CM Suvendu Adhikari Big Decision : बेकायदेशीर स्थलांतरितांवर कठोर कारवाईचा इशारा; पश्चिम बंगाल सरकार बांगलादेशी-रोहिंग्यांना परत पाठवणार

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांविरोधात राज्य सरकारने मोठे आणि निर्णायक पाऊल उचलले आहे. बांगलादेशी आणि रोहिंग्या नागरिकांना त्यांच्या मूळ देशात परत पाठवण्यासाठी विशेष तात्पुरती निवास केंद्रे (Detention/Transit Centres) स्थापन करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. (CM Suvendu Adhikari Big Decision)



या संदर्भात राज्य सरकारकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना लेखी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या असून, त्यांच्या कार्यक्षेत्रात योग्य ठिकाणांची निवड करून ही केंद्रे तातडीने कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेषतः सीमावर्ती जिल्हे आणि संवेदनशील भागांवर प्रशासनाचे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे, जिथे अवैध स्थलांतरित लपून बसण्याची शक्यता अधिक असल्याचे मानले जात आहे. (CM Suvendu Adhikari Big Decision)


सरकारच्या या निर्णयामागे अवैध स्थलांतरितांवर अधिक काटेकोरपणे नजर ठेवणे आणि त्यांच्या ओळख पडताळणीची प्रक्रिया जलद करणे हा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पकडण्यात आलेल्या बेकायदेशीर स्थलांतरितांना थेट कारागृहात न ठेवता या तात्पुरत्या केंद्रांमध्ये ठेवले जाणार आहे. ओळख निश्चित झाल्यानंतर त्यांना कायदेशीर प्रक्रियेनुसार त्यांच्या देशात परत पाठवले जाणार आहे. (CM Suvendu Adhikari Big Decision)



दरम्यान, निवडणूक प्रचारादरम्यान भारतीय जनता पक्षाने राज्यातील अवैध स्थलांतर थांबवण्याचे आणि घुसखोरीवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्या पार्श्वभूमीवर आता सत्ता आल्यानंतर हे आश्वासन प्रत्यक्ष कृतीत उतरवले जात असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे. (CM Suvendu Adhikari Big Decision)


सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील सुरक्षा, सीमावर्ती व्यवस्थापन आणि स्थलांतर धोरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Madhya Pradesh : अफवा पसरली आणि रेल्वे रुळावर मोठी दुर्घटना झाली

मोरेना : मध्य प्रदेशमधील मोरेना जिल्ह्यातील हेतमपूर - घेर विभागाजवळ अफवा पसरल्यामुळे रेल्वे रुळावर मोठी

NDA : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर एनडीएच्या पहिल्या बॅचमध्ये १४ महिला अधिकारी सज्ज

देहरादून : सर्वोच्च न्यायालयाच्या २०२१ मधील ऐतिहासिक निर्णयामुळे नॅशनल डिफेन्स अकादमीमध्ये (एनडीए) महिलांच्या

Virat-1' ship sinks off : ओमानच्या किनाऱ्याजवळ 'विराट-१' जहाज बुडाले, अमेरिकी नौदलाकडून १४ भारतीय खलाशांची सुटका

नवी दिल्ली : आखाती प्रदेशात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, आणखी एक मोठा सागरी अपघात घडला आहे. भारतीय जहाज

E100 Fuel Nitin Gadkari : "काल रात्री ८ वाजता फाईलवर सही केली"; E100 इंधनाला हिरवा कंदील, नितीन गडकरींची मोठी घोषणा

पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक तेलबाजारात अस्थिरता वाढत असताना भारताने पर्यायी इंधनाच्या

Indian Army Uniform 2026 : ब्रिटिशकालीन परंपरांना रामराम! भारतीय लष्कराच्या गणवेशात मोठे बदल; ‘बंदी जॅकेट’ला मान्यता

भारतीय लष्कराने (Indian Army) वसाहतकालीन परंपरांपासून दूर जात आपल्या गणवेश संहितेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. औपचारिक

Jharkhand News : झारखंडमध्ये वीज कोसळून ७ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये महिला आणि १० वर्षीय मुलाचा समावेश

झारखंड : झारखंडमध्ये (Jharkhand) मान्सूनपूर्व (Pre-Monsoon) काळात वीज कोसळण्याच्या (Lightning Strike) घटनांमध्ये गेल्या २४ तासांत ७ जणांचा