Bandra News : वांद्रे परिसरातील जागेवरील कारवाईदरम्यान राडा; जमावाला रोखण्यासाठी पोलिसांची धडक कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरातील गरीबनगर भागात अवैध बांधकामांवर सुरू असलेल्या कारवाईदरम्यान सलग दुसऱ्या दिवशी मोठा तणाव निर्माण झाला. रेल्वे रुळालगत उभारण्यात आलेल्या अनधिकृत वस्त्या हटवण्यासाठी प्रशासन आणि पालिकेचं पथक घटनास्थळी पोहोचताच स्थानिक नागरिक आक्रमक झाले. कारवाई रोखण्यासाठी संतप्त जमावाने प्रशासन आणि पोलिसांच्या दिशेनं बादल्या, पाण्याच्या बाटल्या तसेच घरातील विविध वस्तू फेकून जोरदार विरोध दर्शवला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केला. त्यामुळे परिसरात काही काळ भीती आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.



गरीबनगर परिसरात रेल्वेच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं उभारण्यात आली होती. काही ठिकाणी चार मजली इमारती तर काही भागात मोबाईल टॉवरदेखील उभारण्यात आल्याचं प्रशासनाच्या पाहणीत समोर आलं आहे. यापूर्वी पालिकेनं संबंधितांना नोटिसा बजावून जागा रिकामी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतरही अतिक्रमण हटवण्यात आलं नसल्याने प्रशासनाने अखेर मोठी तोडक कारवाई सुरू केली. या मोहिमेत काही अनधिकृत धार्मिक स्थळांचाही समावेश करण्यात आला आहे.



पालिकेच्या नियोजनानुसार दोन दिवसांत झोपडपट्टी परिसरातील सुमारे ५०० घरांवर कारवाई केली जाणार आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार १०० घरांना तात्पुरतं संरक्षण देण्यात आल्यानं त्या घरांवर सध्या कारवाई होणार नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


दरम्यान, मुंबई महानगर क्षेत्रात वाढत्या प्रवासी संख्येमुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर अतिरिक्त लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्याची रेल्वेची योजना आहे. सध्या मुंबईतील रेल्वे टर्मिनसवर वाढत्या गर्दीचा ताण जाणवत असून अतिरिक्त टर्मिनल स्टेशन आणि नव्या प्लॅटफॉर्मची गरज निर्माण झाली आहे.



याच पार्श्वभूमीवर वांद्रे टर्मिनसच्या विस्ताराचं काम हाती घेण्यात येणार आहे. सध्या असलेलं डिझेल शेड स्थलांतरित करून त्या जागेवर नवीन प्लॅटफॉर्म उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. सात विद्यमान प्लॅटफॉर्मच्या पुढे आणखी प्लॅटफॉर्म तयार करण्यात येणार असून त्यामुळे भविष्यात अधिक गाड्या हाताळणं शक्य होणार आहे. प्रशासनानं ही संपूर्ण तोडक कारवाई १९ मे ते २३ मे या पाच दिवसांच्या कालावधीत पूर्ण करण्याचं नियोजन केलं आहे.

Comments
Add Comment

Mantralaya Water : 'मंत्रालयातील पाणी पूर्णपणे सुरक्षित'; टाक्यांची स्वच्छता, वॉटर प्युरिफायर सर्व्हिसिंग पूर्ण, BMCचा अहवाल दिलासा देणारा

मुंबई : मंत्रालयातील पाणीपुरवठ्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनंतर सार्वजनिक बांधकाम

Monsoon Update : राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात अलर्ट

मुंबई(Mumbai) : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचे स्वरूप विस्कळीत राहिले होते. मात्र आता राज्यातील अनेक

Chandrashekar Bawankule : नायब तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा

 महसूल विभागाच्या सेवा नियमांत ५० वर्षांनी बदल; मुख्यमंत्र्यांकडून प्रस्तावाला मान्यता मुंबई : महसूल

MIDC Maharashtra : वैभववाडी 'MIDC'ला मूर्त रूप, पायाभूत सुविधांची कामे तातडीने सुरू करण्याचे मंत्री उदय सामंतांचे निर्देश

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत मंत्रालयात बैठक मुंबई :

Mumbai Police : CJPच्या आंदोलनानंतर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; ८ पोलीस ठाण्यांत ९०० हून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील CJP आंदोलनानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत शहरातील आठ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

NITI Aayog Investment Index : नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

५६.६ गुणांसह गुजरात पहिले; तामिळनाडूचा तिसरा क्रमांक मुंबई(Mumbai) : देशातील राज्यांमध्ये गुंतवणुकीला पोषक वातावरण,