दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जान

मुंबई : पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. मंगळवारी, राज्य सरकारने यासंदर्भातील निर्णय जारी केला आहे. दरम्यान, तीन वर्षांपूर्वी दगडूशेठ गणपती मंदिराचा 'क' वर्ग पर्यटन स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला होता. मात्र, पुण्यातील ऎतिहासिक स्थळांच्या जवळ असणारे हे मंदिर धार्मिक व सांस्कृतिक पर्यटन साखळीतील महत्त्वाचा भाग असून 'अ' वर्ग स्थळांच्या निकषात बसते. त्यामुळे मंदिराचा अ वर्ग पर्यटन स्थळांच्या यादीत समावेश करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.


राज्याच्या पर्यटन विभागाने मंगळवारी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा 'अ' वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याबाबतचा निर्णय जारी केला आहे. सन १८९३ साली स्थापित झालेले हे मंदिर पुण्याच्या इतिहास, श्रद्धा, संस्कृती आणि समाजसेवेचे प्रतीक आहे. धार्मिक भक्ती, सामाजिक एकोपा, सांस्कृतिक वारसा आणि पर्यटन विकास यांचा संगम या स्थळामध्ये आहे. पुणे शहरातील प्रसिद्ध आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचे असे हे स्थान महाराष्ट्राच्या धार्मिक, सामाजिक आणि पर्यटन परंपरेचे प्रतीक बनल्याचे पर्यटन विभागाने आपल्या निर्णयात नमूद केले आहे. हे मंदिर पुण्यातील प्रमुख पर्यटन आकर्षणांपैकी एक असून देश-विदेशातील पर्यटक पुणे भेटीदरम्यान येथे दर्शनासाठी येतात. मंदिराचे भव्य स्थापत्य, सुवर्णमंडित मूर्ती, आकर्षक प्रकाशयोजना आणि उत्सवकाळातील सजावट पर्यटकांना विशेष आकर्षित करते.या स्थळाचेही पर्यटन विषयक महत्त्व लक्षात घेऊन यापूर्वी २०२३ मध्ये 'क' वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आला होता. दरम्यानच्या काळात राज्यातील पर्यटन स्थळांची निवड व त्यांना 'अ' वर्ग पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्याबाबतचे निकष ठरविण्यात आले. या निकषांची पूर्तता होत असल्याने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, पुणे या स्थळास अ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

संपूर्ण कोकणाला जलवाहतुकीने जोडणार

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; येत्या ३ वर्षांत मुंबई-महानगरात २७ जेट्टी कार्यान्वित करणार मुंबई : "मुंबई महानगर

ओबीसी समाजाच्या विकासासाठी केंद्र-राज्य समन्वयातून योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी

 ओबीसी समाजाचा विकास राज्याच्या सर्वांगीण प्रगतीचा पाया;ओबीसी सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध मुंबई: ओबीसी

नदीजोड प्रकल्पांची कामे कालमर्यादेत पूर्ण करा -ना.विखे पाटील

कोकण-गोदावरीसह चार महत्त्वाच्या योजनांचा घेतला आढावा मुंबई: राज्यातील महत्त्वाच्या नदीजोड प्रकल्पांची कामे

गेटवे परिसरातील डिझेल बोटी होणार इलेक्ट्रिक; हरित आणि इंधन बचतीसाठी राज्य सरकारचा पुढाकार

इलेक्ट्रिक बोटींसाठी मुंबई बँकेने विशेष कर्ज योजना आणावी - मंत्री नितेश राणे इलेक्ट्रिक बोटिंसाठी मुंबई बँक

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या

Water Shortage : राज्यातील १५ जिल्ह्यांत पाणीटंचाई

६३३ गावे, १ हजार ६५२ वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू मुंबई : राज्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे