Bhiwandi Water : भिवंडीच्या १५ लाख लोकांना २७३ एमएलडी पाणी मिळणार, ४२६ कोटींचा पाणी प्रकल्प

भिवंडी : अमृत अभियान २.० उपक्रमांतर्गत भिवंडी-निझामपूर शहराच्या विस्तारित पाणीपुरवठा योजनेंतर्गत १५ लाख भिवंडीकरांना मुबलक पाणी मिळणार आहे. भिवंडी-निझामपूर शहराच्या विस्तारित पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीकरिता भाडेपट्ट्याने जमीन देण्यासंबंधीचे सर्व अडथळे बृहन्मुंबई महानगरपालिका पुढील १० दिवसांत दूर केले जातील असे आश्वासन बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी दिले, अशी माहिती भिवंडी पूर्वचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी दिली. विशेष म्हणजे, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात झालेल्या आढावा बैठकीला आमदार रईस शेख, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, भिवंडी-निझामपूर महानगरपालिकेचे आयुक्त अनमोल सागर, उपमहापौर तारिक मोमीन, भिवंडी महानगरपालिकेचे पाणीपुरवठा अभियंता संदीप पटनवार यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. या संदर्भात आमदार शेख यांनी सांगितले की, भिवंडी महानगरपालिकेने यापूर्वी मुंबई शहर पाणीपुरवठा प्रकल्पात सहकार्य केले होते. आता, भिवंडी महानगरपालिकेला पाईपलाईनसाठी जमिनीची गरज आहे, जी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मालकीची आहे. जमीन भाडेपट्ट्यावर देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून जमीन भाडेपट्ट्यावर घेताना येणाऱ्या अडथळ्यांवर बैठकीत चर्चा झाली. जमिनीचा प्रस्ताव २५ ऑक्टोबर २०२४ रोजी सादर करण्यात आला.



भिवंडी महानगरपालिकेकडून संयुक्त बैठका, जागेची पाहणी, नकाशे, जमिनीची सीमांकन आणि तांत्रिक दस्तऐवजीकरण पूर्ण झाले आहे. अंतिम प्रशासकीय मंजुरी आणि जमिनीचे हस्तांतरण बाकी आहे. मुंबई महानगरपालिकेने बैठकीत आश्वासन दिले की सर्व अडथळे तात्काळ दूर केले जातील. भिवंडीच्या रहिवाशांच्या पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. नगरपालिका प्रशासन राज्य सरकार, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि संबंधित विभागांशी सातत्याने समन्वय साधत आहे व पाठपुरावा करत आहे. प्रकल्पासाठी ७५% मंजुऱ्या मिळाल्या आहेत. एकदा जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, हा प्रकल्प पुढील दोन वर्षांत पूर्ण होईल.पाणीपुरवठा प्रकल्पाचा अंदाजित खर्च सुमारे ४२६ कोटी रुपये आहे. भिवंडीची संभाव्य १५ लाख ८४ हजार लोकसंख्या लक्षात घेऊन याचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत, पिसे धरण स्रोत, बीएनसी टॅपिंग स्रोत आणि स्टेम पाइपलाइन चॅनलद्वारे भिवंडीला २७३ एमएलडी पाणी पुरवले जाईल. या प्रकल्पात जॅकवेल, ओव्हरहेड पंप हाऊस, जलशुद्धीकरण केंद्रे, जल संतुलन टाक्या, वीज केंद्रे, नद्या व ओढ्यांवरील पूल, पंप हाऊस यांचे बांधकाम आणि सुमारे २४ किलोमीटर लांबीच्या १,३२१ मिमी व्यास व १२ मिमी जाडीच्या स्टील पाईपलाईन टाकण्याचा समावेश आहे.
Comments
Add Comment

Railway : धावत्या रेल्वेत महिलेची प्रसूती, मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांची तत्परता

भुसावळ : मानवी संवेदनशीलता, तत्परता आणि सेवेची भावना जपत मध्य रेल्वेच्या रनिंग स्टाफने धावत्या रेल्वेत एका

Pooja Bhatt : पूजा भटनं सांगितलं घटस्फोटाचं खरं कारण, म्हणाली.......

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट करिअरपेक्षा तिच्या पर्सनल आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली आहे. अनेक

Sobhita Dhulipala : नागा चैतन्यासोबतच्या नात्यावर होणाऱ्या ट्रॉलिंगवर पहिल्यांदाच बोलली सोभिता धूलिपाला ; म्हणाली..

सोभिता धूलिपाला व नागा चैतन्या यांचे नाते नेहमी चर्चेत राहिले आहे. समांथा रुथ प्रभूपासून विभक्त झाल्यानंतर नागा

Karishma Kapoor : ‘मेंटलहुड’ नंतर करिश्मा कपूर पुन्हा एकदा थरारक क्राइम सिरीजमध्ये ; ट्रेलर बघून चर्चेला उधाण!

मुंबई : 'मर्डर मुबारक' नंतर दोन वर्षांनी करिश्मा कपूर पुन्हा एका दमदार भूमिकेत परतली आहे.‘मेंटलहुड’ नंतरचा हा

Swapnil Joshi : स्वप्नील जोशीने मध्येच थांववला शो, माफी मागत म्हणाला.. !

एखाद्या नाटकात कलाकाराला प्रेक्षकांमुळे होणारा त्रास हा फारसा नवा नाही. प्रेक्षकांचे वाजणारे फोन आणि मोठ्याने

Marathi Actress Weight Loss : १३२ किलोवरून थेट फिटनेस आयकॉन! ७० किलो वजन कमी करण्याचा आरती सोलंकीचा प्रेरणादायी प्रवास

मुंबई (Marathi Actress Weight Loss Journey) : वजन कमी करणं हा मोठा टास्क (Task)सतो. वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सातत्य.