Vidarbha Heat Wave : विदर्भात उष्णतेचा कहर! तब्बल ५०० वटवाघुळांचा मृत्यू, ब्रह्मपुरीत देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद

विदर्भात उष्णतेने अक्षरशः कहर माजवला असून तापमानाचा पारा दिवसेंदिवस नवे विक्रम मोडताना दिसत आहे. प्रचंड उकाड्यामुळे नागरिकांचे हाल होत असतानाच आता वन्यजीवांनाही त्याचा मोठा फटका बसू लागला आहे. गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील सिरोंचा परिसरात तब्बल ५०० वटवाघुळांचा अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उष्माघातामुळेच या वटवाघुळांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. (Vidarbha Heat Wave)



वनविभागाने काही वटवाघुळांचे मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले असून नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. वाढत्या तापमानामुळे जंगलातील जैवविविधतेवर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता पर्यावरण तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. (Vidarbha Heat Wave)



विदर्भात रेड अलर्ट, नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा :


हवामान खात्याने मंगळवारी Amravati, Wardha, चंद्रपूर (Chandrapur) आणि गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर नागपूर (Nagpur) आणि अकोला (Akola) जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. (Vidarbha Heat Wave)



दरम्यान, Brahmapuri येथे तब्बल ४७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून हे देशातील सर्वाधिक तापमान ठरले आहे. त्याखालोखाल नागपूर ४६.५ गडचिरोली ४६.४, गोंदिया ४६.१ चंद्रपूर आणि वर्धा ४६ अंश सेल्सिअस तापमानाने अक्षरशः भाजून निघाले आहेत. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय दुपारच्या वेळेत घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. (Vidarbha Heat Wave)



वाढत्या तापमानामुळे वाघ झाला हिंसक?


काही दिवसांपूर्वी Chandrapur जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर वनविभागाने तपास सुरू केला असून वाढत्या तापमानामुळे वाघ हिंसक झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.



तज्ज्ञांच्या मते, प्रचंड उष्णतेमुळे वाघांमध्ये मानसिक ताण आणि चिडचिड वाढू शकते. शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी वाघ पाण्याजवळ राहण्याचा प्रयत्न करतात. मात्र योग्य वेळी पाणी उपलब्ध न झाल्यास त्यांचा आक्रमकपणा वाढण्याची शक्यता असते. अशाच परिस्थितीत तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलांवर वाघाने हल्ला केला असावा, असे मानले जात आहे.


विशेष म्हणजे या वाघाने एकाचवेळी तब्बल १३ महिलांवर हल्ला केला होता. वनविभागाने या वाघाला जेरबंद केले असून त्याच्या हिंसक वर्तनामागील कारणांचा सखोल अभ्यास सुरू आहे.

Comments
Add Comment

14-day curfew in Pune : पुणेकरांनो लक्ष द्या! १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू? की इंधन बचतीसाठी नवा फतवा; आदेशामुळे गोंधळ

पुणे : पुणे शहरात आजपासून जमावबंदी लागू झाल्याच्या चर्चेमुळे नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Petrol Diesel Stock in Maharashtra : राज्यात इंधनाचा पुरेसा साठा, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये; मंत्री छगन भुजबळांचे आवाहन

मुंबई : राज्यात पेट्रोल आणि डिझेल टंचाईच्या अफवा पसरत असतानाच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी

Accident In Ambenali Ghat : आंबेनळी घाटात खोलवर सापडले आठ तरुणांचे मृतदेह आणि..., रेस्क्यू टीमने दिली धक्कादायक माहिती

रायगड : रायगड आणि सातारा या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील धोकादायक आंबेनळी घाटात

Chhagan Bhujbal : राज्यात इंधनटंचाई नाही, नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये, छगन भुजबळांचे आवाहन

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात इंधन तुटवडा जाणवत आहे. पेट्रोल डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे.

Sindhudurg : सिंधुदुर्गातील वाढत्या पर्यटक संख्येचा विचार करून वाहतुकीचे नियोजन करा, पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर देशांतर्गत पर्यटनाला मोठी चालना मिळाली असून, सिंधुदुर्ग (Sindhudurg)

Pratap Sarnaik : अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना व्यवहारिक मराठीचे धडे; १५ ऑगस्टनंतर मुदतवाढ नाही

मुंबई : राज्यातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सहज बोलता, समजता आणि दैनंदिन व्यवहारात