Pune Crime : जेलमध्ये असूनही बंडू आंदेकरचं नेटवर्क सक्रिय? पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान

पुणे : पुण्यातील गँगवॉर आता अत्यंत धोकादायक वळणावर पोहोचले असून, तुरुंगात असतानाही बंडू आंदेकर टोळीचे नेटवर्क सक्रिय असल्याचा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे. बंडू आंदेकर आणि त्याचे साथीदार कारागृहात असतानाही बाहेरच्या गुन्हेगारी हालचालींवर नियंत्रण ठेवत असल्याच्या चर्चेमुळे पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. तुरुंगातूनच खून, हल्ले आणि सूडाच्या कारवायांचे आदेश दिले जात असल्याचा आरोप पुढे आल्याने कारागृह प्रशासन आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.


माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर पुण्यातील टोळीयुद्ध अधिकच भडकले. या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने नवीन आणि धोकादायक पद्धत अवलंबल्याचे समोर येत आहे. मुख्य आरोपी तुरुंगात असल्याने त्यांच्यापर्यंत थेट पोहोचणे शक्य नसल्याने, त्यांच्या कुटुंबियांना आणि जवळच्या नातेवाईकांना लक्ष्य करण्यात येत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे हे टोळीयुद्ध आता वैयक्तिक सूडातून कुटुंबियांपर्यंत पोहोचल्याचे दिसून येत आहे.



कल्याणी कोमकर यांनी केलेल्या आरोपांनुसार, बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकर हे तुरुंगातून फोनच्या माध्यमातून बैठका घेत आहेत. या बैठकीतून बाहेरील हालचाली नियंत्रित केल्या जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे आरोप खरे ठरल्यास कारागृहातील सुरक्षा व्यवस्था आणि कैद्यांवर असलेले नियंत्रण यावर गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात.


दरम्यान, आंदेकर टोळीचे नेटवर्क पोलिसांच्या माहिती यंत्रणेपेक्षाही वेगाने काम करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. बुधवारी सकाळी भररस्त्यात अक्षय म्हस्केवर करण्यात आलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर ही चर्चा आणखी तीव्र झाली. अक्षयच्या हालचालींची अचूक माहिती मारेकऱ्यांकडे आधीपासूनच होती, असे या घटनेवरून स्पष्ट होत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे तुरुंगात बसून बाहेरील हालचालींवर इतक्या अचूकपणे नियंत्रण कसे ठेवले जाते, हा प्रश्न उपस्थित होत आहे.



वनराज आंदेकर हत्या प्रकरणानंतर घडलेले हे तिसरे मोठे प्रकरण मानले जात आहे. याआधी गणेश कोमकर यांचा मुलगा आयुष कोमकर याची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर समीर काळेचा भाऊ गणेश काळे यालाही लक्ष्य करण्यात आले. आता नाशिक कारागृहात असलेल्या आकाश म्हस्केचा भाऊ अक्षय म्हस्के याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या सलग घटनांमुळे पुण्यातील टोळीयुद्ध अधिक रक्तरंजित होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.


आरोपी तुरुंगात असल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना लक्ष्य करून मानसिक आणि कौटुंबिक दबाव निर्माण करण्याची ही नवी पद्धत असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे केवळ गुन्हेगारच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबियांच्याही सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. पुण्यासारख्या शहरात अशा प्रकारे उघडपणे सूडाची मालिका सुरू राहिल्याने नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



बालाजीनगर गोळीबार प्रकरणात बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. मात्र, तुरुंगातून सुरू असलेल्या कथित फोन मीटिंग्स, बाहेरील संपर्क आणि या नेटवर्कमागील सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश येणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पुणे पोलिसांसमोर या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करून गँगवॉर थांबवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

Comments
Add Comment

Kurla Landslide: कुर्ला पश्चिम बुद्ध कॉलनीसमोर दरड कोसळली, तीन कुटुंबांना पर्यायी जागेत हलवले

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कुर्ला पश्चिम येथील बुद्ध कॉलनीसमोरील दरडीच (Kurla Landslide) काही भाग कोसळण्याची घटना मंगळवारी

Powai Lake : पवई तलाव भरला, पण मुंबईकरांना नाही काही फायदा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील (Mumbai) कृत्रिम तलावापैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव

BMC : महापालिका निवृत्त शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी शुक्रवारी पेन्शन अदालत

प्रलंबित निवृत्तीवेतन प्रकरणे निकाली काढण्यावर भर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण

BMC : पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी ६८१ शोष खड्डे

तब्बल ५७६ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर उभारणी पाणी मुरवण्याची सोय आतापर्यंत ७०० पैंकी ५७६ किलोमीटर

Chembur Bus Accident : चेंबूरमधील झाड दुघर्टनेेचे स्थायी समितीत तीव्र पडसाद

उद्यान अधिकारी, रस्ते अभियंता आणि सहायक आयुक्तांना निलंबित करा त्रयस्थ व्यक्ती मार्फत चौकशी करण्याचे स्थायी

महिला शेतकऱ्यांच्या श्रमाला कायद्याचे कवच

विधानसभेत विशेष विधेयक; जमिनीची प्रत्यक्ष मालकी नसली तरी योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा मुंबई (सुहास