बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोमातेच्या अवैध वाहतुकीविरोधात राज्य सरकारचा बुलडोझर; कठोर कारवाईचे आदेश— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा

मुंबई : आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यात गोमातेची अवैध वाहतूक, बेकायदेशीर कत्तलखाने आणि जनावरांवर होणाऱ्या अमानुष अत्याचारांविरोधात राज्य सरकारने आता कठोर भूमिका घेतली असून, “गोमातेची तस्करी आणि कत्तल कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही,” असा स्पष्ट आणि आक्रमक इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार परिवहन विभागाने संपूर्ण राज्यात विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक अधिकारी, सीमा तपासणी नाके, तसेच वाहतूक यंत्रणेला २५ मे ते २८ मे २०२६ या कालावधीत युद्धपातळीवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून राज्याने देशी गाईला ‘राज्यमाता’चा सन्मान दिला आहे. हिंदू समाजासाठी गोमाता ही श्रद्धेचा आणि संस्कृतीचा विषय आहे. अशा पवित्र गोमातेची कत्तल करून तिची अवैध वाहतूक करणाऱ्यांना आता कायद्याचा कठोर धडा शिकवला जाईल.”ते पुढे म्हणाले, “विशिष्ट सणांच्या काळात गोमातेची तस्करी वाढते, गोवंशाला कोंबून, उपाशी ठेवून, अमानुष पद्धतीने वाहनांमध्ये भरले जाते. हा केवळ कायद्याचा भंग नसून हिंदू समाजाच्या श्रद्धांवर घाला आहे. अशा गोतस्करांविरोधात कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल.”परिवहन आयुक्त कार्यालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, राज्यातील सीमावर्ती भाग, मुंबईसह प्रमुख शहरे आणि संवेदनशील मार्गांवर विशेष नाकाबंदी व वाहन तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. जनावरांची वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जाणार असून, आवश्यक परवानग्या, प्रमाणपत्रे आणि प्राणी कल्याण नियमांचे पालन झाले आहे का, याची पाहणी केली जाईल.


सरनाईक यांनी स्पष्ट केले की, “मोटार वाहन कायदा, प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा आणि केंद्र शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही. नियमबाह्य वाहतूक करणारी वाहने थेट जप्त करण्यात येतील.”या मोहिमेत परिवहन विभागासोबत स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस, पशुसंवर्धन विभाग आणि विविध गोसेवा व प्राणी कल्याण संस्थांचा समन्वय साधण्यात येणार आहे. अवैध कत्तलखान्यांना होणारा जनावरांचा पुरवठा रोखण्यासाठी विशेष पथकेही नियुक्त करण्यात आली आहेत.“गोमाता संरक्षण हा केवळ कायद्याचा विषय नसून हिंदुत्वाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. मुक्या जनावरांवर अत्याचार करणाऱ्यांविरोधात सरकार झुकणार नाही. राज्य सरकार गोसंरक्षणासाठी कटिबद्ध आहे,” असेही प्रताप सरनाईक यांनी ठामपणे सांगितले.या विशेष मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल शासनाला सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

Metro : मेट्रो-४ मोगरपाडा कारडेपो मार्गासाठीचा मार्ग मोकळा

मुंबई : मुंबई मेट्रो-४ आणि ४ए वडाळा-मुलुंड-ठाणे-कासारवडवली-गायमुख या महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पासाठी ठाणे

Monsoon Update : मुंबईत मान्सूनच्या आगमनासाठी २० जून उजाडणार ?

Mumbai: अरबी समुद्रातील मान्सूनची शाखा सक्रिय असली तरी महाराष्ट्रातील मान्सूनचा पुढील प्रवास लांबल्याचे दिसत आहे.

Bhimashankar : ‘भीमाशंकर हेरिटेज वाडी’ प्रकल्पामुळे परिसराचे होणार परिवर्तन

मुंबई : भीमाशंकर परिसराचा धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या शाश्वत विकास साधण्यासाठी प्रस्तावित करण्यात

Legal notice served to Amazon : महान गणितज्ञ ‘आर्यभट्ट’ यांच्या विडंबन प्रकरणी ॲमेझॉन इंडियाला कायदेशीर नोटीस!

मुंबई : प्राचीन भारताचे महान गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ 'आर्यभट्ट' यांचे व्यावसायिक जाहिरातीत अत्यंत हीन

Mumbai pune housing projects : महामुंबईतील २ लाख घरांचे स्वप्न 'रखडणार'? युद्धामुळे बांधकाम क्षेत्रासमोर मोठे संकट

Mumbai : चालू वर्षात आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो घरखरेदीदारांसाठी एक

Navi Mumbai Crime : ऑनलाइन गेमिंगच्या नादात रिक्षाचालकाची सव्वाकोटींची फसवणूक, तर मंदिरात पुजाऱ्याचाच चोरीचा प्रयत्न

Navi Mumbai : नवी मुंबई परिसरात गुन्हेगारीच्या दोन वेगळ्या घटनांनी खळबळ उडाली आहे. एका घटनेत ऑनलाइन गेमिंगच्या