Sindhudurg News : समुद्रात उतरण्याआधी आईशी झाला शेवटचा संवाद; तारकर्लीत पुण्याचा तरुण बुडून बेपत्ता

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली एमटीडीसीसमोरील समुद्रात आंघोळीसाठी उतरलेल्या पुण्यातील दोन पर्यटकांपैकी एक तरुण पाण्यात बुडून बेपत्ता झाला. ही हृदयद्रावक घटना काल सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. स्थानिक ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता समुद्रात उड्या मारत एका तरुणाला सुखरूप बाहेर काढले, मात्र दुसरा तरुण लाटांच्या तडाख्यात खोल समुद्रात वाहून गेला.



समर्थ गणेश कर्पे (वय २२, रा. आंबेगाव, पुणे) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव असून ऋषभ रविकिरण कदम याला स्थानिकांच्या मदतीने वाचवण्यात आले. सध्या त्याच्यावर मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, समर्थ कर्पे आणि ऋषभ कदम हे दोघेही पुण्यातील ‘रेवती एन्टरप्रायजेस’मध्ये कार्यरत होते. १९ मे रोजी ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते. समाजकल्याण विभागाशी संबंधित कार्यालयीन काम पूर्ण केल्यानंतर त्यांनी मालवणमध्ये पर्यटनासाठी थांबण्याचा निर्णय घेतला होता.



दुपारच्या सुमारास दोघेही तारकर्ली येथील एमटीडीसी रिसॉर्टसमोरील समुद्रात आंघोळीसाठी उतरले. सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र काही वेळातच समुद्रातील पाण्याचा वेग आणि वाढत्या लाटांचा अंदाज न आल्याने दोघेही खोल पाण्याकडे ओढले जाऊ लागले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच त्यांनी मदतीसाठी जोरदार आरडाओरडा सुरू केला.


किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या स्थानिक ग्रामस्थांनी त्यांचा आवाज ऐकताच क्षणाचाही विलंब न लावता समुद्रात उड्या मारल्या. संकेत तारी, दत्तराज चव्हाण, वैभव खोबरेकर, महेंद्र चव्हाण आणि वैभव सावंत या ग्रामस्थांनी मोठ्या धाडसाने बचावकार्य सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर त्यांनी ऋषभ कदम याला सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले. मात्र समर्थ कर्पे हा प्रचंड वेगाने येणाऱ्या लाटांमध्ये अडकला आणि खोल समुद्रात वाहून गेला.



दरम्यान, ऋषभची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्याची गरज होती. यासाठी ‘१०८’ रुग्णवाहिकेला संपर्क करण्यात आला होता. मात्र तब्बल अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली नाही. अखेर वेळ न दवडता स्थानिकांनीच पुढाकार घेत ऋषभला दुचाकीवरून मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.


या संपूर्ण घटनेतील सर्वाधिक हळवी आणि मन सुन्न करणारी बाब म्हणजे, समुद्रात उतरण्यापूर्वी समर्थ कर्पे याचा त्याच्या आईसोबत झालेला शेवटचा संवाद. समुद्रकिनारी असताना ऋषभच्या मोबाईलवर समर्थच्या आईचा फोन आला होता. ऋषभने तो फोन समर्थकडे दिला. समर्थने आईशी काही वेळ निवांत संवाद साधला, त्यानंतर फोन ठेवला आणि पुन्हा समुद्रात उतरला. मात्र काही क्षणांतच ही दुर्दैवी घटना घडली.

Comments
Add Comment

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

मुंबई : जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहक

Madhuri Dixit : कोण होणार करोडपतीच्या एका सीझनसाठी माधुरी घेणार इतके मानधन...

मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि रंजक मनाला जाणारा क्विज शो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' नेहमीच

Supriya Sule and Vinod Tawde : सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे बैठक सोडून अचानक निघाले, एका कारमधून गेले; चर्चेला उधाण

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच एक

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Bharat Gogawale : नाशिकला गिरीश महाजन आणि रायगडमध्ये भरत गोगावले करणार ध्वजारोहण

मुंबई : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या शासकीय समारंभासाठी राज्य शासनाकडून जिल्हा निहाय ध्वजारोहण