Sachin Tendulkar : वैभववर दबाव टाकू नका; टीम इंडियातील निवडीवर सचिन तेंडुलकरचे स्पष्ट मत, दिला मोठा सल्ला...

Mumbai : राजस्थान रॉयल्सचा 15 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आयपीएल 2026 मधील आपल्या स्फोटक फलंदाजीमुळे देशभर चर्चेचा विषय झाला आहे. सलग दोन हंगामात दमदार कामगिरी करत त्याने क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे आता त्याला लवकरच भारतीय संघात संधी द्यावी, अशी मागणी जोर धरत असताना भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने याबाबत महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. सचिनचे विधान सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.



नेमकं काय म्हणाला सचिन तेंडुलकर ?


सचिन तेंडुलकरने वैभवच्या नैसर्गिक खेळाचे कौतुक केले. वैभववर अनावश्यक दबाव टाकू नका. तो सध्या जसा खेळतो आहे, तसाच खेळत राहणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्या खेळात हस्तक्षेप करण्याची गरज नाही. तो स्वतःवर विश्वास ठेवतो आणि मैदानात नेमके काय करायचे हे त्याला चांगलंच माहित आहे; असे सचिनने सांगितले.


डोक्यात खूप गोष्टी भरल्या तर समस्या सुरू होतील...


वैभवच्या स्वभावावर बोलताना सचिनने प्रशिक्षक आणि क्रिकेट तज्ज्ञांनाही अप्रत्यक्ष इशारा दिला. जर त्याच्या डोक्यात आतापासूनच खूप गोष्टी भरल्या गेल्या आणि सतत सूचना दिल्या गेल्या, तर समस्या निर्माण होईल. त्याला त्याचा नैसर्गिक खेळ खेळू द्यावा. सचिनने पुढे सांगितले की वैभवकडे केवळ ताकदीने फटके मारण्याची क्षमता नाही, तर मनगटाच्या जोरावर चेंडूला दिशा देण्याचीही कला आहे. चेंडूचा टप्पा आणि दिशा तो अतिशय लवकर ओळखतो, ही त्याची मोठी ताकद आहे, असं सचिनने सांगितले.





टीम इंडियातील संधी बाबत काय म्हणाले ?


वैभवला भारतीय संघात तातडीने स्थान द्यावे का, या प्रश्नावर सचिनने मध्यम भूमिका घेतली. मी निवड समितीचा सदस्य नाही आहे. त्यामुळे त्याच्या निवडीबद्दल थेट भाष्य करणे मला योग्य वाटत नाही. मात्र. प्रत्येक क्रिकेटप्रेमीप्रमाणे मला ही वाटते की तो देशासाठी खेळावा...सचिनने शेवटी वैभवसारख्या युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे सांगितले. अशा प्रतिभेला योग्य पाठिंबा मिळायला हवा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याच्या क्रिकेटचा आनंद घ्या त्याच्यावर अपेक्षांचा दबाव टाकू नका.

आयपीएलमध्ये वैभवची दमदार कामगिरी


यंदाच्या हंगामात वैभवने आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांचे लक्षय वेधून घेतले आहे. अवघ्या 15 व्या वर्षी आयपीएलमध्ये गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत वैभव सूर्यवंशीने अनेक दिग्गजांचे विक्रम मोडले आहेत. त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे तो भारतीय क्रिकेटचा पुढचा सुपरस्टार मानला जात आहे. मात्र, सचिनच्या मते त्याच्या यशाचा खरा मंत्र म्हणजे त्याचा नैसर्गिक खेळ आहे. त्याच्यावर अपेक्षांचा दबाव टाकू नका असं सचिन यावेळी म्हणाला.

Comments
Add Comment

IPL Final वर पावसाचे संकट! अहमदाबादमध्ये यलो अलर्ट; RCB-GT अंतिम सामना रद्द झाला तर कोण ठरणार विजेता?

अहमदाबाद : आयपीएल २०२६ च्या अंतिम लढतीसाठी क्रिकेटप्रेमी सज्ज झाले असतानाच हवामानाने पुन्हा एकदा चिंतेचे ढग

Harmanpreet Kaur: हरमनप्रीत कौरचा ऐतिहासिक पराक्रम! विराट-बाबरच्या एलिट क्लबमध्ये दमदार एन्ट्री

4000 टी-20 धावांचा टप्पा गाठणारी भारताची दुसरी महिला क्रिकेटर... इंग्लंड : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार

Norway Chess Tournament : नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत गुकेशची प्रज्ञानंदावर मात, दिव्या देशमुखची महिला गटात आघाडी

ओस्लो येथे सुरू असलेल्या नॉर्वे बुद्धिबळ २०२६ स्पर्धेच्या पाचव्या फेरीत पुन्हा एकदा रोमांचक सामने पाहायला

Singapure Open : सिंगापूर ओपनमध्ये भारताची दमदार झेप! सात्विक-चिराग अंतिम फेरीत;

जगातील नंबर-1 जोडीचा केला पराभव भारताची स्टार पुरुष दुहेरी जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी

IPL 2026 Final : आज अहमदाबादमध्ये रंगणार महामुकाबला; आरसीबी की गुजरात? दुसऱ्या जेतेपदासाठी दोन्ही संघ सज्ज...

RCB VS GT : आयपीएल (IPL) 2026 च्या अंतिम लढतआज गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात लढत होणार आहे.

IPL 2026 Final : फायनलपूर्वी गुजरात टायटन्सला मोठा झटका! हवामानामुळे अहमदाबादला पोहोचण्यात उशीर

अहमदाबाद (IPL 2026 Final) : आयपीएल २०२६ (IPL 2026) च्या अंतिम सामन्याला अवघे काही तास शिल्लक असताना शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील