Nashik : नाशिकमध्ये कथित बोगस रेशनकार्ड प्रकरणावरून वाद, घुसखोरांना रेशनकार्ड वाटप झाल्याचा आरोप

Nashik : नाशिकमध्ये कथित बोगस रेशनकार्ड प्रकरणावरून वातावरण तापले असून, अखिल भारतीय हिंदू महासभेने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले असून, नाशिक ग्रामीण तहसील कार्यालयातून मंजूर झालेल्या काही रेशनकार्डांबाबत संशय व्यक्त करण्यात आला आहे.


हिंदू महासभेचे संपर्क प्रमुख बापू डापसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील चुंचाळे आणि अंबड परिसरात मोठ्या प्रमाणावर संशयास्पद रेशनकार्डधारक आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. काही व्यक्ती बांगलादेशी घुसखोर असल्याचा आरोप करत, त्यांनी रेशनकार्ड मिळवताना कोणती कागदपत्रे सादर केली याची चौकशी व्हावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.



स्थानिक पात्र लाभार्थींना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याचा मुद्दाही संघटनेने उपस्थित केला आहे. अनेक नागरिकांना वर्षानुवर्षे प्रयत्न करूनही रेशनकार्ड मिळत नसताना संशयित व्यक्तींना सहज रेशनकार्ड कसे मिळाले, असा सवाल करण्यात आला आहे. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष चौकशी समिती नेमून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच अपूर्ण किंवा बनावट कागदपत्रांच्या आधारे मंजूर झालेली रेशनकार्ड तातडीने रद्द करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.


संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या पाहणीत सुमारे १ हजार २०० पीपीपी रेशनकार्डांपैकी जवळपास ६० टक्के कार्ड संशयास्पद असल्याचा दावा करण्यात आला आहे. पुरवठा विभागात यासाठी मोठे जाळे कार्यरत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.



मोठी साखळी कार्यरत


कागदपत्रांची अपूर्तता असूनही नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस रेशनकार्ड तयार करून दिली जात आहेत. यासाठी नाशिकच्या पुरवठा विभागात मोठी साखळी कार्यरत असल्याचा आरोप आहे. पुरवठा विभागाकडून इष्टांक संपल्याचे सांगितले जात असले, तरी त्यानंतरही रेशनकार्ड वाटप सुरू आहे. याची त्वरित चौकशी करण्यात यावी, अन्यथा मोठे आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा अखिल भारतीय हिंदू महासभेचे संपर्क प्रमुख बापू डापसे यांनी दिला आहे.

Comments
Add Comment

Nashik News : कश्यपी धरणात पती-पत्नीसह चौघांचा बुडून मृत्यू

नाशिक : नाशिकच्या कश्यपी धरण (Kashyapi Dam) येथे गेलेल्या पती-पत्नी आणि त्यांच्या शेजारी राहणाऱ्या दोघा मुलांचा बुडून

Randhir Singh Passes Away : एशियन गेम्समध्ये पहिलं सुवर्णपदक जिंकणारे दिग्गज नेमबाज रणधीर सिंग यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी निधन

नवी दिल्ली : भारतीय क्रीडा क्षेत्राला समृद्ध करणारे आणि जागतिक स्तरावर भारताचा दबदबा निर्माण करणारे दिग्गज

श्री प्रयागधाम ट्रस्टच्या वार्षिक भंडारा महोत्सवानिमित्त उरुळी स्थानकावर १६ गाड्यांना तात्पुरता थांबा

उरुळी : जून २०२६ मध्ये उरुळी येथे होणाऱ्या श्री प्रयागधाम ट्रस्टच्या वार्षिक भंडारा महोत्सवानिमित्त

Asaram Bapu :आसाराम बापूला हायकोर्टाचा मोठा झटका

Asaram Bapu : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात आसाराम बापू याला हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. आसाराम बापू याला

BCCI UPDATE : IPL मध्ये होणार सर्वात मोठा बदल? वर्षातून दोनदा रंगणार क्रिकेटचा महाकुंभ; BCCI ची नव्या प्लॅनवर चर्चा

MUMBAI : जगातील सर्वात लोकप्रिय टी-20 लीग असलेल्या आयपीएलमध्ये आगामी काळात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय

Byju Raveendran Case : बायजूसच्या संस्थापकाला मोठा धक्का! सिंगापूर कोर्टाने सुनावली ६ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा

सिंगापूर : एकेकाळी भारतातील सर्वात यशस्वी एडटेक कंपन्यांपैकी एक असलेल्या 'बायजूस' (Byju's) चे संस्थापक बायजू रवींद्रन