Crime News : घरात रक्ताचा सडा, १६ वर्षाची मुलगी बेपत्ता; सत्य समोर येताच कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली

बिहार : प्रेम आंधळं असतं , असं म्हटलं जातं. प्रेमात कोण काय करेल काही सांगता येत नाही. बिहारच्या रोहतास जिल्ह्यात प्रेमप्रकरणाचे असेच खळबळजनक उदाहरण समोर आले आहे. घरात कोंबडा कापून ते रक्त सर्वत्र सांडवले आणि स्वतःचा खून किंवा अपहरण झाल्याचा बनाव रचून १६ वर्षीय मुलगी प्रियकरासोबत पळून गेली. १५ दिवस या मुलीचा शोध सुरु होता. अखेर तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आणि सत्य समोर आले. या धक्कादायक प्रकारामुळे तिचे कुटुंबच नाही तर पोलीस चक्रावून गेले.


बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील बढीहा गावात ही घटना घडली. ३० एप्रिलच्या रात्री एक अल्पवयीन मुलगी अचानक घरातून बेपत्ता झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तिच्या कुटुंबीयांनी पाहिले, तेव्हा घराच्या अंगणात आणि इतर ठिकाणी रक्ताचे मोठे डाग पडले होते. रक्त पाहून कुटुंबीय घाबरून गेले. मुलीचा घातपात झाल्याच्या भीतीने संपूर्ण कुटुंब हादरले. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनीही तात्काळ गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरवली.




बिहारमध्ये पळाले महाराष्ट्रात आले


या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. १५ दिवस झाले तरी मुलीचा काही शोध लागत नव्हता. अखेर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, मोबाईल कॉल डिटेल्स आणि लोकेशन ट्रॅकिंगचा आधार घेत तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती समजली. ती म्हणजे मुलगी सुरक्षित असून ती स्वतःच्या मर्जीने मयंक कुमार नावाच्या तरुणासोबत पळून गेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे दोघेही पोलिसांना गुंगारा देऊन थेट महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात येऊन राहत होते. माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक तातडीने महाराष्ट्रात रवाना झाले. त्यांनी भिवंडीतून मुलीला ताब्यात घेतले, तर आरोपी युवक मयंक कुमार याला अटक करण्यात आली आहे. तो अकोढीगोला परिसरातील बांक गावचा रहिवासी आहे.




असा रचला कट


पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. संबंधित मुलगी आणि मयंक यांच्यात गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, अल्पवयीन असल्यामुळे आणि कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध होईल या भीतीने त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. पोलिसांना समजू नये आणि कुटुंबीयांचे लक्ष भरकटवण्यासाठी त्यांनी हा कट रचला. योजनेनुसार मुलीने घरात कोंबडा कापून तिचे रक्त अंगणात शिंपडले, जेणेकरून सर्वांना आपला खून किंवा अपहरण झाल्याचा संशय येईल आणि कोणी आपला शोध घेणार नाही. मात्र, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा यशस्वी छडा लावला, अशी माहिती देहरीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुलेश झा यांनी दिली.

Comments
Add Comment

Mango Juice Caused Poisoned : "आंब्याचा रस पिल्याने एकाच कुटुंबातील 7 जणांना झाली विषबाधा !"

अहिल्यानगर : मुंबईत गेल्या महिन्यात एकाच कुटुंबात चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.

24 Nigerians Arrested From Palava city : ठाणे पोलिसांची धडक कारवाई! पलावा सिटीमधून २४ नायजेरियन ताब्यात; ड्रग्ज रॅकेटशी संबंधांचा तपास

ठाणे : ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्तरित्या राबवलेल्या मोठ्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये खोणी-पलावा परिसरातून

LSG vs PBKS : मिशेल मार्श संघाबाहेर, पण पंजाबसाठी खरा धोका या माजी खेळाडूकडून

IPL 2026: आयपीएल २०२६ मधील लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामना प्लेऑफच्या दृष्टीने अत्यंत

Mumbai-Ahmedabad Bullet Train : बुलेट ट्रेनच्या कामाला वेग! २१ किमीच्या भुयारी मार्गासाठी घणसोलीत दुसरं महाकाय 'TBM' कटरहेड सज्ज

नवी मुंबई : भारताचे स्वप्न असलेल्या मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल (बुलेट ट्रेन) प्रकल्पाने आता अधिक गती घेतली आहे.

एकल महिलांसाठी राज्य सरकार आणणार धोरण

मुंबई : राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक व कायदेविषयक प्रश्नांचा सर्वंकष विचार

M.S. Dhoni : "एम.एस. धोनीला प्रशिक्षक बनवा," आर. अश्विनचा सीएसकेला सल्ला

नवी दिल्ली : चेन्नई सुपर किंग्सचा सध्याचा हंगाम चांगला गेलेला नाही. पाच वेळा विजेतेपद पटकावलेला हा संघ आयपीएल