Government Employees: सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता ‘स्वग्राम’ बदलण्यासाठी मिळणार अतिरिक्त संधी





 महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने 'स्वग्राम' (Swagram) बदलण्यासंदर्भातील नियमांमध्ये सुधारणा करत कर्मचाऱ्यांना अतिरिक्त संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विवाह, कौटुंबिक कारणे, स्थलांतर किंवा इतर वैयक्तिक अडचणींमुळे स्वग्राम बदलण्याची गरज असलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

यापूर्वी शासकीय सेवेत रुजू झाल्यानंतर पहिल्या 6 महिन्यांच्या आत कर्मचाऱ्यांना स्वग्राम घोषित करणे बंधनकारक होते. एकदा स्वग्राम निश्चित केल्यानंतर सेवाकाळात केवळ एकदाच त्यामध्ये बदल करण्याची परवानगी दिली जात होती. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना बदललेल्या परिस्थितीनुसार स्वग्राम बदलता येत नव्हता.

विशेषतः महिला कर्मचाऱ्यांना या नियमाचा अधिक फटका बसत होता. विवाहानंतर राहण्याचे ठिकाण बदलूनही अनेकांना अधिकृत नोंदींमध्ये बदल करता येत नव्हता. परिणामी काही शासकीय सुविधा आणि सवलतींचा लाभ घेण्यात अडचणी निर्माण होत होत्या.





नवीन निर्णयानुसार, विवाह, घटस्फोट, वैधव्य, पुनर्विवाह किंवा परित्यक्ता अशा विशेष परिस्थितींमध्ये महिला कर्मचाऱ्यांना स्वग्राम बदलण्याची अतिरिक्त संधी उपलब्ध होणार आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांनी यापूर्वी स्वग्राम घोषित करून एकदा बदल केला आहे, त्यांनाही आणखी एकदा बदल करण्याची संधी मिळणार आहे.

सुधारित नियमांनुसार, नियुक्तीनंतर ६ महिन्यांच्या आत स्वग्राम घोषित करणे आवश्यक राहणार आहे. मात्र त्यानंतर बदलासाठी अधिकृत अर्ज करावा लागेल. संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याची मंजुरी मिळाल्यानंतरच बदलाची नोंद सेवापुस्तकात करण्यात येणार आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे हजारो सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अडचणी दूर होण्याची अपेक्षा आहे. विशेषतः महिला कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय मोठा दिलासा देणारा ठरत असून सेवासुविधांचा लाभ घेणे आता अधिक सोपे होणार आहे.




 



Comments
Add Comment

Agriculture Minister Dattatray Bharne : पेरणीची घाई करू नका!

 कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन; खरीप पूर्वतयारीसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत सुविधा केंद्र

Wedding Invitations : बालविवाहाच्या कुप्रथेला आळा घालण्यासाठी सरकारची मोठी पावले: लग्नपत्रिकेवर जन्मतारीख छापणे होणार अनिवार्य

मुंबई : राज्यातील बालविवाहाची (Child Marriage) प्रथा पूर्णपणे बंद करण्यासाठी आणि अल्पवयीन मुलींचे लग्न लावून देणाऱ्या

Vilas Ghule Murder Case: विलास घुले खून प्रकरणात पोलिसांची धडक कारवाई, सर्व ९ आरोपी ताब्यात

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज (Kej) तालुक्यातील टाकळी फाटा येथील हॉटेल चालक विलास घुले यांच्या हत्या (Murder) प्रकरणात

Farmer loan waive : कर्जमाफी अन् अनुदानातील अडथळे दूर होणार; संबंधित विभागांना तातडीने बैठकांचे आदेश

मुंबई : राज्यातील शेतकरी कर्जमाफी (Farmer loan waive), प्रोत्साहन अनुदान आणि ओटीएस (वन टाईम सेटलमेंट) योजनांच्या

Raigad Fort : दरड कोसळल्याने रायगड किल्ल्याचा पायरी मार्ग २५ जूनपर्यंत बंद

रायगड : अतिवृष्टीमुळे किल्ले रायगडावरील (Raigad Fort) महादरवाजा परिसरात दरड कोसळल्याने किल्ल्यावर जाणारा पायरी मार्ग

Maharashtra wedding card new rule : लग्न ठरलंय? मग हा नवा नियम जाणून घ्या; पत्रिकेत द्यावी लागणार 'ही' महत्त्वाची माहिती

बालविवाह रोखण्यासाठी सरकारचा नवा फॉर्म्युला; लग्नपत्रिकेत होणार मोठा बदल महाराष्ट्रात बालविवाह (Child Marriage)