Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीला आचारसंहितेत सूट; केंद्रीय निवडणूक आयोगाची मंजुरी

- ३० जूनआधी योजनेची अंमलबजावणी होणार


मुंबई : विधानपरिषद निवडणुकीमुळे आचारसंहितेच्या कचाट्यात अडकलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेला अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने ग्रीन सिग्नल दिला आहे. निवडणूक आयोगाने या योजनेच्या अंमलबजावणीला आचारसंहितेतून विशेष सूट दिली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली ही महत्त्वाकांक्षी कर्जमाफी आता ३० जूनपूर्वीच पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर मिळालेल्या या मंजुरीमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Farmer Loan Waiver)



महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १६ जागांसाठी सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू असून १८ जून रोजी मतदान होणार आहे. राज्यात आचारसंहिता लागू असल्याने या काळात कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करता येतील का, बाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, निवडणूक आयोगाच्या मंजुरीनंतर आता या योजनेच्या अंमलबजावणीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. (Farmer Loan Waiver)


सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत आर्थिक अडचणीत सापडलेल्या आणि बँकेचे कर्ज थकलेल्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतची संपूर्ण कर्जमाफी दिली जाणार आहे. तर दुसरीकडे, बँकेचे कर्ज प्रामाणिकपणे आणि नियमितपणे फेडणाऱ्या शेतकऱ्यांचाही सरकारने सन्मान केला आहे. अशा नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे. (Farmer Loan Waiver)



३० जूनपूर्वी अंमलबजावणी होणार :


- शासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व पात्र शेतकरी लाभार्थ्यांची पडताळणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून ३० जूनपूर्वी कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात (डीबीटीद्वारे) वर्ग केली जाईल. खरीप हंगामाची कामे सुरू असतानाच हा निधी हाती येणार असल्याने शेतकऱ्यांची पैशांची नड भागणार आहे.
- गेल्या काही वर्षांत राज्यातील शेती क्षेत्र सातत्याने अस्मानी संकटांचा सामना करत आहे. कधी दुष्काळ, कधी अवकाळी पाऊस, तर कधी अतिवृष्टी आणि त्यातच वाढलेला उत्पादन खर्च यामुळे बळीराजाचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले होते. अशा गंभीर परिस्थितीत सरकारने घेतलेला कर्जमाफीचा निर्णय आणि आता त्याला मिळालेली निवडणूक आयोगाची मंजुरी ही शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने दिलासादायक ठरणार आहे.

Comments
Add Comment

Former BJP MLA Patlya Guruji : भाजपाचे माजी आमदार पटल्या गुरुजी काळाच्या पडद्याआड; मेळघाटच्या ज्येष्ठ नेत्याला अखेरचा निरोप, सर्वत्र हळहळ

अमरावती : मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तसेच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ आणि एकनिष्ठ नेते पटल्या

A 'death trap' in Tandulwadi : १० वर्षांपूर्वीचा भीषण इतिहास पुन्हा; ८ जणांचा जीव घेणाऱ्या विहिरीवर प्रशासनाचा निष्काळजीपणा?

माळशिरस (सोलापूर): म्हसवड येथील सिद्धनाथ मंदिराचे दर्शन घेऊन पंढरपूरच्या दिशेने परतणाऱ्या भाविकांच्या पिकअप

Minister Dada Bhuse : शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध! शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

नंदुरबार : “शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे.

Solapur Accident :म्हसवड-पंढरपूर महामार्गावरील अपघातात राज्य सरकारची मोठी कारवाई

सोलापूर : म्हसवड -पंढरपूर महामार्गावरील तांदळवाडीजवळ एक वेगाने प्रवास करत असलेले वाहन विहिरीत पडले. या

Jalgaon Crime : जीवघेण्या हल्ल्यातील जखमी तरुण रुग्णालयात तर मुख्य आरोपी मोकाट

Jalgaon Crime : पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गावांमध्ये मागील काही महिन्यांपासून सर्वच

Pune News: पुणे विमानतळावर १५ मिनिटांपेक्षा जास्त थांबलात तर ५०० रुपयांचा दंड; वाहतूक कोंडी रोखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

पुणे : पुणे विमानतळ (Pune Airport) परिसरातील वाढती वाहतूक कोंडी (Traffic) कमी करण्यासाठी विमानतळ प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय