Eknath Shinde : मोदी खरे धुरंधर, त्यांच्यावर टीका करणारे..., हर्षवर्धन सकपाळांच्या मोदींवरील टीकेला शिंदेंचे प्रत्युत्तर

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मागील बारा वर्षांत देशाने विकास, आत्मनिर्भरता आणि जागतिक प्रतिष्ठेची नवी उंची गाठली आहे. मोदी हेच खरे धुरंधर आहेत, त्यांच्यावर टीका करणारे खऱ्या अर्थाने दलिंदर आहेत. अशी आक्रमक टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ आणि विरोधकांवर केली. मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मोदींवरील टीकेचा तीव्र शब्दांत समाचार घेतला. शिंदे म्हणाले,“देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारे नरेंद्र मोदी हे आज जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत.



गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून १३ वर्षे आणि देशाचे पंतप्रधान म्हणून १२ वर्षे त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला आहे. भारताला महासत्तेकडे नेण्याचे, आत्मनिर्भर भारत उभारण्याचे आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे ऐतिहासिक कार्य मोदीजींनी केले आहे.”विरोधकांवर निशाणा साधताना त्यांनी म्हटले की, “ज्यांनी आयुष्यात देशासाठी कोणतेही भरीव योगदान दिले नाही, ते आज मोदीजींवर टीका करत आहेत. ‘कहाँ राजा भोज और कहाँ गंगू तेली’ अशीच त्यांची अवस्था आहे. मोदीजींवर आरोप करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. अशा टीकांमुळे मोदींची प्रतिमा कमी होणार नाही, उलट विरोधकांची राजकीय दिवाळखोरीच उघड होत आहे.”



“मोदीजींनी देशाला भ्रष्टाचारमुक्त आणि निर्णयक्षम नेतृत्व दिले. संरक्षण क्षेत्रात भारताला आयातदारातून निर्यातदार बनवले. पायाभूत सुविधा, डिजिटल क्रांती, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक सुधारणांमुळे भारताची जागतिक पातळीवरील ताकद वाढली आहे. बारा वर्षांच्या कार्यकाळात मोदीजींवर भ्रष्टाचाराचा एकही डाग लावता आलेला नाही. हीच त्यांच्या नेतृत्वाची सर्वात मोठी पावती आहे, असेही शिंदे म्हणाले."देशाच्या पंतप्रधानांविषयी बोलताना खालच्या दर्जाची भाषा वापरणे ही भारतीय संस्कृती नाही. राजकीय विरोध असू शकतो, पण वैयक्तिक पातळीवर घसरून केलेली टीका जनता कधीही सहन करणार नाही. १४० कोटी भारतीय मोदीजींच्या कामगिरीचे साक्षीदार आहेत आणि योग्य वेळी विरोधकांना उत्तर देतील; असे काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यांचा समाचार घेताना शिंदेंनी सांगितले.

Comments
Add Comment

अपघातग्रस्त कामगारांच्याबाबत प्रत्यारोपण शस्त्रक्रियांच्या तातडीसाठी उपाययोजना करा; कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

मुंबई : राज्यातील कारखान्यांमध्ये आणि औद्योगिक कंपन्यांमध्ये मशीनवर काम करताना अपघात होऊन हात गमावावा

Forest Minister Ganesh Naik : मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी १ हजार गावांमध्ये 'एआय अर्लट' यंत्रणा

वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा; २६० कोटींच्या कृती आराखड्यास मंजुरी मुंबई : राज्यातील वाढता मानव व वन्यजीव

Revenue Minister Bawankule : चाऱ्यासाठी सरकारी जमिनीवर आता गवत लागवड!

 बचत गट आणि बेरोजगार संस्थांशी भाडेकरार ; महसूलमंत्री बावनकुळे यांची महत्त्वाकांक्षी योजना मुंबई : गाव,

Nashik Crime : नाशिकमध्ये प्लॉट माफियांचा धुमाकूळ! जळगावच्या व्यावसायिकाला २२.५७ लाखांचा गंडा

नाशिक: नाशिकमध्ये पुन्हा एकदा प्लॉट माफियांचे काळे रॅकेट समोर आले असून जळगावच्या एका व्यावसायिकाला तब्बल २२ लाख

State President Ravindra Chavan : विधानपरिषदेच्या १२ जागांसाठी भाजपकडून ४८ नावांची यादी तयार

दिल्लीत होणार शिक्कामोर्तब; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण केंद्रीय गृहमंत्री, राष्ट्रीय अध्यक्षांची भेट

८९ हजार कोटींच्या ५ प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

२० हजार रोजगार निर्माण होणार; मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी मुंबई :