युवकांचा अवमान सहन करणार नाही, संजय राऊत माफी मागा

युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांचा इशारा


देशातील युवक सुसंस्कृत, राऊतच मंद झालेत


ठाणे : देशातील युवकांचा अवमान करणाऱ्या उबाठा खासदार संजय राऊत यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांच्या विरोधात राज्यभरात युवा सेनेकडून शिवसेना स्टाईल आंदोलन केले जाईल, असा इशारा युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी आज दिला. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


सरनाईक म्हणाले की, राऊत यांना चर्चेत राहण्यासाठी अशा प्रकारे वाईट बोलण्याची सवय आहे. राऊतच मंद झाले असून भरकटले आहेत, अशी टीका सरनाईक यांनी केली. राऊत यांनी तरुणांबद्दल केलेल्या एक्स पोस्टची सरनाईक यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. ते पुढे म्हणाले की राऊतांनी त्यांच्याच पक्षातील युवा नेत्यावरचा राग व्यक्त करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र आणि देशातील युवकांवर खापर फोडले असावे, असा टोला सरनाईक यांनी यावेळी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशातील युवा पुढे जात आहे. देश विकास पथावर आहे, मात्र विकासावर टीका करणे हा राऊत यांना रोग लागला आहे. राऊत यांनी युवकांचा केलेला अवमान खपवून घेणार नाही. त्यांनी कॅमेऱ्यासमोर माफी मागितलीच पाहिजे, अन्यथा त्यांच्या विरोधात राज्यभरात युवा सेना शिवसेना स्टाईल आंदोलन करेल, असा इशारा सरनाईक यांनी यावेळी दिला.



शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यातील तरुण पुढे जात आहेत आणि येणाऱ्या काळात राज्यासाठी चांगले काम करतील, असा विश्वास सरनाईक यांनी यावेळी व्यक्त केला. देशात युवकांना उज्ज्वल भविष्य आहे. राऊतांकडून युवकांना भरकटवण्याचे काम होत आहे मात्र त्याला इथला युवक बळी पडणार नाही, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला. देशातील आणि महाराष्ट्रातील युवा सुसंस्कृत असून नेपाळसारखे भारतात युवकांकडून आंदोलन होणार नाही, असे सरनाईक म्हणाले.

Comments
Add Comment

Maharashtra Rojgar Melava 2026 : महाराष्ट्रातील तरुणांसाठी मोठी संधी! राज्यात होणार १ हजार रोजगार मेळावे; मंत्री मंगलप्रभात लोढांचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई : राज्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व

Nitesh Rane : रत्नागिरीला मिळणार जागतिक ओळख! भगवती बंदरात अत्याधुनिक क्रुझ टर्मिनलला गती; पर्यटन, रोजगाराला मोठी चालना

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील भगवती बंदर (Bhagwati Port) येथे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक क्रुझ टर्मिनल (cruise terminal)

Devendra Fadnavis : कलम ३७० हटवण्याचा निर्णय म्हणजे 'एक भारत, श्रेष्ठ भारत'च्या संकल्पनेला बळ; मुख्यमंत्री फडणवीसांनी केले पंतप्रधान मोदी व अमित शाह यांना अभिवादन

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० (Article 370) आणि ३५A रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाला सात वर्षे पूर्ण होत असताना

Government Hospital Catering Services : सरकारी रुग्णालयांतील खानपान सेवा आता महिला बचत गटांकडे

- २०० पेक्षा कमी खाटांच्या रूग्णालयांसाठी निर्णय; पारदर्शक गुणांकनाद्वारे जिल्हा स्तरावर निवड होणार मुंबई :

Amruta Khanvilkar Himanshu Malhotra : अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा यांच्यात बिनसलं? १८ महिन्यांपासून राहतात वेगळे; ११ वर्षांच्या संसारानंतर काडीमोड घेणार ?

मुंबई : ग्लॅमर आणि झगमगाटाने वेढलेल्या सिनेसृष्टीतील कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य खरोखरच तितके सुखी आणि चमकदार

Mumbai Doctors Strike : मुंबईत निवासी डॉक्टरांचा संप; ओपीडी बंद, रुग्णांचे हाल सुरू

मुंबई : मुंबईतील महापालिका रुग्णालयांमध्ये निवासी डॉक्टरांच्या संपामुळे हजारो रुग्णांना मोठा मनस्ताप सहन