मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीचे वैभव असलेल्या प्रसिद्ध मोती तलावाचे मूळ ऐतिहासिक महत्त्व आणि वारसा अबाधित ठेवून त्याचे पुनरुज्जीवन केले जाईल. हा तलाव पर्यटन आणि सौंदर्यीकरणासह पर्यटकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित केला जाणार असून, आधुनिक सुविधांसह त्याचा कायापालट करण्यात येईल, अशी माहिती मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी बुधावरी दिली.
मंत्रालयात मंत्री नितेश राणे यांच्या दालनात मोती तलावाच्या पुनरुज्जीवन आणि विकासाच्या संदर्भात बुधावरी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत तलावाच्या कायापालटाबाबतचे सविस्तर सादरीकरण (प्रेझेंटेशन) करण्यात आले. या सादरीकरणानंतर तलावाचा ऐतिहासिक वारसा जपत तेथे कोणत्या आधुनिक सुविधा निर्माण करता येतील, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि सावंतवाडीच्या वैभवात भर घालण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा; प्रत्येक आगाराला उत्पन्नाचे टार्गेट देणार मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सातत्याने ...
या महत्त्वपूर्ण बैठकीला आमदार दीपक केसरकर, सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा श्रद्धा लखमराजे भोसले, लखमराजे भोसले यांच्यासह वास्तुविशारद स्वरदा पोयरेकर, श्रद्धा कदम आणि अजय नायक उपस्थित होते. या विकास आराखड्यामुळे आगामी काळात मोती तलावाचे रूप पूर्णपणे बदलणार असून, स्थानिक नागरिकांसह पर्यटकांसाठी हे एक उत्तम पर्यटन स्थळ ठरणार आहे.