Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीला आचारसंहितेत सूट; केंद्रीय निवडणूक आयोगाची मंजुरी

- ३० जूनआधी योजनेची अंमलबजावणी होणार


मुंबई : विधानपरिषद निवडणुकीमुळे आचारसंहितेच्या कचाट्यात अडकलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेला अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने ग्रीन सिग्नल दिला आहे. निवडणूक आयोगाने या योजनेच्या अंमलबजावणीला आचारसंहितेतून विशेष सूट दिली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली ही महत्त्वाकांक्षी कर्जमाफी आता ३० जूनपूर्वीच पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर मिळालेल्या या मंजुरीमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Farmer Loan Waiver)



महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १६ जागांसाठी सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू असून १८ जून रोजी मतदान होणार आहे. राज्यात आचारसंहिता लागू असल्याने या काळात कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करता येतील का, बाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, निवडणूक आयोगाच्या मंजुरीनंतर आता या योजनेच्या अंमलबजावणीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. (Farmer Loan Waiver)


सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत आर्थिक अडचणीत सापडलेल्या आणि बँकेचे कर्ज थकलेल्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतची संपूर्ण कर्जमाफी दिली जाणार आहे. तर दुसरीकडे, बँकेचे कर्ज प्रामाणिकपणे आणि नियमितपणे फेडणाऱ्या शेतकऱ्यांचाही सरकारने सन्मान केला आहे. अशा नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे. (Farmer Loan Waiver)



३० जूनपूर्वी अंमलबजावणी होणार :


- शासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व पात्र शेतकरी लाभार्थ्यांची पडताळणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून ३० जूनपूर्वी कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात (डीबीटीद्वारे) वर्ग केली जाईल. खरीप हंगामाची कामे सुरू असतानाच हा निधी हाती येणार असल्याने शेतकऱ्यांची पैशांची नड भागणार आहे.
- गेल्या काही वर्षांत राज्यातील शेती क्षेत्र सातत्याने अस्मानी संकटांचा सामना करत आहे. कधी दुष्काळ, कधी अवकाळी पाऊस, तर कधी अतिवृष्टी आणि त्यातच वाढलेला उत्पादन खर्च यामुळे बळीराजाचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले होते. अशा गंभीर परिस्थितीत सरकारने घेतलेला कर्जमाफीचा निर्णय आणि आता त्याला मिळालेली निवडणूक आयोगाची मंजुरी ही शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने दिलासादायक ठरणार आहे.

Comments
Add Comment

NEET Paper Leak Case : पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट! तीन शिक्षकांवर CBI कडून आरोपपत्र; लाखोंमध्ये प्रश्नफुटीचा घोटाळा उघड

नीट-युजी २०२६ (NEET-UG 2026) पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभाग (Central Bureau of Investigation – CBI) लवकरच मोठी कारवाई करत आरोपपत्र

14-day curfew in Pune : पुणेकरांनो लक्ष द्या! १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू? की इंधन बचतीसाठी नवा फतवा; आदेशामुळे गोंधळ

पुणे : पुणे शहरात आजपासून जमावबंदी लागू झाल्याच्या चर्चेमुळे नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Vidarbha Heat Wave : विदर्भात उष्णतेचा कहर! तब्बल ५०० वटवाघुळांचा मृत्यू, ब्रह्मपुरीत देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद

विदर्भात उष्णतेने अक्षरशः कहर माजवला असून तापमानाचा पारा दिवसेंदिवस नवे विक्रम मोडताना दिसत आहे. प्रचंड

Petrol Diesel Stock in Maharashtra : राज्यात इंधनाचा पुरेसा साठा, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये; मंत्री छगन भुजबळांचे आवाहन

मुंबई : राज्यात पेट्रोल आणि डिझेल टंचाईच्या अफवा पसरत असतानाच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी

Accident In Ambenali Ghat : आंबेनळी घाटात खोलवर सापडले आठ तरुणांचे मृतदेह आणि..., रेस्क्यू टीमने दिली धक्कादायक माहिती

रायगड : रायगड आणि सातारा या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील धोकादायक आंबेनळी घाटात

Chhagan Bhujbal : राज्यात इंधनटंचाई नाही, नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये, छगन भुजबळांचे आवाहन

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात इंधन तुटवडा जाणवत आहे. पेट्रोल डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे.