Uttar Pradesh Road Accident : उत्तर प्रदेशामध्ये ट्रक-मॅजिकच्या धडकेत १० जणांचा मृत्यू

लखनौ : येथील लखीमपूर खेरी येथे सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण रस्ते अपघातात १० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पीलीभीत-बस्ती महामार्गावर अदलीसपूर गावाजवळ भरधाव ट्रकने समोरून येणाऱ्या मॅजिक वाहनाला जोरदार धडक (Uttar Pradesh Road Accident) दिली. या भीषण धडकेत मॅजिक वाहनाचा पूर्ण चक्काचूर झाला. वाहनात दोन महिलांसह अंदाजे एकूण १२ जण प्रवास करत होते. अपघात इतका भयंकर होता की सर्वांचा जागीच मृत्यू झाला, तर एका गंभीर जखमीचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला.


प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मॅजिक वाहन लखीमपूरहून सिसैया दिशेकडे जात होते. त्याचवेळी बहराइचकडून येणारा ट्रक भरधाव वेगात होता. अचानक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रकने समोरून येणाऱ्या मॅजिक वाहनाला जबर धडक दिली. धडक इतकी प्रचंड होती की मॅजिक वाहन जवळपास दहा फूट अंतरापर्यंत फरफटत गेले आणि रस्त्याच्या कडेला जाऊन थांबले. (Uttar Pradesh Road Accident)



अपघातानंतरचे दृश्य अत्यंत हृदयद्रावक होते. मॅजिक वाहनात बसलेले अनेक प्रवासी सीटच्या मध्येच अडकून पडले होते. काहींची डोकी फुटली होती, तर एका व्यक्तीचा संपूर्ण चेहरा फाटल्याची माहिती समोर आली आहे. धडकेच्या तीव्रतेमुळे दोन प्रवासी वाहनाबाहेर फेकले गेले आणि रस्त्यावर पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. घटनास्थळी सर्वत्र रक्ताचे डाग पसरले होते. आसपासच्या नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आणि पोलिसांना माहिती दिली. (Uttar Pradesh Road Accident)


माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू केले. एका गंभीर जखमी व्यक्तीला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. त्यानंतर सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. (Uttar Pradesh Road Accident)



खमरिया विभागाचे क्षेत्राधिकारी शमशेर बहादूर सिंह यांनी सांगितले की, अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. चालकाचा शोध सुरू आहे. दरम्यान, सामुदायिक आरोग्य केंद्र खमरियाचे अधीक्षक डॉ. अमित कुमार सिंह यांनी सांगितले की, अपघातानंतर दोन महिला आणि सात पुरुषांचे मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले होते. अनेक मृतदेह गंभीररीत्या चिरडले गेले होते. एका गंभीर जखमी पुरुषाला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते, मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. (Uttar Pradesh Road Accident)


दरम्यान, या अपघातावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा शोध पोलीस घेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला जखमींना सर्वोत्तम उपचार देण्याचे आणि बाधित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले. प्रशासकीय अधिकाऱ्यांना सर्व स्तरांवर दक्षता बाळगण्याचे आणि मदतकार्यात कोणताही हलगर्जीपणा होणार नाही याची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पोलीस सध्या अपघाताच्या कारणाचा तपास करत आहेत. भरधाव वेगाने गाडी चालवणे आणि चुकीच्या दिशेने ओव्हरटेक करणे हे यामागे कारण असावे, असा प्राथमिक संशय आहे; तथापि, नेमके कारण तपासानंतरच निश्चित होईल. (Uttar Pradesh Road Accident)



या भीषण अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. (Uttar Pradesh Road Accident)

Comments
Add Comment

Narendra Modi : सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, मोदींचे आवाहन

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढता संघर्ष, ऊर्जा बाजारातील चढ-उतार आणि जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या

NEET-UG 2026 Re-Exam : नीट यूजी २०२६ पुनर्परीक्षेची शहर सूचना स्लिप neet.nta.nic.in वर उपलब्ध

नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) रविवार २१ जून २०२६ रोजी होणार असलेल्या नीट यूजी २०२६ पुनर्परीक्षेची शहर

CRIME : नवांशहर हादरले! बेपत्ता राधिकाची निर्घृण हत्या; ब्रीफकेसमध्ये मृतदेह भरून जंगलात जाळला

NAWANSHAHR DISTRICT PUNJAB : गेल्या चार-पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या १५ वर्षीय राधिका या दहावीच्या विद्यार्थिनीचा अखेर

Rules For Edible Oil:  खाद्यतेल विक्रीचे नियम बदलणार! केंद्राचा मोठा निर्णय, आता फक्त ९ पॅक साइजमध्येच मिळणार तेल

सर्वसामान्य ग्राहकांची दिशाभूल रोखण्यासाठी आणि बाजारपेठेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारने

हजारांच्या पगारापासून कोट्यवधींची संपत्ती? ओडिशातील अभियंत्याच्या ठिकाणी छापे, २ कोटींची रोकड जप्त

ओडिशामध्ये (odisha) भ्रष्टाचाराविरोधात (Corruption) मोठी कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Bureau) एका सरकारी

Major Diplomatic Twist India-Nepal Meeting : नेपाळचा भारताकडे स्पष्ट कल! दिल्लीतील उच्चस्तरीय बैठकीनंतर चीनची चिंता वाढली

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील ताज हॉटेलमध्ये शनिवारी भारत आणि नेपाळ यांच्यात महत्त्वपूर्ण उच्चस्तरीय बैठक