Government Employees: सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता ‘स्वग्राम’ बदलण्यासाठी मिळणार अतिरिक्त संधी





 महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने 'स्वग्राम' (Swagram) बदलण्यासंदर्भातील नियमांमध्ये सुधारणा करत कर्मचाऱ्यांना अतिरिक्त संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विवाह, कौटुंबिक कारणे, स्थलांतर किंवा इतर वैयक्तिक अडचणींमुळे स्वग्राम बदलण्याची गरज असलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

यापूर्वी शासकीय सेवेत रुजू झाल्यानंतर पहिल्या 6 महिन्यांच्या आत कर्मचाऱ्यांना स्वग्राम घोषित करणे बंधनकारक होते. एकदा स्वग्राम निश्चित केल्यानंतर सेवाकाळात केवळ एकदाच त्यामध्ये बदल करण्याची परवानगी दिली जात होती. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना बदललेल्या परिस्थितीनुसार स्वग्राम बदलता येत नव्हता.

विशेषतः महिला कर्मचाऱ्यांना या नियमाचा अधिक फटका बसत होता. विवाहानंतर राहण्याचे ठिकाण बदलूनही अनेकांना अधिकृत नोंदींमध्ये बदल करता येत नव्हता. परिणामी काही शासकीय सुविधा आणि सवलतींचा लाभ घेण्यात अडचणी निर्माण होत होत्या.





नवीन निर्णयानुसार, विवाह, घटस्फोट, वैधव्य, पुनर्विवाह किंवा परित्यक्ता अशा विशेष परिस्थितींमध्ये महिला कर्मचाऱ्यांना स्वग्राम बदलण्याची अतिरिक्त संधी उपलब्ध होणार आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांनी यापूर्वी स्वग्राम घोषित करून एकदा बदल केला आहे, त्यांनाही आणखी एकदा बदल करण्याची संधी मिळणार आहे.

सुधारित नियमांनुसार, नियुक्तीनंतर ६ महिन्यांच्या आत स्वग्राम घोषित करणे आवश्यक राहणार आहे. मात्र त्यानंतर बदलासाठी अधिकृत अर्ज करावा लागेल. संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याची मंजुरी मिळाल्यानंतरच बदलाची नोंद सेवापुस्तकात करण्यात येणार आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे हजारो सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अडचणी दूर होण्याची अपेक्षा आहे. विशेषतः महिला कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय मोठा दिलासा देणारा ठरत असून सेवासुविधांचा लाभ घेणे आता अधिक सोपे होणार आहे.




 



Comments
Add Comment

Ketan Agrawal Murder Case : 'मला त्याला स्लो पॉयझन देऊन मारायचं होतं..';केतन हत्याकांड प्रकरणातील 'त्या' गुप्त कटामागचा मास्टरमाइंड कोण?

केतन अग्रवाल हत्याकांडात धक्कादायक दावा; 'स्लो पॉयझन' देण्याचाही कट असल्याची तपासात चर्चा पुणे : केतन

Minister Radhakrishna Vikhe Patil : मतदार यादीत घुसखोरांना जागा नाही ; पुनरिक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी पुढे या : ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar (Shevgaon) : मतदार यादीची सखोल पुनरिक्षण मोहीम भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.सरकारी स्तरावर काम सुरू असले

Wardha Murder : वर्ध्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! 12 वर्षांच्या मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; नराधमांनी ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा

वर्धा : वर्धा  (wardha) जिल्ह्यातील रोठा गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली

Pune Metro : पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला नवा मुहूर्त; वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका!

पुणे : पुण्यातील ट्रॅफिक जॅम, विशेषतः हिंजवडी आयटी पार्क परिसरात होणाऱ्या रोजच्या वाहतूक कोंडीने त्रस्त

Arnala Beach : अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर दुर्दैवी घटना! चौघेजण पोहायला गेले अन् काळाने घात घातला; दोन जण बेपत्ता

 पोहायला गेलेले चार मित्र समुद्रात वाहून गेले, दोघांची सुटका तर दोघांचा शोध सुरू पालघर : पावसाळ्यात

Pune Accident : पंढरपूरच्या वाटेवर काळाचा थरकाप उडवणारा अपघात; वारकऱ्याचा जागीच मृ्त्यू

बारामती : जेजुरीतील भीषण अपघाताची (Accident) घटना ताजी असतानाच पुणे (Pune) जिल्ह्यात वारीदरम्यान आणखी एक दुर्दैवी अपघात