Sanjay Rathore : शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या दालनातून ८० हजार रुपये चोरीला

मंत्रालयात खळबळ; १० हजारांची मर्यादा असताना इतके पैसे आले कुठून?


मुंबई : कडेकोट बंदोबस्त आणि चोख सुरक्षा व्यवस्था असलेल्या मंत्रालयात चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. शिवसेना नेते आणि राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या मंत्रालयातील शासकीय दालनातून तब्बल ८० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास करण्यात आली आहे. मंत्रालयासारख्या अतिसुरक्षित इमारतीमध्ये एका कॅबिनेट मंत्र्यांच्या कार्यालयात असा प्रकार घडल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.


मंत्रालयाच्या सुरक्षा नियमावलीनुसार, कोणत्याही बाहेरील अभ्यागताला किंवा कर्मचाऱ्याला आपल्यासोबत १० हजार रुपयांपेक्षा जास्त रोकड आत घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोलिसांकडून तपासणी दरम्यान या नियमाची कठोर अंमलबजावणी केली जाते. अशा परिस्थितीत मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयात नियमापेक्षा आठ पटीने जास्त म्हणजेच तब्बल ८० हजार रुपये आले कुठून आणि इतके पैसे कार्यालयात का ठेवण्यात आले होते? याबाबत आता मंत्रालयाच्या कॉरिडोअरमध्ये उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. कार्यालयातून पैसे गायब झाल्याचे समजताच कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ उडाली असून संशयाच्या संदर्भातून रात्री उशिरापर्यंत कर्मचाऱ्यांची कसून चौकशी करण्यात आली.

पोलिसांत तक्रार नाही


मंत्रालय परिसर हा २४ तास पोलिसांच्या निगराणीखाली असतो, तसेच मंत्र्यांच्या दालनाबाहेर विशेष सुरक्षा रक्षक तैनात असतात. संपूर्ण इमारतीत अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे असतानाही ही चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या संपूर्ण प्रकरणाची अद्याप कोणतीही अधिकृत पोलीस तक्रार नोंदवण्यात आलेली नाही. एवढी मोठी रक्कम चोरीला जाऊनही कायदेशीर प्रक्रिया टाळली जात असल्याने, नेमकी ही रक्कम कोणाची होती आणि कोणत्या कारणासाठी तिथे ठेवली होती, हे लपवण्यासाठीच गुन्हा दाखल न करता केवळ अंतर्गत पातळीवर या प्रकरणाची गुप्त चौकशी सुरू असल्याचा संशय बळावला आहे.

Comments
Add Comment

Monsoon Update : देशात पावसाची 64 टक्के तूट; महाराष्ट्रासह 16 राज्यांत पावसाची प्रतीक्षा

मुंबई : भारतात नैऋत्य मोसमी पावसाचा वेग मंदावला आहे. सोमवार, 15 जून रोजीच्या उपग्रह प्रतिमांमध्ये देशाच्या मोठ्या

Census : राज्यातील जनगणनेचा पहिला टप्पा यशस्वी

मुंबई : जनगणना 2027 साठी महाराष्ट्रात गृहसूची आणि गृह गणनेचा पहिला टप्पा यशस्वी पूर्ण; राज्यभरात 16 मे ते 14 जून 2026 या

Pre-Monsoon Preparations : ठाणे जिल्ह्यातील रस्ते कामांना गती देण्याचे निर्देश

सर्व मनपानी आपापल्या क्षेत्रातील क्लस्टर पुनर्विकासाला प्राधान्य द्यावे एमएसईबीची प्रलंबित कामे तत्काळ

Eknath Shinde : मुंबईतील पावसाळापूर्व तयारीचा उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतला आढावा

मुंबई परिसरात ‘शून्य जीवितहानी’ उद्दिष्ट ठेवून यंत्रणांनी समन्वयातून काम करावे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Mumbai Metropolitan Region : आता एकाच तिकिटावर करा संपूर्ण 'एमएमआर'मध्ये बस प्रवास!

राज्य सरकारकडून अभ्यास गट स्थापन; मार्गांचे सुसूत्रीकरण आणि ‘टेलिस्कोपिक भाडे’ रचनेवर होणार काम मुंबई : मुंबई

Smart Meter : स्मार्ट मीटरवर मोठा निर्णय येणार? जयंत पाटील-फडणवीस भेट चर्चेत

मुंबई : राज्यात जुन्या मीटरच्या जागी बसवण्यात आलेल्या स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य घरगुती ग्राहक आणि