Monsoon : मोसमी पाऊस ६ जूनला कोकणात, ७ जूनला पुण्यात पोहोचणार

मुंबई : हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पावसाचा प्रवास असाच सुसाट राहिल्यास ५ जूनला गोव्यात दाखल होण्याची शक्यता आहे. ६ जूनला कोकणात आणि ७ जूनला पुण्यात पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे. आता पाऊस महाराष्ट्रात नेमका कधी दाखल होणार? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


भीषण उकाड्याने आणि वाढत्या तापमानाने हैराण झालेल्या नागरिकांसाठी पावसाच्या आगमनाची दिलासादायक अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, शनिवारी नैऋत्य मान्सूनने नैऋत्य अरबी समुद्र, आग्नेय अरबी समुद्र, कोमोरिन परिसर तसेच बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत यशस्वी प्रगती केली आहे. पुढील ३ ते ४ दिवसांत मान्सून आणखी वेगाने पुढे सरकण्यासाठी अत्यंत अनुकूल आणि पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. या आगामी काळात नैऋत्य व आग्नेय अरबी समुद्र, कोमोरिन क्षेत्र, बंगालच्या उपसागराचा आणखी मोठा भाग आणि उर्वरित अंदमान समुद्र मान्सूनच्या कक्षेत येण्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


यंदा नैऋत्य मान्सून वेळेआधीच केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. सामान्यत: १ जूनच्या सुमारास पोहोचणारा मान्सून यंदा २६ मे रोजीच केरळ किनारपट्टीवर धडकू शकतो. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र अधिक सक्रिय झाल्याने मान्सूनचा वेग वाढला आहे. विशेष म्हणजे, यंदा मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात कोणतेही चक्रीवादळ निर्माण झालेले नाही. त्यामुळे मान्सूनच्या प्रवासात कोणताही मोठा अडथळा येणार नसून तो सुरळीत पुढे सरकणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

Central Railway : मुसळधार पावसानंतर रेल्वेची शर्यत! लोणावळा–कर्जत मार्गावर १,१०० हून अधिक कामगारांचे युद्धपातळीवर काम; एक रेल्वे मार्ग सुरू

मुंबई : लोणावळा–कर्जत घाट विभागात मुसळधार पावसामुळे झालेल्या दरडी कोसळण्याच्या घटनेनंतर मध्य रेल्वेने रेल्वे

Hasan Mushrif : राज्यात नर्सिंग शिक्षणाच्या विस्ताराला मान्यता - मंत्री हसन मुश्रीफ

- कमी शुल्कामध्ये दर्जेदार शिक्षण उपलब्ध होणार मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्थेसाठी कुशल परिचारिकांची

Devendra Fadnavis : सावंतवाडीत आता 'राजधानी'सह ३ महत्त्वाच्या गाड्या थांबणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

- रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून मंजुरीचे पत्र मुंबई : कोकण रेल्वेवरील प्रवाशांसाठी आणि विशेषतः

Pratap Sarnaik : एसटी महामंडळाचा कायापालट होणार; जुन्या बसेस बदलून ताफ्यात ई-बसेस येणार

- दुर्गम भागासाठी २००० मिडी बसेस सज्ज; मंत्री प्रताप सरनाईक यांची विधानपरिषदेत घोषणा मुंबई : भविष्यात एसटी

Devendra Fadnavis : मुंबईच्या पूर नियंत्रणासाठी १३ हजार कोटींचा आराखडा; मुख्यमंत्र्यांची घोषणा

- 'फडणवीसांना बदनाम करा, पण महाराष्ट्राला नको', विरोधकांना आवाहन मुंबई : "मुंबईला दरवर्षी भेडसावणाऱ्या

Mumbai Tree Collapse : वादळ आणि पावसात उन्मळून पडणाऱ्या झाडांचे जोखीम मूल्यांकन सुरू

मुंबई : मुंबईतील वाढत्या वादळी वाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर वृक्षसंवर्धन आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुंबई