जलजीवन मिशनच्या ५१ हजार योजनांचा आढावा; नदीजोड प्रकल्पाला प्राधान्य देणार

केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांच्या उपस्थितीत जलजीवन मिशनमधील योजनांचा दिल्लीत आढावा


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बैठकीला उपस्थित


नवी दिल्ली : महाराष्ट्रात सध्या सुमारे ५१ हजार जलजीवन मिशनच्या योजना सुरू असून त्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. अपूर्ण किंवा त्रुटी असलेल्या योजनांची पूर्तता कशी करता येईल, तसेच पाण्याच्या स्रोतांशी संबंधित अडचणींवर मार्ग कसा काढता येईल, याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीतील अंत्योदय भवन, सीजीओ कॉम्प्लेक्स येथे जलजीवन मिशन आणि पाणीटंचाईच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराब पाटील, यांच्यासह सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


amp/"> amp/" class="section-post-content-internal-post-title">Nitesh Rane : ऐतिहासिक महत्त्व अबाधित ठेवून मोती तलावाचे पुनरुज्जीवन करणार - पालकमंत्री नितेश राणे

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीचे वैभव असलेल्या प्रसिद्ध मोती तलावाचे मूळ ऐतिहासिक महत्त्व आणि वारसा अबाधित ठेवून त्याचे पुनरुज्जीवन केले ...


बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले की, राज्यातील सर्व योजनांचा सखोल आढावा घेण्यात आला. अनेक योजना पूर्णत्वाच्या मार्गावर असून काही योजनांमध्ये तांत्रिक बदल आवश्यक ठरले आहेत. काही भागांमध्ये पाण्याचे स्रोत कोरडे पडल्याने निर्माण झालेल्या अडचणींवर उपाययोजना कशा करता येतील, यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली.योजनांमधील त्रुटी दूर करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी विविध पर्यायांवर विचारविनिमय झाला. संबंधित विभागांना आवश्यक त्या सुधारणा करून कामांना गती देण्याबाबतही सूचना देण्यात आल्या.


यावेळी राज्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या नदीजोड प्रकल्पावर विशेष चर्चा करण्यात आली. हा प्रकल्प महाराष्ट्रातील विशेषतः मराठवाडा आणि इतर दुष्काळग्रस्त भागांसाठी वरदान ठरणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे सिंचनक्षेत्र वाढण्यास मदत होणार असून दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.पंतप्रधानांनीही नदीजोड प्रकल्पाला प्राधान्य दिले असून केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी बैठकीत त्याबाबत सकारात्मक भूमिका मांडल्याचे शिंदे यांनी नमूद केले. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने आणि अधिकाधिक जमीन ओलिताखाली आणण्यासाठी ही बैठक अत्यंत उपयुक्त ठरल्याचे त्यांनी सांगितले.


amp/">
amp/" class="section-post-content-internal-post-title">Nitesh Rane : ऐतिहासिक महत्त्व अबाधित ठेवून मोती तलावाचे पुनरुज्जीवन करणार - पालकमंत्री नितेश राणे

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीचे वैभव असलेल्या प्रसिद्ध मोती तलावाचे मूळ ऐतिहासिक महत्त्व आणि वारसा अबाधित ठेवून त्याचे पुनरुज्जीवन केले ...


दरम्यान, जलसंधारणासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘जलतारा’ उपक्रमाच्या विस्तारावरही बैठकीत चर्चा झाली. श्री श्री रविशंकर यांच्या संस्थेसोबत या उपक्रमासाठी सामंजस्य करार करण्यात आला असून त्याचे काम डॉ. पुरुषोत्तम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.राज्यात सध्या सुमारे ६५ हजार जलतारा संरचना उभारण्यात आल्या आहेत. मात्र, भूजलपातळी वाढविण्यासाठी आणि पाणी अधिक प्रमाणात जमिनीत मुरावे यासाठी या उपक्रमाची व्याप्ती आणखी वाढविणे आवश्यक असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. यामुळे भूजलसाठ्यात वाढ होऊन शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

Tags
Devendra FadnavisEknath Shinderiver-linking projectJal Jeevan Mission'CR Patil

Comments
Add Comment

Madhuri Vantara : 'वनतारा'च्या उपचारांनी 'माधुरी' हत्तीण झाली ठणठणीत, लवकरच कोल्हापूरला परतणार

जामनगर: गंभीर आजारपण आणि दोन्ही पायांच्या हाडांच्या दुखापतीमुळे मृत्यूच्या छायेत असलेल्या 'माधुरी' नावाच्या

Study Tours For Maharashtra Govt School : सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांचे नशीब उजळले! आता 'NASA' आणि 'ISRO' ची सफर

मुंबई : महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी

Made in India : दोन भारतीय इंजिनिअर्सनी उभी केली १४,१४५ कोटींची 'युनिकॉर्न' कंपनी

मुंबई: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या जागतिक स्पर्धेत सध्या अमेरिकन कंपन्यांचा दबदबा आहे. मात्र, या शर्यतीत आता

Cough Syrups : औषधांच्या नियमात मोठा बदल; कफ सिरपसाठी आता डॉक्टरांची 'चिठ्ठी' बंधनकारक!

नवी दिल्ली : देशातील नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि धाडसी

Telegram Temporary Ban : NEET-UG 2026 परीक्षेपूर्वी सरकारचा मोठा निर्णय! पेपरफुटी रोखण्यासाठी टेलिग्रामवर तात्पुरती बंदी

NEET-UG 2026 पुनर्परीक्षेपूर्वी पेपरफुटी आणि ऑनलाइन फसवणुकीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींना स्लोव्हाकियाचा सर्वोच्च सन्मान; ३३ देशांकडून मिळालेल्या पुरस्कारांच्या यादीत आणखी एका देशाची भर

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना स्लोव्हाकियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस