भाजपची पडद्याआडून ‘बविआ’शी चर्चा

ठाणे जिंकण्यासाठी घडामोडींना वेग; हितेंद्र ठाकुरांच्या ७१ नगरसेवकांचा ‘भाव’ वाढला

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या जागांसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू असतानाच, ठाण्याच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेत शह-काटशहाचे राजकारण रंगात आले आहे. ठाण्याची जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडण्याबाबत महायुतीत अनुकूलता असल्याचे संकेत मिळत असतानाच, आता भाजपने ही जागा स्वतःकडे खेचण्यासाठी पडद्याआड वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपच्या या ‘प्रेशर टॅक्टिक्स’मुळे वसई-विरारमध्ये मजबूत पकड असलेल्या हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या (बविआ) ७१ नगरसेवकांचा ‘भाव’ चांगलाच वधारला आहे.


संख्याबळाचा विचार करता ठाणे विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे पारडे जड आहे. असे असतानाही, ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असल्याने आणि त्यांचे निकटवर्तीय रवींद्र फाटक हे या जागेचे प्रतिनिधित्व करत असल्याने ही जागा शिवसेनेलाच मिळावी, असा शिवसेनेचा आग्रह आहे. या जागेसाठी पाठिंबा मिळवण्यासाठी रवींद्र फाटक यांनी दोन दिवसांपूर्वीच ‘बविआ’चे सर्वेसर्वा भाई ठाकूर आणि आमदार क्षितीज ठाकूर यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर फाटक यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात होती.परंतु, भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आता या जागेसाठी कमालीचा आग्रह धरला आहे. "जिल्ह्यात पक्षविस्तारासाठी हीच योग्य वेळ आहे. एवढे नगरसेवक असूनही आता आमदार निवडून आणला नाही, तर कधी आणणार?" असा सूर भाजपमधून उमटू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार हेमंत सावरा आणि आमदार राजन नाईक यांनी ‘बविआ’चे माजी महापौर राजीव पाटील यांची गुप्त भेट घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या भेटीत भाजपने ‘बविआ’कडे विधानपरिषद निवडणुकीत सहकार्याची विनंती केल्याचे समजते.


संख्याबळाचे गणित काय?

गेल्या काही वर्षांत भाजपने ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आपली ताकद लक्षणीयरित्या वाढवली आहे. सध्या ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपकडे तब्बल ४४४ मतदारांचे (नगरसेवक व लोकप्रतिनिधी) संख्याबळ आहे, तर शिवसेनेकडे ३४६ मते आहेत. त्यामुळे स्वबळावरही भाजपचा उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. परंतु, ‘बविआ’ची ७१ मते निर्णायक ठरणार आहेत. जर ही ७१ मते शिवसेनेच्या बाजूने वळाली आणि त्यांनी इतर छोट्या घटकांची जुळवाजुळव केली, तर शिवसेना भाजपला कडवे आव्हान देऊ शकते. त्यामुळेच सध्या ठाण्याच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी ‘बविआ’ केंद्रस्थानी आली असून, हितेंद्र ठाकूर यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

Comments
Add Comment

Amit Shah : एफसीआरए विधेयकावर अमित शाह बोलण्याची शक्यता

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील सलग गदारोळ आणि कामकाज थांबल्याचा तिढा सोडवण्यासाठी केंद्र सरकारने

Women's Reservation Bill : परिसीमन आणि महिला आरक्षण विधेयकांसाठी विशेष अधिवेशन घेण्याची केंद्र सरकारची तयारी; किरेन रिजिजू आणि राहुल गांधी यांची भेट

नवी दिल्ली : परिसीमन (Delimitation Bill) आणि महिला आरक्षणाशी (Women's Reservation Bill) संबंधित महत्त्वाच्या घटनादुरुस्ती विधेयकांवर केंद्र

Sheikh Hasina : 'बांगलादेशातील उठाव हे नियोजित सत्तांतर'

नवी दिल्ली : बांगलादेशात २०२४ मध्ये झालेल्या निदर्शनानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत

Waqf Cases : वक्फ नोंदींच्या वादग्रस्त प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी विशेष बेंच

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा; दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा मुंबई : राज्यात

MHADA Lottery : म्हाडाच्या दोन हजार ६४० सदनिकांसाठी निघणार सोडत, ७५ हजार १२७ अर्जदारांचे लक्ष

मुंबई : म्हाडा मुंबई (MHADA Mumbai) मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत (MHADA

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय! पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम