Borivali Bribery Case: दंड कमी करण्यासाठी ५ हजारांची लाच मागितली; आरटीओ कर्मचाऱ्याला ACB ने रंगेहात पकडलं

मुंबईतील बोरिवली (Boriwali) प्रादेशिक परिवहन कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अटक (Arrest) केली आहे. दंडाची रक्कम कमी करून देण्याच्या मोबदल्यात लाच मागितल्याचा आरोप संबंधित कर्मचाऱ्यावर आहे. या कारवाईमुळे परिवहन विभागात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या खासगी बसवर वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी २६,५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. दंडाची रक्कम कमी करण्यासाठी तक्रारदाराने बोरिवली येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात संपर्क साधला होता. कनिष्ठ लिपिक मिथुन विलास आडे असं लाच घेतलेल्या लिपिकाचे नाव आहे.

यावेळी कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने दंड कमी करून देण्यासाठी ५,००० रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.



तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने प्राथमिक पडताळणी केली. चौकशीत संबंधित कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सापळा रचण्यात आला. यावेळी आरोपीने ५ हजार रुपयांपैकी ४ हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती.

सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई करत संबंधित कर्मचाऱ्याला ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. त्यानंतर त्याच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला.

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून सरकारी कामासाठी कोणत्याही प्रकारची लाच मागितल्यास नागरिकांनी तत्काळ तक्रार करण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे. ही कारवाई प्रशासनातील भ्रष्टाचाराविरोधातील आणखी एक महत्त्वाचे पाऊल मानली जात आहे.
Comments
Add Comment

Sindhu Mahakumbh : सिंधू महाकुंभाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेशाचा महाराष्ट्रात गौरव; राज्यपालांच्या हस्ते इंद्रेश कुमार आणि पाल्गा रिंपोचे यांचा सन्मान

मुंबई : लडाख येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सिंधू महाकुंभ (Sindhu Mahakumbh) उपक्रमाने राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक

Analog Paneer : पनीरच्या ३२ टक्के नमुन्यांमध्ये भेसळ, 'ॲनालॉग पनीर'मध्ये वनस्पती चरबीचा वापर

मुंबई : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बाजारपेठेतून घेतलेल्या पनीरच्या नमुन्यांपैकी तब्बल ३२ टक्के नमुने

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतला करंजा मत्स्य बंदर प्रकल्पाचा आढावा

- ४ हजार ५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता; अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर

Central Railway New Rule : 'धूम्रपान ते फेरीवाले…' रेल्वेत गैरप्रकार करणाऱ्यांची खैर नाही; रेल्वे कायद्यात झाले 'हे' मोठे बदल

मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! रेल्वे कायदा, १९८९ मधील अनेक तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आल्या

Maharashtra Rojgar Melava 2026 : महाराष्ट्रातील तरुणांसाठी मोठी संधी! राज्यात होणार १ हजार रोजगार मेळावे; मंत्री मंगलप्रभात लोढांचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई : राज्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व

Nitesh Rane : रत्नागिरीला मिळणार जागतिक ओळख! भगवती बंदरात अत्याधुनिक क्रुझ टर्मिनलला गती; पर्यटन, रोजगाराला मोठी चालना

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील भगवती बंदर (Bhagwati Port) येथे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक क्रुझ टर्मिनल (cruise terminal)