Ranveer Singh : रणवीर-फरहानच्या वादात आता सलमान खानचा प्रवेश, आता 'भाईजान' काढणार का यावर तोडगा ?

अभिनेता रणवीर सिंह(Ranveer Singh) आणि फरहान अख्तर(Farhaan Akhtar) यांच्यातील वाद मिटवण्यासाठी आता सलमान खानने पुढाकार घेतल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी सलमान खानने(Salman Khan) दोघांशीही चर्चा केली असून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे.


अभिनेता-दिग्दर्शक-निर्माता फरहान अख्तरच्या आगामी ‘डॉन 3’(Don 3) या चित्रपटाचं शूटिंग सुरू होण्याच्या तीन आठवडे आधी माघार घेतल्याने फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने (FWICE) अभिनेता रणवीर सिंह विरोधात नॉन-कोऑपरेशन डायरेक्टिव्ह जारी केले. यावरून रणवीरच्या चाहत्यांमध्ये आणि बॉलिवूड(Bollywood) इंडस्ट्रीत एकच चर्चा सुरू आहे की, हा वाद कसा मिटवला जाणार? अशातच या वादात आता बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात अभिनेता सलमान खान याचा प्रवेश झाला आहे. रणवीर आणि फरहान यांच्यातील हा वाद सोडवण्यासाठी सलमान खान मध्यस्थी करणार असल्याचं बोल्ल जात आहे. सलमान खानला फिल्म इंडस्ट्रीचा ‘गॉडफादर’ असं म्हटलं जातं. कारण तो नेहमीच कठीण काळात लोकांच्या पाठिशी उभा राहतो.



‘डॉन 3’वरून रणवीर सिंह आणि फरहान अख्तर यांच्यात वाढता वाद पाहून सलमान खानने मध्यस्थी करण्याच ठरवलं आहे. सलमान खानला रणवीर सिंह एक अभिनेता आणि व्यक्ती म्हणून खूप आवडतो. तर अख्तर कुटुंबाशीही त्याचे चांगले मैत्रीचे संबंध आहेत. त्याने दोन्ही पक्षांशी संवाद साधला असून आपापल्या भविष्याच्या प्रकल्पाना धक्का न लावता आपले प्रश्न सोडवण्याचे आवाहन केलं आहे.



यावेळी सलमान खानने फरहानला समजावून सांगितलं की, इंडस्ट्रीत अनेक दशकांपासून क्रिएटिव्ह मतभेद असणं ही एक सामान्य गोष्ट आहे. रणवीरचा दृष्टीकोन समजून घेण्यासाठी त्याने त्याच्याशीही बराच वेळ चर्चा केली. या संपूर्ण प्रक्रियेत कोणालाही दुखावलं जाऊ नये यासाठी त्याने समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानने दोन्ही पक्षांना हा वाद मिटल्यानंतर एक इंडस्ट्री म्हणून विचार करून दुसऱ्या प्रकल्पावर एकत्र काम करण्यास सांगितलं आहे.



फरहान आणि रणवीर या दोघांनीही सलमान खानची मतं समजून घेतली आहेत आणि त्याचा सल्ला गांभीर्याने घेतला आहे. आता ते कोणताही पुढील वाद न होऊ देता समंजस्यपूर्ण तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. सलमान खानला या प्रकरणात कोणतीही कायदेशीर गुंतागुंत नको आहे. तसंच चित्रपट एजन्सींनीही घाईने निर्णय घ्यावेत असही त्याला वाटत नाही. झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी सलमान खान फरहानच्या पाठिशी उभा आहे आणि ‘धुरंधर’च्या यशाचा फायदा घेण्यासाठी रणवीरला नवीन प्रोजेक्ट करण्यास प्रोत्साहनही देत आहे.

Comments
Add Comment

Raj Kundra : 'जीव संपवण्याचा विचार'; आर्थर रोड जेल, घटस्फोटाची अफवा अन् शिल्पाच्या एका फोन कॉलचा 'तो' किस्सा; राज कुंद्राचा खुलासा

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा (Raj Kundra) २०२१ मधील पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे

Govinda And Sunita Ahuja : सुनीता आहुजा फॅमिली कोर्टाबाहेर? सुखी संसारात तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री

मुंबई : अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत गेल्या काही महिन्यांपासून

Zindagi Na Milegi Dobara 2 : झोया अख्तर यांच्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’चा सिक्वेल येणार

मुंबई : झोया अख्तर यांच्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या गाजलेल्या चित्रपटाच्या सिक्वेलची (पुढील भागाची) वाट

Aawarapan 2 : ‘आवारापन २’ची दमदार कमाई; ‘बंटवारा १९४७’ला फटका

मुंबई : १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या इम्रान हाश्मीच्या 'आवारापन २' आणि सनी देओलच्या 'बंटवारा १९४७' यांच्यातील

Shah Rukh Khan : नागपंचमीच्या दिवशी ‘मन्नत’मध्ये दोन सापांची एन्ट्री; एकाची सुखरूप सुटका, दुसरा बेपत्ता!

Mumbai : मुंबईतील बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या वांद्रे येथील प्रसिद्ध ‘मन्नत’ निवासस्थानी नागपंचमीच्या दिवशीच

Sunny Deol : सनी देओलच्या ‘बटवारा १९४७’ चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; विकेंडला केली जोरदार कमाई, २३ चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले!

सनी देओल (Sunny Deol) आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) यांचा ‘बंटवारा १९४७’ (Batwara 1947) हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी