Accident In Ambenali Ghat : आंबेनळी घाटात खोलवर सापडले आठ तरुणांचे मृतदेह आणि..., रेस्क्यू टीमने दिली धक्कादायक माहिती

रायगड : रायगड आणि सातारा या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील धोकादायक आंबेनळी घाटात मध्यरात्री अपघात झाला. प्रवाशांनी भरलेली स्कॉर्पिओ जीप अनियंत्रित झाली आणि सुमारे ७०० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात जीपमध्ये बसलेल्या आठ तरुणांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस, स्थानिक प्रशासन आणि विविध बचाव पथके तात्काळ घटनास्थळी पोहोचली. महाबळेश्वर रेस्क्यू टीम, प्रतापगड रेस्क्यू टीम, सिस्केप महाड-पोलादपूर, आपदा मित्र तसेच स्थानिक स्वयंसेवक आणि मदत पथके यांनी दरीत उतरून मृतदेह शोधण्याचे काम सुरू केले. हे मदतकार्य आता पूर्ण झाले आहे. रेस्क्यू टीमने दरीतील धक्कादायक स्थितीची माहिती प्रसारमाध्यमांना दिली त्यावेळी ऐकणारे स्तब्ध झाले.



मध्यरात्री २.४५ च्या सुमारास आंबेनळी घाटातून जात असताना स्कॉर्पिओ जीप अनियंत्रित झाली आणि सुमारे ७०० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात जीपमध्ये बसलेल्या आठ तरुणांचा मृत्यू झाला. सर्व तरुण सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगावचे रहिवासी होते. दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या बसला २०१८ मध्ये ज्या ठिकाणी अपघात झाला त्याच परिसरात हा अपघात झाला.



आंबेनळी घाटातील एका तीव्र आणि धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी थेट दरीत कोसळली. वाहन दरीत कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला. मात्र दरी अत्यंत खोल असल्याने वाहनापर्यंत पोहोचणे आणि परिस्थितीचा अंदाज घेणे मध्यरात्रीच्या वेळी कठीण होते. सुरुवातीला प्रखर प्रकाशाचे टॉर्च वापरून मदतकार्य सुरू करण्यात आले. पहाटे सुरू झालेले मदतकार्य रात्री संपले. शेवटचा मृतदेह सोमवारी २५ मे २०२६ रोजी रात्री आठ वाजून अठरा मिनिटांनी दरीतून बाहेर काढण्यात आला. शवविच्छेदनाची प्रक्रिया झाल्यानंतर मृतदेह नातलगांच्या ताब्यात दिले जातील. सोमवारी रात्री उशिरा पर्यंत मृतदेह सातारा जिल्ह्यात पोहोचण्याची शक्यता आहे.



रेस्क्यू टीमने दिलेल्या माहितीनुसार दरीत चक्काचूर झालेली स्कॉर्पिओ जीप आढळली. पाच मृतदेह जिथे स्कॉर्पिओ जीप आढळली त्याच भागात आढळले तर इतर तीन मृतदेह हे दरीत आणखी काही फूट खाली आढळले. गाडी जोरात दरीत कोसळली. वाहनाला मोठा धक्का बसला. यामुळे वाहनातील तीन तरुण बाहेर फेकले गेले आणि दरीत आणखी खाली कोसळले.


मृत तरुणांची नावं : महेश अनिल पवार (२५), आदित्य अशोक साळुंखे (२१), रितेश राजेंद्र लोखंडे (२५), सुहास जितेंद्र लोखंडे (२०), अंश समीर चव्हाण (१८), उत्कर्ष आनंद शिंगटे (२१), अनिल अभिमन्यू शिंगटे (२५), नितीन किसन नायकोंडे (३५)

Comments
Add Comment

Chhagan Bhujbal : राज्यात इंधनटंचाई नाही, नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये, छगन भुजबळांचे आवाहन

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात इंधन तुटवडा जाणवत आहे. पेट्रोल डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे.

Sindhudurg : सिंधुदुर्गातील वाढत्या पर्यटक संख्येचा विचार करून वाहतुकीचे नियोजन करा, पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर देशांतर्गत पर्यटनाला मोठी चालना मिळाली असून, सिंधुदुर्ग (Sindhudurg)

Pratap Sarnaik : अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना व्यवहारिक मराठीचे धडे; १५ ऑगस्टनंतर मुदतवाढ नाही

मुंबई : राज्यातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सहज बोलता, समजता आणि दैनंदिन व्यवहारात

NEET Paper Leak Case : प्रोफेसर शिवराज मोटेगावकरांच्या संपत्तीवर ईडीची नजर

लातूर : प्रोफेसर शिवराज मोटेगावकरांच्या संपत्तीवर ईडीची नजर देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट-यूजी परीक्षा

Rahul Narvekar : 'बकरी ईद' निमित्त अवैध जनावर वाहतुकीवर कारवाईचे निर्देश, राहुल नार्वेकर यांचे पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्तांना पत्र

मुंबई : राज्यात “बकरी ईद” निमित्त संभाव्य गोवंश हत्या रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश विधानसभा

Palghar Accident : पालघर अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत वितरित

मुंबई : पालघर जिल्ह्यातील धानिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या १३ नागरिकांच्या