भारताने आरोग्य क्षेत्रात गेल्या काही दशकांत महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. कुपोषण, माता व बालमृत्यू दर कमी झाले असून आयुर्मानही वाढले आहे. मात्र, या प्रगतीसोबतच लठ्ठपणा आणि मधुमेह यांसारख्या जीवनशैलीजन्य आजारांचे प्रमाण वाढत असून नवीन आरोग्य आव्हाने निर्माण झाली आहेत.
भारताने पूर्वीच्या कुपोषण, माता आरोग्य आणि बालकांच्या आरोग्य क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. पूर्वी सरासरी आयुर्मान केवळ ३५ ते ४० वर्षे इतके होते, मात्र आज वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती, डॉक्टरांचे प्रयत्न आणि विविध रोगांवरील प्रभावी औषधांमुळे ते वाढून सुमारे ७० वर्षांपर्यंत पोहोचले आहे; काही व्यक्तींचे आयुर्मान ८० ते ९० वर्षांपर्यंतही दिसून येते. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण २०२३-२४ च्या अहवालानुसार बालकांचे कुपोषण आणि मातांच्या आरोग्य स्थितीत सकारात्मक सुधारणा झाल्याची नोंद आहे. तथापि, वाढता लठ्ठपणा आणि मधुमेहाचे वाढते प्रमाण हे नव्या सार्वजनिक आरोग्य आव्हानांपैकी ठरत आहे. या सर्वेक्षणानुसार १४ ते ४९ वयोगटातील महिलांमध्ये ओव्हरवेट आणि लठ्ठपणाचे प्रमाण ३०.७ टक्क्यांपर्यंत वाढले आहे, जे पूर्वीच्या अहवालात २४ टक्के होते. पुरुषांमध्येही हे प्रमाण वाढून २७.३ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. हीच प्रवृत्ती भारतातील बहुतांश राज्यांमध्ये दिसून येते. उदाहरणार्थ, गोव्यात महिलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण ४५.१ टक्के इतके उच्च आहे. यावरून स्पष्ट होते की भारतात आज 'दुहेरी आरोग्य संकट'निर्माण झाले आहे. एकीकडे कुपोषणाचे आव्हान कमी होत असताना दुसरीकडे जीवनशैलीशी संबंधित आजार झपाट्याने वाढत आहे. भारताच्या एका भागात अजूनही कुपोषणाचे गंभीर संकट आहे, तर दुसरीकडे लठ्ठपणा (ओबेसिटी) हे लोकांच्या आरोग्यासमोर मोठे आव्हान बनत आहे.
नवी दिल्ली : भारताच्या अत्याधुनिक आणि जगातील सर्वात वेगवान क्रूझ क्षेपणास्त्रांपैकी एक मानल्या जाणाऱ्या ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र प्रणालीला (Brahmos Missile ...
नवी दिल्ली : भारताच्या अत्याधुनिक आणि जगातील सर्वात वेगवान क्रूझ क्षेपणास्त्रांपैकी एक मानल्या जाणाऱ्या ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र प्रणालीला (Brahmos Missile ...
नवी दिल्ली : भारताच्या अत्याधुनिक आणि जगातील सर्वात वेगवान क्रूझ क्षेपणास्त्रांपैकी एक मानल्या जाणाऱ्या ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र प्रणालीला (Brahmos Missile ...