‘मान्सून’चे आगमन लांबले?

मुंबई : ‘आज येईल, उद्या येईल’, म्हणून संपूर्ण देश ज्याची चातकासारखी वाट पाहत आहे, तो नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सून अजूनही येण्याची चिन्हे दिसत नाहीत. आधी मान्सून १ जून रोजीच केरळमध्ये दाखल होणार असल्याची हवामान विभागाने सांगितल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, आता ऐन उन्हाच्या कडाक्यात नागरिकांचा काहीसा भ्रमनिरास करणारी बातमी समोर आली आहे. देशातील बदलत्या हवामानामुळे मान्सूनचा वेग मंदावला असून, त्याच्या आगमनाची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे.


हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, अंदमान आणि श्रीलंकेपर्यंत पोहोचलेला मान्सून भारताच्या सीमेजवळ येऊन रेंगाळला आहे. त्यामुळे आता मान्सून ३ ते ४ जूनच्या सुमारास केरळमध्ये (देवभूमी) पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. केरळमधील या विलंबामुळे महाराष्ट्रातही यंदा मान्सून दाखल होण्यास काही दिवस उशीर होणार आहे.हवामान शास्त्रज्ञांच्या मते, मान्सूनची वाटचाल मंदावली असून या स्थितीला ‘मान्सूनचे मृदू आगमन’ असे संबोधले जाते. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्राकार परिस्थितीमुळे मान्सूनच्या वाऱ्यांना खेचणारी एक वेगळी यंत्रणा तयार झाली आहे. परिणामी, बाष्पाने भरलेले नैऋत्य मोसमी वारे कमकुवत पडले असून मान्सूनची पुढे जाणारी गती थंडावली आहे. या स्थितीला मान्सून मृदू आगमन असे संबोधले जाते.
Comments
Add Comment

Prithviraj Chavan : पृथ्वीराज चौहाण यांची उपायुक्तपदी बढती, तर सहायक आयुक्तपदावरील आठ अधिकाऱ्यांची खांदेपालट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या मालमत्ता विभागाचे सहायक आयुक्त डॉ पृथ्वीराज चौहाण यांची उपायुक्त

Devendra Fadnavis : कुंभमेळ्याआधी शिर्डी विमानतळावरील एअर कार्गो सुविधा सुरू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; पुरंदर विमानतळासाठी ६ हजार कोटींच्या कर्जाला मंजुरी मुंबई : नवी मुंबई

Shambhuraj Desai : कोयना बॅक वॉटर फेस्टिव्हल २०२६ होणार जागतिक दर्जाचा; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्राच्या पर्यटनाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देण्याच्या उद्देशाने कोयना बॅक वॉटर

Chandrashekhar Bawankule : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेसाठी पालघरमधील जमीन देण्याचा निर्णय

मुंबई : फडणवीस सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'विरार ते अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका' प्रकल्पाच्या कामाला गती

Nitesh Rane : मंत्री नितेश राणे यांनी घेतला वाढवण बंदर प्रकल्पाच्या आराखड्याचा आढावा

मुंबई : पालघर जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त सहभागातून विकसित होत असलेल्या अत्यंत महत्त्वाकांक्षी

Cashless Petrocard : राज्यातील रुग्णवाहिकांसाठी आता 'कॅशलेस पेट्रोकार्ड'

- आरोग्यमंत्र्यांचे हस्ते उद्घाटन; इंधनाच्या कारणांवरून होणारे रुग्णांचे हाल थांबणार मुंबई : "राज्यातील आरोग्य