सुरत : गुजरातमधील सुरत जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) दोन बसमध्ये झालेल्या भीषण अपघाताने मोठी दुर्घटना घडली. बारडोलीजवळ धुळे महामार्गावर समोरासमोर झालेल्या या धडकेत आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला असून ४१ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातानंतर लागलेल्या आगीमुळे अनेक प्रवासी गंभीररित्या भाजले गेले. मृतांची अवस्था इतकी विदारक आहे की, त्यांपैकी केवळ एका व्यक्तीची ओळख पटली असून उर्वरित मृतांची ओळख डीएनए चाचणीद्वारे निश्चित करावी लागणार आहे. (Surat ST Bus Accident)
अपघात नेमका कसा घडला?
मुंबई : चेंबूरमधील माहुल येथील प्रकल्पग्रस्तांच्या वसाहतीसाठी उभारण्यात आलेल्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या (एसटीपी) देखभालीकडे मुंबई ...
मृतांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी :
बारडोली येथील सरदार शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भावेश पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या सात जणांपैकी फक्त एका व्यक्तीची ओळख पटली आहे. तो सुरत-जामनेर बसचा चालक असल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित सहा मृतदेह आगीत पूर्णपणे जळाल्याने त्यांची ओळख पटवणे अत्यंत कठीण झाले आहे. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांचे डीएनए नमुने घेऊन त्यांची तुलना करण्यात येणार आहे. नातेवाईक बारडोली येथे पोहोचल्यानंतर त्यांच्या नमुन्यांच्या आधारे मृतांची ओळख निश्चित करण्याची प्रक्रिया पार पडणार आहे. (Surat ST Bus Accident)
जखमींवर उपचार सुरू :
अपघातातील ४१ जखमींना तातडीने विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक प्रशासन, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य राबवले. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर बसमधील अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. (Surat ST Bus Accident)
सुरत : गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील बारडोली जवळून जाणाऱ्या धुळे हायवेवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या दोन एसटी बसचा अत्यंत थरकाप उडवणारा भीषण ...
मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला शोक :
दरम्यान, या अपघातामुळे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून दुर्घटनेमागील नेमकी कारणे आणि संभाव्य निष्काळजीपणाचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू करण्यात आला आहे. (Surat ST Bus Accident)