MLC Election : विधानपरिषदेच्या १५ जागांवर भाजप वरचढ

 शिवसेना-राष्ट्रवादीकडे केवळ एकेका जागेवर बहुमत; पुण्यात भाजप-राष्ट्रवादीत मोठी चढाओढ


मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्धार तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी व्यक्त केला असला, तरी प्रत्यक्षात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ पाहता भाजप अत्यंत वरचढ स्थितीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. १७ पैकी तब्बल १५ जागांवर भाजपचे पारडे जड असून, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्याकडे केवळ एकेका जागेवरच बहुमत आहे. विशेष म्हणजे, हायव्होल्टेज ठरणाऱ्या पुणे मतदारसंघावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या मोठी चढाओढ सुरू आहे.


या पार्श्वभूमीवर, महायुतीचा अंतिम तोडगा दिल्लीत निघणार असून, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना होणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यानंतरच जागावाटप आणि उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल. मतदारसंघांमधील मतांचे गणित आणि राजकीय ताकदीचा आढावा घेतल्यास, १४ ठिकाणी भाजपकडे बहुमताचा जादुई आकडा आहे. त्यामुळे महायुतीत भाजपच 'मोठा भाऊ' असल्याचे आकडेवारीवरून सिद्ध होत आहे. दुसरीकडे, शिंदे यांच्या शिवसेनेला 'रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग' आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 'परभणी-हिंगोली' या एकमेव मतदारसंघात स्वबळावर सत्ता राखता येईल.



पुणे मतदारसंघात एकटा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (३७५ मते) मोठा दिसत असला, तरी भाजप (३३५) आणि शिवसेना (८२) यांची एकत्रित मते राष्ट्रवादीपेक्षा जास्त आहेत. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी स्वतंत्र लढल्याचा दाखला देत भाजपने या जागेवर दावा ठोकला आहे. दुसरीकडे, कोकणातील 'रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग' या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात स्वतःचे बहुमत असतानाही, राष्ट्रवादी काँग्रेस ही जागा अनिकेत तटकरेंसाठी मागत आहे. या बदल्यात शिवसेनेने राष्ट्रवादीकडे 'परभणी-हिंगोली'च्या जागेची मागणी केल्याने जागांच्या अदलाबदलीची नवी समीकरणे समोर येत आहेत.


भाजपकडून सामंजस्याची भूमिका

सद्यस्थितीतील आकडेवारीनुसार राष्ट्रवादीच्या वाट्याला १, शिवसेनेच्या वाट्याला १ आणि उर्वरित १५ जागांवर भाजपचा वरचष्मा दिसत आहे. मात्र, मित्रपक्षांमध्ये नाराजी निर्माण होऊ नये म्हणून भाजपने समजूतदारपणाची भूमिका घेतली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने स्वतःच्या कोट्यातील जागा कमी करत शिवसेनेला एकाऐवजी ४ जागांची सन्मानजनक ऑफर दिली आहे.

संख्याबळावर नजर


मतदारसंघ - एकूण मते - भाजप - शिवसेना (शिंदे) - राष्ट्रवादी (अजित पवार)


१. ठाणे - 997 - 431 - 309 - 18
२. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग - 823 - 241 - 275 - 149
३. अहिल्यानगर - 452 - 207 - 44 - 64
४. जळगाव - 667 - 274 - 208 - 55
५. नाशिक - 603 - 186 - 161 - 107
६. सोलापूर - 617 - 304 - 76 - 48
७. सांगली-सातारा - 898 - 371 - 110 - 145
८. पुणे - 878 - 335 - 82 - 375
९. यवतमाळ - 446 - 135 - 104 - 29
१०. भंडारा-गोंदिया - 436 - 196 - 15 - 83
११. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली - 264 - 149 - 1 - 15
१२. अमरावती 449 136 23 83
१३. नांदेड 403 103 23 83
१४. धाराशिव-लातूर-बीड 904 379 80 202
१५. परभणी-हिंगोली 473 111 74 123
१६. छ. संभाजीनगर-जालना 646 254 139 86
१७. नागपूर (पोटनिवडणूक) - 794 - 501 - 30 - 5

Comments
Add Comment

Nashik : आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आलीय, नाशिक–पुणे रेल्वेसाठी आमदार सत्यजीत तांबे यांचा एल्गार

नाशिक : नाशिक–पुणे रेल्वे हा केवळ वाहतुकीचा नव्हे, तर नाशिकच्या विकासाचा आणि भविष्यातील आर्थिक प्रगतीचा

Nashik : नाशिक जिल्ह्यात 1,148 विद्यार्थ्यांकडून 26 हजार 891 वारकऱ्यांची चरणसेवा, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचा उपक्रम

Nashik : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत

Casting couch : इंडस्ट्रीमध्ये आधी शारीरिक सुखाची मागणी व्हायची आता, थेट…, अभिनेत्रीने सर्वच सांगून टाकलं

Casting couch : फिल्म इंडस्ट्रीमध्ये करियर करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. मेहनतीच्या जोरावर अनेक जण हे शिखर गाठतातही. पण

Skincare tips for monsoon : पावसाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या सोपे उपाय

पावसाळ्यात त्वचा निस्तेज होतेय? या ८ सोप्या टिप्स फॉलो करा आणि त्वचा ठेवा निरोगी व चमकदार (Skincare tips for monsoon)   चेहरा

आमिर खानच्या तिसऱ्या पत्नीचा पहिला नवरा कोण ? तुम्हांला माहिती आहे का ? गौरी स्प्रॅटच्या एक्स हजबंडबद्दल जाणून घ्या

Gauri Spratt Ex-Husband : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान (Aamir Khan) पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक

Healthy Food for Rainy Season : पावसाळ्यात 'हे' हेल्दी आणि टेस्टी पदार्थ नक्की ट्राय करा; चवही मिळेल आणि आरोग्यही राहील उत्तम!

मुंबई: पावसाळा म्हटलं की गरमागरम भजी, वडे, समोसे आणि चहाचा कप अशीच अनेकांच्या मनातली पहिली इच्छा असते. मात्र, या