कृषी वीजपुरवठा स्वतंत्र पद्धतीने हाताळण्यासाठी निर्णय; 'एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर लिमिटेड'कडे कारभार

महावितरणचे अखेर विभाजन


मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या महावितरणच्या विभाजनावर अखेर शिक्कामोर्तब झाले असून, राज्यातील कृषी वीजपुरवठा स्वतंत्र पद्धतीने हाताळण्यासाठी महावितरणचे दोन तुकडे करण्यात आले आहेत. या संदर्भातील ‘महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची पुनर्रचना आणि हस्तांतरण योजना, २०२६’ अधिसूचना सरकारने राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. या निर्णयानुसार, राज्यातील शेतकऱ्यांच्या वीज पुरवठ्याचा संपूर्ण कारभार आता ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर लिमिटेड’ या नव्या स्वतंत्र संस्थेकडे सोपवण्यात आला असून ही व्यवस्था १ एप्रिल २०२६ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू मानली जाणार आहे.


राज्य सरकारने महावितरणचा कृषी वीजपुरवठा विभाग पूर्णपणे वेगळा केला आहे. नव्याने स्थापन झालेली ‘महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (एमएसईबी) सोलर ॲग्रो पॉवर लिमिटेड’ ही कंपनी आता कृषी ग्राहकांसाठी स्वतंत्र 'वीज वितरण परवानाधारक' म्हणून काम करेल. ही कंपनी एमएसईबी होल्डिंग कंपनीची पूर्ण मालकीची उपकंपनी असणार आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रात आता शेतकऱ्यांसाठी देशातील पहिली स्वतंत्र वीज कंपनी अस्तित्वात आली आहे.शेतकऱ्यांशी संबंधित सर्व आर्थिक आणि प्रशासकीय व्यवहार आता या नव्या कंपनीच्या अखत्यारीत येतील. यामध्ये कृषी ग्राहकांची नवीन नोंदणी आणि नवीन वीज जोडण्या देणे, शेतकऱ्यांचे वीजबिल तयार करणे आणि वीजबिल वसुली करणे, ग्राहक सेवा, नियामक अर्ज आणि लेखांकन सांभाळणे, सरकारकडून मिळणारे कृषी अनुदान आणि सबसिडीचे व्यवस्थापन करणे, आदी कामांचा समावेश आहे.



पायाभूत सुविधा महावितरणकडेच


या विभाजनात एक मोठी तांत्रिक मेख आहे. वीजवाहिन्या, ट्रान्सफॉर्मर, उपकेंद्रे, वितरण यंत्रणा आणि इतर सर्व पायाभूत सुविधा महावितरणकडेच सुरक्षित राहतील. औद्योगिक, व्यावसायिक, निवासी आणि बिगर कृषी ग्राहकांना नेहमीप्रमाणे महावितरणच वीजपुरवठा करेल. नवी कृषी कंपनी ही केवळ 'किरकोळ वीजपुरवठादार' म्हणून काम करेल. महावितरण या नव्या कंपनीला वीज वितरणासाठी आपल्या पायाभूत सुविधा पुरवणार असून, त्या बदल्यात महावितरणला सेवा शुल्क दिले जाईल. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने २०२६ ते २०३० या कालावधीसाठी वार्षिक अंदाजे १ हजार ५०० कोटी रुपयांच्या सेवा शुल्काची तरतूद केली आहे.


मालमत्ता, थकबाकी आणि कर्ज विभागणी कशी?


कृषी ग्राहकांकडील जुनी अब्जावधी रुपयांची थकबाकी आणि सरकारकडून येणारे कृषी अनुदान आता नव्या संस्थेकडे हस्तांतरित केले जाईल. या नव्या कृषी संस्थेचा गाडा सुरुवातीला सुरळीत चालावा आणि खेळते भांडवल उपलब्ध व्हावे, यासाठी राज्य सरकार तब्बल २ हजार ५०० कोटी रुपयांची बँक हमी देणार आहे.महावितरणवर असलेली विद्यमान कर्जे, बँक दायित्वे आणि विविध कंपन्यांसोबत झालेले मूळ 'वीज खरेदी करार' महावितरणकडेच राहतील, ते नव्या कंपनीकडे जाणार नाहीत. मात्र, या करारांतर्गत मिळणाऱ्या विजेचा लाभ कृषी संस्थेला दिला जाईल. या योजनेत भविष्यात आवश्यकतेनुसार बदल करण्याचे सर्व अधिकार राज्य सरकारने स्वतःकडे राखून ठेवले आहेत.

Comments
Add Comment

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

मुंबई : जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहक

Madhuri Dixit : कोण होणार करोडपतीच्या एका सीझनसाठी माधुरी घेणार इतके मानधन...

मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि रंजक मनाला जाणारा क्विज शो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' नेहमीच

Supriya Sule and Vinod Tawde : सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे बैठक सोडून अचानक निघाले, एका कारमधून गेले; चर्चेला उधाण

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच एक

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Bharat Gogawale : नाशिकला गिरीश महाजन आणि रायगडमध्ये भरत गोगावले करणार ध्वजारोहण

मुंबई : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या शासकीय समारंभासाठी राज्य शासनाकडून जिल्हा निहाय ध्वजारोहण