KERALA : मान्सून केरळच्या उंबरठ्यावर

पुढील २४ ते ४८ तासांत धडकणार, महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचा 'यलो अलर्ट'
पुणे : कडाक्याच्या उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांसाठी अखेर दिलासादायक बातमी आहे. संपूर्ण देश ज्या क्षणाची चातकासारखी वाट पाहत होता, तो क्षण आता अगदी जवळ आला असून पुढील २४ ते ४८ तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनच्या आगमनासाठी केरळमध्ये सध्या परिस्थिती अत्यंत पोषक बनली आहे.


गेल्या महिन्यात १६ तारखेला अंदमानमध्ये पोहोचल्यानंतर, तब्बल १८ दिवसांचा प्रवास करून मान्सून आता केरळ किनारपट्टीवर धडकेल. यंदा मान्सून आपल्या नियमित वेळेपेक्षा सुमारे ४ दिवस उशिराने दाखल होत असला, तरी त्याच्या आगमनामुळे बळीराजासह सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.



केरळमध्ये मान्सून दाखल होत असला, तरी महाराष्ट्रात मुख्य मान्सून पोहोचण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. मात्र, मान्सून केरळच्या उंबरठ्यावर असतानाच महाराष्ट्रात मान्सूनपूर्व (प्री-मान्सून) पावसाचा जोर वाढणार आहे. सध्या राज्याच्या अनेक भागांत ढगाळ वातावरण तयार झाले असून, लवकरच दमदार पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


यंदा देशात किती पाऊस पडणार?
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, यंदा देशात ८६ ते ९४ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. शास्त्रज्ञांच्या मते, दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत हा पाऊस सुमारे ९० टक्के असू शकतो. सद्यस्थितीत अरबी समुद्रासह लक्षद्वीप आणि तामिळनाडूच्या काही भागांतही मान्सून पुढे सरकण्यासाठी वातावरण अनुकूल झाले आहे. साधारणपणे मान्सून १ जून रोजी केरळमध्ये येतो, मात्र यंदा तो ४ जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज आहे.



विजांच्या कडकडाटासह पाऊस
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज आणि उद्या महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना मान्सूनपूर्व पावसाचा 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. मुख्य मान्सून येण्यापूर्वीच राज्याच्या विविध भागांत पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसामुळे राज्यातील उष्णतेची लाट ओसरण्यास मोठी मदत होईल.

Comments
Add Comment

Jejuri Accdent : जेजुरी दुर्घटनेनंतर वारीत आणखी एक अपघात; अहिल्यानगरात भरधाव पिकअपने वारकऱ्याला उडवले

पुणे : पुण्यातील जेजुरीजवळ (Jejuri) ज्ञानेश्वर माऊलींच्या दिंडीत झालेल्या भीषण अपघाताची (Accident) घटना ताजी असतानाच वारीत

Political News : शासकीय जयंती कार्यक्रमांच्या यादीत स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचा समावेश करा; भुजबळ-मुश्रीफ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) ज्येष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि

Ketan Agrawal Murder : 'माझ्या मुलाला न्याय द्या', पुणे व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या आईचे पंतप्रधान मोदींना भावनिक पत्र

पुणे : पुण्यात हत्या (Murder) झालेल्या रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या आई राखी अग्रवाल यांनी पंतप्रधान

शेतकरी कर्जमाफी योजनेत आणखी २३ लाख शेतकरी पात्र, निकषांत सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी; नियमित कर्ज परतफेडीची अटही शिथिल

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत

Cabinet meeting : मंत्रिमंडळ बैठक संपन्न ! शेतकऱ्यांपासून ते परिवहन मंडळापर्यंत सरकारने घेतले 'हे' मोठे निर्णय

Cabinet meeting : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज (१४ जुलै) राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक

Vegetable Price Hike : पावसाचा फटका! राज्यात भाजीपाल्याचे दर दुप्पट; सर्वसामान्यांच्या खिशाला बसली कात्री

मुंबई: राज्यात मागील काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले असून बाजारात आवक