उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एअर इंडियाच्या प्रवासी विमानाने दिल्लीला रवाना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला शिंदे यांचा प्रतिसाद


खाजगी विमानाऐवजी प्रवासी विमानाला दिले प्राधान्य


मुंबई:-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या नियोजित दिल्ली दौऱ्यासाठी खाजगी विमानाऐवजी एअर इंडियाच्या प्रवासी विमानातून करण्याचा निर्णय घेतला. आज दुपारी ४ वाजताच्या एअर इंडियाच्या प्रवासी विमानाद्वारे मुंबईहून दिल्लीला रवाना झाले.


यावेळी शिंदे यांचे मुंबई विमानतळावर उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी अनेकांनी त्यांच्यासोबत फोटो काढून घेतले. तर काहींनी त्यांना भेटून आपले निवेदन त्यांच्या हाती दिले. या सर्वांना भेटून त्यांचे अभिवादन स्वीकारत शिंदे यांनी आपले विमान गाठले.केंद्रीय नगरविकास विभागाच्या वतीने दिल्लीत स्वच्छ भारत मिशन अर्बन २.० ची विशेष आढावा बैठक आज आणि उद्या दिल्लीत आयोजित केली आहे. या बैठकीत सहभागी होण्यासाठी शिंदे आज दुपारी दिल्लीला रवाना झाले. उद्या ते स्वतः या बैठकीत सहभागी होणार आहेत. एरवी खाजगी विमानाने प्रवास करणाऱ्या शिंदे यांनी यावेळी मात्र सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे प्रवासी विमानाने दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला.



जागतिक बाजारपेठेत तेलाचा किंमती वाढल्याने भविष्यातील धोका ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना इंधन बचतीचा संदेश दिला होता. या संदेशाचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी देशातील आपल्या राजकीय सहकाऱ्यांनाही केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत विशेष बैठक घेऊन राज्यातील सर्व मंत्र्यांसाठी नियमावली जाहीर केली होती.यानंतर शिंदे यांनी या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी तत्काळ ईव्ही गाडी वापरण्याचा निर्णय घेतला. तसेच आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या देखील कमी केली. त्याचप्रमाणे हेलिकॉप्टरने होणारे आपले दौरे देखील कमी केले असून, आता तर खाजगी विमानाने प्रवास न करता एअर इंडियाच्या प्रवासी विमानाने प्रवास करण्याला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचे पालन करण्यात उपमुख्यमंत्री शिंदे कोणतीही कसूर बाकी ठेवत नाहीत हेच त्यांचा या छोट्याशा कृतीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे

Comments
Add Comment

Nashik : 'हे सर्व आरोप हास्यास्पद', 'ऑपरेशन टायगर'वर शिवसेनेतील नेत्याचं मोठं विधान

Nashik :राज्यात झालेल्या 'ऑपरेशन टायगर' प्रमाणेच नाशिक महापालिकेच्या (Nashik Municipal Corporation) राजकारणात सध्या 'ऑपरेशन टायगर' (Operation

kharif pik vima : खरीप २०२६ पीक विम्यासाठी नवे नियम लागू; अर्ज करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी या 5 गोष्टी जाणून घ्या

मुंबई : राज्य सरकारने खरीप हंगाम २०२६ साठी पीक विमा योजनेत (Crop Insurance) काही महत्त्वाचे बदल केले आहेत. यंदा पीक विमा (Pik Vima)

Rahul Narwekar : जे. जे. रुग्णालयात वाढणार ICU बेड्स; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा मोठा निर्णय

मुंबई: राज्यातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या शासकीय रुग्णालयांपैकी एक असलेल्या जे. जे. रुग्णालयातील

Jalgaon : जळगाव-इंदूर विमानसेवेच्या हालचालींना पुन्हा वेग; डीजीसीएकडे तिसऱ्यांदा प्रस्ताव, लवकरच उड्डाणाची शक्यता

Jalgaon : जळगावकरांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या जळगाव-इंदूर थेट विमानसेवेच्या

Narhari Zirwal : तुकाराम मुंडेंच्या कारवाईनंतर दूध संकलनात २५ टक्के घट

- मंत्री नरहरी झिरवाळ यांची कबुली; विधानभवनात येणाऱ्या अन्नाचीही तपासणी होणार मुंबई : अन्न आणि औषध प्रशासन

फिफा धूम-धाम!

रोनाल्डोची देशाप्रती निष्ठा कायम