मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेला प्रत्युत्तर मुंबई : कांदा प्रश्नावरील ...
मराठी भाषेच्या नियमांनुसार हे वाक्य जर शुद्ध स्वरूपात लिहायचे झाले, तर ते ‘मंत्रालयात प्रवेशाकरिता दुपारी २ वाजल्यापासून येथून रांग लावावी’ असे असायला हवे होते. मात्र, या फलकावरील वाक्यात शब्दांची आणि व्याकरणाची अशी काही मोडतोड करण्यात आली आहे की, त्याचा धड अर्थ लावणेही कठीण झाले आहे.
मराठी भाषाप्रेमींचे 'सौजन्य' हरवले?
राज्याच्या कानाकोपऱ्यातून दररोज शेकडो नागरिक विविध कामांनिमित्त मंत्रालयात येत असतात. हा फलक वाचून वाक्य चुकीचे असले तरी, नागरिक त्यातून कसातरी स्वतःचा अर्थ काढतात आणि रांगेत उभे राहतात. मात्र, मंत्रालयात ये-जा करणाऱ्या मराठी भाषा विभागातील उच्चपदस्थ अधिकारी, कर्मचारी किंवा स्वतःला 'मराठी भाषाप्रेमी' म्हणवून घेणाऱ्या एकाही कथित नेत्याला हा अशुद्ध फलक बदलण्याचे सौजन्य दाखवावेसे वाटले नाही, हीच मोठी शोकांतिका आहे. मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच राज्याच्या मातृभाषेची अशी दुरवस्था होत असेल, तर सर्वसामान्यांनी आणि परप्रांतीयांनी मराठीचा आदर कसा करावा, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. हा वादग्रस्त आणि चुकीचा फलक तातडीने बदलून तिथे प्रमाण मराठीतील फलक लावला जाईल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.