण्यात आला आहे. (Surat ST Bus Accident)

Comments
Add Comment

Mark Zuckerberg : पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ काढणं मेटाला महागात पडणार? मार्क झुकरबर्गना संसदीय समितीचा ३ दिवसांचा अल्टिमेटम; “माफी मागा अन्यथा…”

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा एक महत्त्वाचा व्हिडिओ काही तासांसाठी फेसबुकवरून (Facebook)

भारतीय रेल : दिल्ली-पटना-हावडा मार्गावरील ८४५ गाड्यांचे वेळापत्रक बदलले; ३३८ गाड्या रद्द, तर ३८४ मार्गात बदल

नवी दिल्ली : तुम्ही येत्या काही दिवसांत रेल्वेने प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत

Manipal health share price : मणिपाल हेल्थचे शेअर बाजारात धमाकेदार पदार्पण! IPO च्या किमतीपेक्षा ११% प्रिमियमवर लिस्टिंग

बंगळुरू : प्रायमरी मार्केटमध्ये चांगला प्रतिसाद मिळवल्यानंतर 'मणिपाल हेल्थ एंटरप्रायझेस' (Manipal Health Enterprises) या

Father kills pregnant daughter : गर्भवती लेकीची वडिलांकडून नदीत बुडवून हत्या; हत्येचा व्हिडिओ बनवून दाखल केली खोटी तक्रार

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातून (Uttar Pradesh) अनैतिक गैरप्रतिष्ठेतून जन्मदात्या बापानेच लेकीचा बळी घेतल्याची एक सुन्न

Central Railway : पुरुषांनो लक्ष द्या! महिलांच्या डब्यात पाय ठेवला तर दंड अन् थेट... मध्य रेल्वेचा मोठा निर्णय!

मुंबई : रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची सुरक्षितता आणि त्यांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी मध्य

Heavy Rain India : देशभरात मुसळधार पावसाचा कहर; झारखंड-उत्तर प्रदेशात वीज कोसळून 16 जणांचा मृत्यू

Heavy Rain India : देशातील अनेक राज्यांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसासोबत वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी जीवितहानी