Nashik News : समृद्धी महामार्गावर बर्निंग कारचा थरार; EV कार जळून खाक

Nashik News : समृद्धी महामार्गावर बर्निंग कारचा थरार पहायला मिळाला आहे. सिन्नरहून शिर्डीकडे (Sinnar to Shirdi) जाणाऱ्या टाटा नेक्सन इव्ही कारला (EV Car) अचानक आग लागल्याची घटना घडली. आज (बुधवारी) दुपारी दोन वाजेच्या सुमारास कांदळवाडी शिवाराजवळ ही आगीची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र क्षणांतच संपूर्ण कारने पेट घेतल्याने वाहन पूर्णतः जळून खाक झाले आहे.


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विजय गणेश गीते आणि योगेश प्रकाश घुगे हे दोघे सिन्नरहून शिर्डीकडे (Shirdi) जात असताना त्यांच्या एमएच १५ एचवाय ५५६३ या क्रमांकांच्या टाटा नेक्सन ईव्ही कारमधून अचानक धूर निघण्यास सुरुवात झाली. प्रसंगावधान राखत दोघेही तात्काळ बाहेर पडले. यानंतर काही क्षणांतच वाहनाला भीषण आग लागली. दोघांच्याही प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. आग इतकी भीषण होती की काही वेळातच संपूर्ण वाहन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आणि कार पूर्णपणे जळून खाक झाली.



दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस प्रशासन व महामार्ग प्रशासन (Police Administration and Highway Administration) तब्बल एक तास उशिराने घटनास्थळी पोहोचले. या घटनेमुळे काही काळ समृद्धी महामार्गावरील वाहतुकीवर (Trafic) परिणाम झाला होता. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.


 
Comments
Add Comment

महाविकास आघाडी विधानपरिषदेच्या सर्व जागा लढवणार

 काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा; दोन दिवसांत जागावाटप अंतिम करणार मुंबई : राज्यातील

जलजीवन मिशनच्या ५१ हजार योजनांचा आढावा; नदीजोड प्रकल्पाला प्राधान्य देणार

केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांच्या उपस्थितीत जलजीवन मिशनमधील योजनांचा दिल्लीत आढावा मुख्यमंत्री देवेंद्र

Keralam : माजी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या घरावर ED चे छापे; केरळमधील थरारक व्हिडिओमुळे देशात खळबळ!

तिरुवनंतपुरम : केरळच्या राजधानीत आज अत्यंत तणावाचे आणि हिंसक वातावरण पाहायला मिळाले. कोचीन मिनरल्स अँड रुटाईल

Nitesh Rane : ऐतिहासिक महत्त्व अबाधित ठेवून मोती तलावाचे पुनरुज्जीवन करणार - पालकमंत्री नितेश राणे

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीचे वैभव असलेल्या प्रसिद्ध मोती तलावाचे मूळ ऐतिहासिक महत्त्व आणि वारसा

लालपरीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी ‘पालक अधिकारी’ नेमणार;  मंत्री प्रताप सरनाईक

 मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा; प्रत्येक आगाराला उत्पन्नाचे टार्गेट देणार मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग

Nashik News : कश्यपी धरणात पती-पत्नीसह चौघांचा बुडून मृत्यू

नाशिक : नाशिकच्या कश्यपी धरण (Kashyapi Dam) येथे गेलेल्या पती-पत्नी आणि त्यांच्या शेजारी राहणाऱ्या दोघा मुलांचा बुडून