Majhi Kanya Bhagyashree Yojana : राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या जन्मदरात वाढ करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून विविध योजना राबवण्यात येत आहेत. यामध्ये ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ ही एक महत्त्वाची योजना असून, या माध्यमातून मुलींना आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या योजनेमुळे मुलींच्या शिक्षणाला चालना मिळत असून त्यांचे भविष्य अधिक सुरक्षित करण्यावर भर दिला जात आहे.
मुलींचा जन्मदर वाढवणे, त्यांच्या शिक्षणाला बळ देणे आणि समाजाचा दृष्टिकोन बदलणे या उदात्त हेतूने सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत सरकारकडून थेट ५० हजार रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जात आहे. विशेष म्हणजे, केवळ एकच नाही तर दोन मुली असलेल्या कुटुंबांनाही या योजनेचा मोठा फायदा मिळत आहे.
मुंबई : वाढत्या वीज दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसत असताना केंद्र सरकारची PM Surya Ghar Yojana लाखो कुटुंबांसाठी दिलासादायक ठरत आहे. ...
काय आहे ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ ?
‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून, १ एप्रिल २०१६ रोजी तिची सुरुवात करण्यात आली. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या संगोपन व शिक्षणासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणे.
आर्थिक लाभ आणि विमा संरक्षण
या योजनेअंतर्गत मुलगी आणि आईच्या संयुक्त नावाने बँक खाते उघडले जाते. या खात्यावर एक लाख रुपयांपर्यंत अपघात विमा आणि पाच हजार रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्टची सुविधा दिली जाते. मुलीच्या जन्मानंतर पालकांनी नसबंदी केल्यास ५० हजार रुपयांची मदत दिली जाते. तसेच दोन मुलींनंतर नसबंदी केल्यास दोन्ही मुलींच्या नावाने प्रत्येकी २५ हजार रुपये जमा केले जातात.
योजनेसाठी कोण पात्र ?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. कुटुंबाकडे आवश्यक कागदपत्रे असणे बंधनकारक आहे. अर्ज करताना आधार कार्ड, बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी पुरावा, मोबाईल क्रमांक आणि मुलीचे जन्म प्रमाणपत्र आवश्यक असते. तिसरे अपत्य असले तरी या योजनेचा लाभ केवळ दोन मुलींपर्यंतच मर्यादित आहे.
Ramai Awas Yojana : राज्य सरकारने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ‘रमाई आवास (घरकुल) गृहनिर्माण योजना’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती ...
योजनेसाठी अटी काय ?
योजनेतील विमा लाभ मिळवण्यासाठी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच ती दहावी उत्तीर्ण आणि अविवाहित असावी लागते. दुसऱ्या प्रसुतीवेळी जुळ्या मुली जन्माला आल्यास त्या दोघींनाही योजनेचा लाभ दिला जातो. बालगृहातील अनाथ मुली आणि दत्तक घेतलेल्या मुलींनाही या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे.
अर्ज कुठे आणि कसा कराल ?
या योजनेसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा लागतो. महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज डाउनलोड करून आवश्यक कागदपत्रांसह महिला व बाल विकास विभागाकडे जमा करावा लागतो. अधिक माहितीसाठी संबंधित विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुलींच्या सक्षमीकरणाकडे मोठे पाऊल
‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ ही केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नसून मुलींच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाचा उपक्रम ठरत आहे. या योजनेमुळे समाजात मुलींच्या जन्माबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत होत आहे.