Eknath Shinde : पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामुळे भारताच्या अमृतकाळाची नवी पर्वणी; महायुतीला विकासाची नवी ऊर्जा

मुंबई : " प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या बारा वर्षाच्या यशस्वी नेतृत्वामुळे भारताच्या अमृतकाळाची नवी पर्वणी सुरू झाली असून विकसित भारताच्या संकल्पनेला देशातील १४० कोटी जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. देशासह महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळाली असून महायुती सरकारलाही विकासाची नवी ऊर्जा प्राप्त झाली आहे," असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या १२ वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानिमित्त त्यांनी अभिनंदनपर संदेश जारी केला.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा १२ वर्षांचा कार्यकाळ हा केवळ सत्तेचा प्रवास नसून राष्ट्रसेवेच्या अखंड तपश्चर्येचा आदर्श आहे. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून १३ वर्षे आणि देशाचे प्रधानमंत्री म्हणून सलग १२ वर्षे अशी २५ वर्षांची त्यांची सार्वजनिक जीवनातील कारकीर्द देशाच्या राजकीय इतिहासात प्रेरणादायी ठरली आहे. निष्कलंक कारकीर्द, अथक परिश्रम आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारे नेतृत्व ही त्यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्ये असल्याचे त्यांनी नमूद केले.



देशाच्या सर्वांगीण विकासासाठी मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या विविध योजनांनी भारताला नव्या उंचीवर नेले आहे. स्वच्छ भारत अभियान, डिजिटल इंडिया, आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया, जनधन योजना, महिला सक्षमीकरण, पायाभूत सुविधांचा विस्तार, चांद्रयान मोहिमेचे यश तसेच राम मंदिर उभारणीसारख्या ऐतिहासिक घडामोडींमुळे देशाच्या प्रगतीला नवे आयाम मिळाले आहेत, असे शिंदे यांनी सांगितले.


ते पुढे म्हणाले की, केंद्र सरकारच्या विकासाभिमुख धोरणांचा महाराष्ट्रालाही मोठा लाभ झाला आहे. राज्यातील पायाभूत सुविधा, महामार्ग, मेट्रो प्रकल्प, गुंतवणूक, औद्योगिक विकास आणि रोजगारनिर्मितीला गती मिळाली असून महायुती सरकारला विकासकामे अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी नवी ऊर्जा प्राप्त झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून महाराष्ट्र विकासाच्या नव्या पर्वाकडे वाटचाल करीत आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विकसित भारत २०४७ ही संकल्पना आता जनआंदोलन बनत असून भारत जगातील अग्रगण्य अर्थव्यवस्थांपैकी एक बनण्याच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. अमृतकाळातील ही परिवर्तनाची वाटचाल देशातील प्रत्येक नागरिकासाठी अभिमानास्पद असल्याचेही शिंदे यांनी म्हटले.



शिवसेना आणि महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेच्यावतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. भारताला अधिक सक्षम, समृद्ध आणि विकसित राष्ट्र बनविण्याच्या त्यांच्या नेतृत्वाला भविष्यातही यश लाभो, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Comments
Add Comment

Cloudburst : ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास काय करावे? जाणून घ्या आपत्कालीन व्यवस्थापन आणि सुरक्षेचे उपाय

Cloudburst : सध्या राज्यात पावसाचा वेग वाढला आहे. नाशिकमध्ये तर ढगसदृश्य पाऊस सांगितला आहे. अशावेळेस नागरिकांनी घाबरून

Indian Navy : भारतीय नौदलाची ताकद वाढणार; 'आयएनएस महेंद्रगिरी' आणि 'आयएनएस मालवण' लवकरच ताफ्यात येणार

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढणार असून लवकरच ‘आयएनएस महेंद्रगिरी’ आणि ‘आयएनएस मालवण’ या दोन

Indian Navy : भारतीय नौदलाच्या युद्धनौकांच्या सिंगापूर भेटीची यशस्वी सांगता

नवी दिल्ली : भारत आणि सिंगापूर यांच्यातील दृढ सामरिक आणि सागरी भागीदारी अधिक मजबूत करत भारतीय नौदलाच्या पूर्व

Mumbai Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती; विक्रोळी येथे बोअरिंगचे काम सुरू

मुंबई (Mumbai): मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्पासाठी, पहिल्या टनेल बोरिंग मशीनने (TBM) आज विक्रोळी

VB-G-RAM-G च्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारकडून राज्यांना २५ हजार ८६३ कोटी रुपयांचा पहिला हप्ता वितरित

नवी दिल्ली : केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यांच्या

Child Protection Act : इंस्टाग्रामवरील बाल लैंगिक शोषणाच्या जाहिरातींप्रकरणी सरकारची मेटाला नोटीस

नवी दिल्ली : केंद्र सरकारने इंस्टाग्रामवरील सशुल्क जाहिरातींद्वारे प्रसारित होणाऱ्या बाल लैंगिक शोषण आणि