आर्थिक संकटातील बेस्टची मदतीसाठी राज्य-केंद्राकडे धाव

मुंबई : बेस्टच्या सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकीत उपदान (ग्रॅच्युटी) व अंतिम देयकांसाठी १ हजार ५०२ कोटी रुपयांची तर परिवहन विभागाच्या बस संचालनासाठी येणाऱ्या तुटीसाठी २,४३९ कोटी रुपये, असे एकूण ३ हजार ९४१ कोटी रुपयांचे अनुदान देण्याची मागणी बेस्टने महापालिकेकडे केली. मात्र पालिका आयुक्तांची हे अनुदान देण्याची सध्या मानसिकता दिसत नाही, अशी टीका बेस्ट समितीचे अध्यक्ष तृष्णा विश्वासराव यांनी बेस्टच्या बैठकीत केली.



सध्या बेस्टमधील अनेक आगारांची दुरावस्था आहे, हे आगार आपणाला पहिल्यांदा सुधारावे लागतील. तेथील स्वच्छता चांगली करावी लागेल. कर्मचाऱ्यांच्या घराचा प्रश्न, निवृत्त कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युएटी, कोरोना काळातील कर्मचाऱ्यांचा कोरोना भत्ता आणि बेस्ट आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी अनुदानाची आवश्यकता आहे. यासाठी बेस्टचे उत्पन्न वाढवण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधावे लागतील. यासाठी प्रयत्न करावे लागतील, असे बेस्ट समितीचे अध्यक्ष तृष्णा विश्वासराव म्हणाल्या. बेस्टच्या विकासासाठी सर्वांना एकत्र येऊन काम करावे लागेल. मुख्यत: केंद्र सरकार, राज्य सरकार, राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन अनुदानासाठी मागणी करावी लागेल. बेस्टची कोणकोणती कामे आहेत, हे त्यांना सांगावे लागेल तेव्हाच आपणाला निधी मिळू शकेल. मात्र आपण जे पालिकेकडे ३९४१ कोटी अनुदानाची मागणी केली आहे, ते देण्यास पालिका आयुक्तांची मानसिकता दिसत नाही, असे अध्यक्ष तृष्णा विश्वासराव म्हणाल्या.
सध्या बेस्टकडे स्वतःच्या मालकीच्या फक्त २४९ बसेस आहेत. स्वमालकीच्या बसेसच्या संख्येत भविष्यात आणखीन कशी वाढ होईल, यावरही भर दिला पाहिजे, असे बेस्ट समितीचे अध्यक्ष तृष्णा विश्वासराव म्हणाल्या. अध्यक्षांच्या उत्पन्न वाढीच्या सूचनेनंतर बेस्टचे अनुदान किंवा निधी मागणीसाठी आधी आपणाला केंद्र आणि राज्य सरकारला बेस्टची विविध कामे आहेत ती दाखवावी लागतील. कशाप्रकारे कामे होणार आहेत आणि निधीची का आवश्यकता आहे, हे सांगावे लागेल यानंतरच बेस्टने निधीची किंवा अनुदानाची मागणी करावी. तसेच पुन्हा एकदा पालिकेला निधींची आठवण करुन द्यावी. निधीसाठी नव्याने पत्रव्यवहार करावा, अशी सूचना बेस्ट समितीचे ज्येष्ठ सदस्य सुनील गणाचार्य यांनी केली.

Comments
Add Comment

आयएएस तुकाराम मुंढे आता मंत्री झिरवळ यांच्या विभागात

२१ वर्षांच्या कार्यकाळात २५वी बदली; अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा कारभार स्वीकारणार मुंबई : आपल्या कडक

मुंबईला जलमुक्त करण्यासाठी महापालिकेचा मास्टर प्लॅन

मुंबई : मुंबई महानगराची भौगोलिक रचना लक्षात घेता सखल भागांमध्ये साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा जलद आणि

संपूर्ण कोकणाला जलवाहतुकीने जोडणार

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; येत्या ३ वर्षांत मुंबई-महानगरात २७ जेट्टी कार्यान्वित करणार मुंबई : "मुंबई महानगर

ओबीसी समाजाच्या विकासासाठी केंद्र-राज्य समन्वयातून योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी

 ओबीसी समाजाचा विकास राज्याच्या सर्वांगीण प्रगतीचा पाया;ओबीसी सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध मुंबई: ओबीसी

दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा

मुंबई : पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. मंगळवारी,

नदीजोड प्रकल्पांची कामे कालमर्यादेत पूर्ण करा -ना.विखे पाटील

कोकण-गोदावरीसह चार महत्त्वाच्या योजनांचा घेतला आढावा मुंबई: राज्यातील महत्त्वाच्या नदीजोड प्रकल्पांची कामे