महाविकास आघाडी विधानपरिषदेच्या सर्व जागा लढवणार

 काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा; दोन दिवसांत जागावाटप अंतिम करणार


मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या १६ जागा आणि नागपूरमधील एका जागेची पोटनिवडणूक अशा सर्व १७ जागांवर महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहे. या निवडणुकीच्या जागावाटपाची प्राथमिक चर्चा मुंबईतील काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या ‘टिळक भवन’ येथे पार पडली. येत्या दोन दिवसांत पुन्हा बैठक घेऊन सर्वसंमतीने अंतिम जागावाटप जाहीर केले जाईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी दिली.


या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, तसेच उबठाचे आमदार अनिल परब, अंबादास दानवे आणि मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. या बैठकीत विधान परिषद निवडणुकीच्या रणनीतीसह इतर महत्त्वाच्या राजकीय विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.प्राथमिक चर्चेनुसार, महाविकास आघाडीतील १७ जागांपैकी काँग्रेस सात ते आठ जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तर उबाठा गट पाच ते सहा आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस तीन ते चार जागांवर आपले उमेदवार उभे करणार असल्याची माहिती समोर आली आहे. कोणत्या पक्षाला कोणती जागा सुटणार, याचा अंतिम निर्णय २९ तारखेला होणाऱ्या मविआ नेत्यांच्या पुढील बैठकीत स्पष्ट होणार आहे.

Comments
Add Comment

Breaking News : मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा; सलग दुसऱ्या दिवशी शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर

मुंबई : मुंबई महापालिकेने सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या मंगळवार ७ जुलै २०२६ रोजी सर्व शासकीय, खासगी,

Maharashtra Heavy Rain : राज्यात पावसाचा कहर! १७ NDRF आणि 6 SDRF पथके तैनात; लोणावळ्यात तब्बल ६७० मिमी पावसाची नोंद

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Dadar Tree Collapse : दादरमध्ये भलंमोठं झाड कोसळलं! प्लाझाजवळ पार्क केलेल्या कारचा चक्काचूर; अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरू

मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये गेल्या

BMC Park : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! महापालिकेची सर्व उद्याने उद्या बंद राहणार; जोरदार वारे आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

मुंबई : मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरातील अनेक

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीस ८ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात

Nashik TCS Case Nida Khan : नाशिक आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील संशयित निदा खानला जामीन

Nashik : नाशिकमधील टीसीएस कंपनीत कार्यरत असलेल्या एका अविवाहित तरुणीवर अत्याचार तसेच जबरदस्तीने धर्मांतराचा