बिहार : प्रेम आंधळं असतं , असं म्हटलं जातं. प्रेमात कोण काय करेल काही सांगता येत नाही. बिहारच्या रोहतास जिल्ह्यात प्रेमप्रकरणाचे असेच खळबळजनक उदाहरण समोर आले आहे. घरात कोंबडा कापून ते रक्त सर्वत्र सांडवले आणि स्वतःचा खून किंवा अपहरण झाल्याचा बनाव रचून १६ वर्षीय मुलगी प्रियकरासोबत पळून गेली. १५ दिवस या मुलीचा शोध सुरु होता. अखेर तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आणि सत्य समोर आले. या धक्कादायक प्रकारामुळे तिचे कुटुंबच नाही तर पोलीस चक्रावून गेले.
बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील बढीहा गावात ही घटना घडली. ३० एप्रिलच्या रात्री एक अल्पवयीन मुलगी अचानक घरातून बेपत्ता झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तिच्या कुटुंबीयांनी पाहिले, तेव्हा घराच्या अंगणात आणि इतर ठिकाणी रक्ताचे मोठे डाग पडले होते. रक्त पाहून कुटुंबीय घाबरून गेले. मुलीचा घातपात झाल्याच्या भीतीने संपूर्ण कुटुंब हादरले. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनीही तात्काळ गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरवली.
नवी मुंबई : भारताचे स्वप्न असलेल्या मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल (बुलेट ट्रेन) प्रकल्पाने आता अधिक गती घेतली आहे. या महाकाय प्रकल्पातील सर्वात ...
बिहारमध्ये पळाले महाराष्ट्रात आले
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. १५ दिवस झाले तरी मुलीचा काही शोध लागत नव्हता. अखेर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, मोबाईल कॉल डिटेल्स आणि लोकेशन ट्रॅकिंगचा आधार घेत तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती समजली. ती म्हणजे मुलगी सुरक्षित असून ती स्वतःच्या मर्जीने मयंक कुमार नावाच्या तरुणासोबत पळून गेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे दोघेही पोलिसांना गुंगारा देऊन थेट महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात येऊन राहत होते. माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक तातडीने महाराष्ट्रात रवाना झाले. त्यांनी भिवंडीतून मुलीला ताब्यात घेतले, तर आरोपी युवक मयंक कुमार याला अटक करण्यात आली आहे. तो अकोढीगोला परिसरातील बांक गावचा रहिवासी आहे.
मुंबई : राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक व कायदेविषयक प्रश्नांचा सर्वंकष विचार करून त्यांना विविध शासकीय योजनांचा ...
असा रचला कट
पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. संबंधित मुलगी आणि मयंक यांच्यात गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, अल्पवयीन असल्यामुळे आणि कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध होईल या भीतीने त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. पोलिसांना समजू नये आणि कुटुंबीयांचे लक्ष भरकटवण्यासाठी त्यांनी हा कट रचला. योजनेनुसार मुलीने घरात कोंबडा कापून तिचे रक्त अंगणात शिंपडले, जेणेकरून सर्वांना आपला खून किंवा अपहरण झाल्याचा संशय येईल आणि कोणी आपला शोध घेणार नाही. मात्र, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा यशस्वी छडा लावला, अशी माहिती देहरीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुलेश झा यांनी दिली.