Nitesh Rane : ऐतिहासिक महत्त्व अबाधित ठेवून मोती तलावाचे पुनरुज्जीवन करणार - पालकमंत्री नितेश राणे

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीचे वैभव असलेल्या प्रसिद्ध मोती तलावाचे मूळ ऐतिहासिक महत्त्व आणि वारसा अबाधित ठेवून त्याचे पुनरुज्जीवन केले जाईल. हा तलाव पर्यटन आणि सौंदर्यीकरणासह पर्यटकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित केला जाणार असून, आधुनिक सुविधांसह त्याचा कायापालट करण्यात येईल, अशी माहिती मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी बुधावरी दिली.


मंत्रालयात मंत्री नितेश राणे यांच्या दालनात मोती तलावाच्या पुनरुज्जीवन आणि विकासाच्या संदर्भात बुधावरी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत तलावाच्या कायापालटाबाबतचे सविस्तर सादरीकरण (प्रेझेंटेशन) करण्यात आले. या सादरीकरणानंतर तलावाचा ऐतिहासिक वारसा जपत तेथे कोणत्या आधुनिक सुविधा निर्माण करता येतील, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि सावंतवाडीच्या वैभवात भर घालण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.



या महत्त्वपूर्ण बैठकीला आमदार दीपक केसरकर, सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा श्रद्धा लखमराजे भोसले, लखमराजे भोसले यांच्यासह वास्तुविशारद स्वरदा पोयरेकर, श्रद्धा कदम आणि अजय नायक उपस्थित होते. या विकास आराखड्यामुळे आगामी काळात मोती तलावाचे रूप पूर्णपणे बदलणार असून, स्थानिक नागरिकांसह पर्यटकांसाठी हे एक उत्तम पर्यटन स्थळ ठरणार आहे.

Comments
Add Comment

Nashik-Mumbai Highway : घोटी–सिन्नर फाटा उड्डाणपुलावर ट्रक दुभाजकाला धडकून उलटला अन्...महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

घोटी : नाशिक–मुंबई महामार्गावर (Nashik-Mumbai Highway) घोटी–सिन्नर (Ghoti Sinner) फाटा उड्डाणपुलावर आज एक भीषण अपघात घडला. विटांनी

Mumbai Pune Railway : घाटात दरड कोसळली तरी वाहतूक थांबणार नाही; मुंबई-पुणे रेल्वेप्रवास आता अधिक सुरक्षित, 'हा' मोठा बदल होणार!

मुंबई-पुणे रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. पावसाळ्यात दरडी कोसळल्यामुळे होणारा

Ahilyanagar : नीट परीक्षेत कमी गुण मिळाले अन् विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलले ; सुसाईड नोटमध्ये लिहिलं आत्महत्येचं कारण

Ahilyanagar : नीट परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याच्या नैराश्यातून १९ वर्षीय विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलल्याची

BENDUR FESTIVAL : सर्जा-राजाप्रती कृतज्ञतेचा उत्सव; महाराष्ट्रातील पारंपरिक 'बेंदूर' सणाची परंपरा आणि महत्त्व

भारतीय संस्कृती ही कृषीसंस्कृतीवर आधारलेली असून, या मातीतील प्रत्येक सण-उत्सव हा थेट प्रकृती आणि

Shahapur Rain : शहापूरात पावसाचा कहर! हनुमान धबधब्यावर भीषण दुर्घटना; ५ पर्यटक वाहून गेले

शहापूर : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात (Shahapur Rain) झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे हनुमान धबधब्यावर मोठी

Maharashtra Monsoon Weather : पावसाचा पुन्हा जोर! पुढील २४ तास अतिमहत्त्वाचे; महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

मुंबई : जुलैच्या अखेरच्या आठवड्यात महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. उत्तर-पश्चिम