CM Suvendu Adhikari Big Decision : बेकायदेशीर स्थलांतरितांवर कठोर कारवाईचा इशारा; पश्चिम बंगाल सरकार बांगलादेशी-रोहिंग्यांना परत पाठवणार

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांविरोधात राज्य सरकारने मोठे आणि निर्णायक पाऊल उचलले आहे. बांगलादेशी आणि रोहिंग्या नागरिकांना त्यांच्या मूळ देशात परत पाठवण्यासाठी विशेष तात्पुरती निवास केंद्रे (Detention/Transit Centres) स्थापन करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. (CM Suvendu Adhikari Big Decision)



या संदर्भात राज्य सरकारकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना लेखी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या असून, त्यांच्या कार्यक्षेत्रात योग्य ठिकाणांची निवड करून ही केंद्रे तातडीने कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेषतः सीमावर्ती जिल्हे आणि संवेदनशील भागांवर प्रशासनाचे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे, जिथे अवैध स्थलांतरित लपून बसण्याची शक्यता अधिक असल्याचे मानले जात आहे. (CM Suvendu Adhikari Big Decision)


सरकारच्या या निर्णयामागे अवैध स्थलांतरितांवर अधिक काटेकोरपणे नजर ठेवणे आणि त्यांच्या ओळख पडताळणीची प्रक्रिया जलद करणे हा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पकडण्यात आलेल्या बेकायदेशीर स्थलांतरितांना थेट कारागृहात न ठेवता या तात्पुरत्या केंद्रांमध्ये ठेवले जाणार आहे. ओळख निश्चित झाल्यानंतर त्यांना कायदेशीर प्रक्रियेनुसार त्यांच्या देशात परत पाठवले जाणार आहे. (CM Suvendu Adhikari Big Decision)



दरम्यान, निवडणूक प्रचारादरम्यान भारतीय जनता पक्षाने राज्यातील अवैध स्थलांतर थांबवण्याचे आणि घुसखोरीवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्या पार्श्वभूमीवर आता सत्ता आल्यानंतर हे आश्वासन प्रत्यक्ष कृतीत उतरवले जात असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे. (CM Suvendu Adhikari Big Decision)


सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील सुरक्षा, सीमावर्ती व्यवस्थापन आणि स्थलांतर धोरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : 'युवकांना स्वावलंबी बनवणे हे सरकारचे ध्येय'

नवी दिल्ली: 'विकसित वायब्रंट व्हिलेज कार्यक्रम २०२६' च्या सहभागींसोबत रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे

Amit Shah : युवा पिढी आणि विद्यार्थी आमच्यासाठी महत्वाचे : अमित शाह

धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या कामाचंही कौतुक नवी दिल्ली : भाजप कार्यकर्त्यांसाठी पदापेक्षा देश खूप जास्त

Karnataka Politics : '२०२८ ची कर्नाटक विधानसभा निवडणूक लढवणार नाही': माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या

बंगळुरु : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी निवडणूक राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

Assam Factory Blast : आसाममधील रॉड मॅन्युफॅक्चरिंग कारखान्यात भीषण स्फोट; ४ कामगारांचा मृत्यू

दिसपुर : आसाममधील कछार जिल्ह्यात रविवारी सकाळी रॉड उत्पादन करणाऱ्या एका कारखान्यात भीषण स्फोट होऊन किमान चार

Viral Love Story : NEET आंदोलनात गेले अन् जुळली रेशीमगाठ; जंतर-मंतरवर घडली अनोखी प्रेमकहाणी

Viral Love Story : दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेले नीट परीक्षा गैरप्रकाराविरोधातील आंदोलन देशभर चर्चेत

Kargil Vijay Diwas : कारगिलपासून ऑपरेशन सिंदूरपर्यंत! भारतीय लष्कराच्या 'या' १० मोहिमांनी जगाला दाखवली ताकद

ऑपरेशन विजय (1999) (Operation Vijay) कारगिल युद्धात पाकिस्तानी घुसखोरांना हुसकावून लावत भारताने २६ जुलै १९९९ रोजी विजय