Maharashtra : राज्यात पेट्रोल, डिझेल, LPG टंचाई नाही

मुंबई : पश्चिम आशियातील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. मात्र भारत सरकारने अडचणींतून मार्ग काढला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध देशांशी संवाद सुरू ठेवून भारताने देशातला इंधन, गॅस, सिलेंडर आदीचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. या प्रयत्नांना यश मिळाले आहे. यामुळेच महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल, LPG, CNG यांची टंचाई नाही. महाराष्ट्र शासन तसेच भारत सरकारच्या तेल आणि ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रमुख कंपन्यांनी राज्यातील जनतेला ऊर्जास्रोतांबाबत निश्चिंत राहण्याची हमी दिली आहे.


मे २०२६ च्या पहिल्या पंधरवड्यादरम्यान डिझेलच्या मागणीत १९.६६ टक्के तर, पेट्रोलच्या मागणीत २०.३९ टक्के इतकी वाढ झाल्याचे दिसून आले. मे २०२६ च्या पहिल्या पंधरवड्यात महाराष्ट्रासाठी एकूण २६७ टीकेएल इतका पेट्रोलचा तर ५०२ टीकेएल इतका डिझेलचा पुरवठा करण्यात आला होता. राज्यभरात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने ग्राहकांनी घाबरून जात खरेदी करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.



महाराष्ट्रात सार्वजनिक क्षेत्रातील तिन्ही तेल विपणन कंपन्यांकडे मिळून अंदाजे ३२,९९५ एमटी इतका एलपीजीचा साठा उपलब्ध आहे. यासोबतच एलपीजीचा सुरळीत पुरवठा होत राहील याची सुनिश्चिती करण्यासाठी वितरकांकडील साठ्याचा नियमितपणे पुनर्भरणा केला जात आहे.



राज्यातील ग्राहकांसाठी पुरेसे एलपीजी सिलेंडर उपलब्ध आहेत. एलपीजी सिलेंडरसाठी ऑनलाईन पद्धतीने ऑर्डर नोंदवण्याची प्रक्रिया निश्चित केलेल्या नियमांनुसार सुरळीत सुरू आहे. शहरांतील ग्राहकांसाठी २५ दिवसांनी आणि ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी ४५ दिवसांनी ऑनलाईन LPG सिलेंडर ऑर्डर करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. रुग्णालये, शैक्षणिक संस्था, स्मशानभूमी आणि समाज सेवी संस्था यांसारख्या प्राधान्य क्षेत्रांना LPG चा प्राधान्याने व्यवस्थित पुरवठा होत आहे. स्थलांतरित मजुरांना पाच किलोचे सिलेंडर पुरवले जात आहेत.



पाईपद्वारे गॅसचा पुरवठा करण्यासाठी नव्या जोडण्या देण्याचे काम वेगाने सुरू आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक ४४ लाख PNG जोडण्या आहेत. जागतिक उर्जा संकट लक्षात घेऊन, राज्यात पीएनजीच्या जाळ्याचा विस्तार करण्याचे काम सुरू आहे.

Comments
Add Comment

मढ-वर्सोवा पूलाच्या बांधकाम आता जोरात; विविध पर्यावरणीय परवानगी प्राप्त

कांदळवन विभागाला भरणार साडेबारा कोटींचे शुल्क मुंबई : मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या के/पश्चिम व पी/उत्तर

मुंबईत पाच ठिकाणी स्थापन करणार वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र

मुंबई : मुंबईतील विविध प्रदूषकाचे नमूने गोळा करून विश्लेषण करणे तसेच प्रत्येक तासाला विविध प्रदूषक घटकांची

नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai : नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी

Mumbai Municipal Corporation : मुंबई महापालिका उभारणार नवे सभागृह, ३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था

३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था मुंबई  : मुंबई महापालिकेचे सध्याचे ब्रिटिशकालीन सभागृह

Air quality monitoring : मुंबईत पाच ठिकाणी स्थापन करणार वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र

मुंबई  : मुंबईतील विविध प्रदूषकाचे नमूने गोळा करून विश्लेषण करणे तसेच प्रत्येक तासाला विविध प्रदूषक घटकांची

मुंबईत मोहरम मिरवणुकीत १४,९०० विषारी कॅप्सूल जप्त ! ३००० हजार लोकांचे जीव होते धोक्यात ?

Mumbai: मुंबईच्या भायखळा (Byculla) परिसर