अमृता फडणवीसांनी चालवली गुलाबी ई-रिक्षा; महिलांच्या सक्षमीकरणासाठी नव्या उपक्रमाची सुरुवात

मुंबई  : जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी महाराष्ट्रात विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी गुलाबी ई-रिक्षा (E Riksha) चालवत या मोहिमेला पाठिंबा दर्शवला.



मुंबईत आयोजित कार्यक्रमात महिलांसाठी खास तयार करण्यात आलेल्या गुलाबी ई-रिक्षांचे लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश कमी उत्पन्न गटातील महिलांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांना शाश्वत रोजगार उपलब्ध करून देणे हा आहे. यासोबतच प्रदूषणमुक्त वाहतुकीलाही प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.



कार्यक्रमादरम्यान अमृता फडणवीस यांनी महिला लाभार्थींशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, ई-रिक्षा हा केवळ वाहतुकीचा पर्याय नसून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाचे साधन ठरू शकतो. या माध्यमातून महिलांना स्वतःचे उत्पन्न मिळवण्याची संधी उपलब्ध होणार आहे.



या योजनेअंतर्गत पात्र महिलांना ई-रिक्षा खरेदीसाठी आर्थिक मदत दिली जात आहे. बँकांकडून मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून दिले जाते, तर शासनाकडूनही आर्थिक सहाय्य दिले जाते. काही स्वयंसेवी संस्था देखील लाभार्थींना आवश्यक निधी उभारण्यासाठी मदत करत आहेत.





मुंबईत पुढील काळात १,००० गुलाबी ई-रिक्षा रस्त्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे महिलांना रोजगार मिळण्याबरोबरच शहरातील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासही मदत होणार आहे.


पर्यावरण संवर्धन आणि महिला सक्षमीकरण या दोन्ही उद्दिष्टांना एकत्र जोडणाऱ्या या उपक्रमाचे अनेक स्तरांतून स्वागत होत आहे. सोशल मीडियावरही या कार्यक्रमाची चर्चा रंगली असून अमृता फडणवीस यांच्या सहभागाचे कौतुक केले जात आहे.

Comments
Add Comment

Water Storage in Mumbai : जुलैच्या सरींकडे मुंबईकरांच्या नजरा खिळल्या, तलावांत केवळ ८.५ टक्के पाणीसाठा; २० ऑगस्टपर्यंत पुरेल पाणी

मुंबई  : मुंबईत मंगळवारपासून पुढील तीन दिवस पाऊस पडेल. मात्र, हा पाऊस पडला तरी तो ३० जूनपर्यंत या संपूर्ण

IAS Transfer : पी. वेलरासू यांच्यासह तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारने सोमवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि महापारेषणमधील

Chandrakant Patil : पॉलीटेक्निक प्रवेश अर्जासाठी 2 जुलैपर्यंत मुदतवाढ; 1.45 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी

 उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील मुंबई,  : प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी (पॉलीटेक्निक)

Monsoon Update : मान्सूनच्या प्रगतीमुळे राज्यात आनंदाचे वातावरण

मुंबई : बहुप्रतिक्षित मान्सूनने अखेर दोन आठवड्यांच्या विलंबानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात पुढे वाटचाल सुरू

Temple Endowment Law : नवा देवस्थान इनाम जमीन कायदा सर्वंकष न्याय देणारा असेल, महसूलमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई : राज्यातील देवस्थान इनाम जमिनींचे संवर्धन करण्यासह वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले समस्या मार्गी

Bangladeshi infiltrators : अडीच वर्षांत महाराष्ट्रातून ३ हजार ५४१ बांगलादेशी घुसखोरांची हकालपट्टी

मुंबई : वर्ष २०२४ पासून आजपर्यंत म्हणजेच गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रातून