Mumbai Water Cut : मुंबईकरांनो तयारीत रहा! १८ मे रोजी १२ तास पाणीपुरवठा बंद, ‘या’ भागांना फटका

मुंबई : मुंबईतील काही भागांमध्ये पाणीपुरवठा १२ तासांसाठी बंद राहणार असून अनेक परिसरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. यासोबतच नागरिकांनी पुढील सात दिवस पाणी गाळून आणि उकळून वापरावे, असे महत्त्वाचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित भागातील नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.



बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत अमर महाल (हेडगेवार उद्यान) ते तुर्भे निम्नस्तरीय जलाशय या दरम्यान जलबोगदा कार्यान्वित करण्याचे महत्त्वाचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे सोमवार, १८ मे २०२६ रोजी सकाळी 10 वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत तब्बल १२ तास ‘एम पूर्व’ आणि ‘एम पश्चिम’ विभागातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असून काही भागांमध्ये कमी दाबाने पाणी येणार आहे.


याशिवाय ‘एम पूर्व’ विभागातील प्रभाग क्रमांक १४६, १४७ आणि १४८ तसेच ‘एम पश्चिम’ विभागातील प्रभाग क्रमांक १५४ आणि १५५ मधील नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोमवार, १८ मे २०२६ पासून सोमवार, २५ मे २०२६ पर्यंत पुढील सात दिवस पाणी गाळून आणि उकळून वापरावे, असे निर्देश महानगरपालिकेकडून देण्यात आले आहेत.



दरम्यान, संबंधित परिसरातील नागरिकांनी पाणी साठवून ठेवावे तसेच या कालावधीत पाण्याचा काटकसरीने वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.


पाणीपुरवठा विस्कळीत व कमी दाबाने राहणारे परिसर पुढीलप्रमाणे –


एम पूर्व विभागातील परिसर :


एच. पी. सी. एल. रिफायनरी, एच. पी. सी. एल. वसाहत, वरूण बेवरेजेस, बी. ए. आर. सी., गव्हाणपाडा, इंडियन ऑईल कंपनी लिमिटेड, बी. पी. सी. एल. वसाहत, टाटा वसाहत, नित्यानंद बाग, राणे चाळ, आर. सी. एफ. वसाहत.


भारत नगर, जे प्लॉट, हशू अडवाणी नगर, आणिक गाव, एम. ई. सी. बी. वसाहत, सह्याद्रीनगर, आर. एन. ए. उद्यान, म्हाडा इमारती, रॉकलाइन इमारती, विष्णू नगर, व्हिडिओकॉन इमारती, एस. जी. केमिकल इमारती, प्रयागनगर.


ओम गणेश नगर, राहुल नगर आणि अशोक नगर या भागांमध्येही पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.


एम पश्चिम विभागातील परिसर :


एम. एस. इमारती १ ते ३२, बी. पी. टी., इंडियन ऑईल, ब्लेडिंग लिमिटेड, टाटा पॉवर लिमिटेड, एजीस केमिकल लिमिटेड, भारत पेट्रोलिअम लिमिटेड, आर. सी. एफ. लिमिटेड, चेंबूर कॅम्प, सिंधी कॅम्प, विजय विहार, सुमन नगर, भक्ती भवन, चिखल वाडी, समर्थ नगर, बसंत पार्क, सी. जी. गिडवाणी मार्ग, गांधी बाजार, जनता बाजार, इंदिरा नगर, नवजीवन सोसायटी, गोल्फ क्लब, रामटेकडी, तोलाराम टॉवर, चेंबूर वसाहत, कोकण नगर, गणेश नगर, विजय नगर, अशोक नगर, अण्णा भाऊ साठे मार्ग, सिंधी सोसायटी, जिल्हाधिकारी वसाहत, मरवली चर्च आणि आर. सी. मार्ग.


तसेच माहूल गाव, आंबापाडा गाव, म्हैसूर वसाहत, वाशी गाव, डी. बी. रिअँलिटी इमारत, वाडवली, शरद नगर, लक्ष्मी नगर, जनता नगर, वाशी नाका आणि जिजामाता नगर या भागांमध्येही पाणीपुरवठा प्रभावित राहणार आहे.


पी. एल. लोखंडे मार्ग, एकता मित्र मंडळ, मालेकर वाडी, पी. वाय. थोरात मार्ग, रमाबाई वसाहत, अमीर बाग, जनता नगर, मोतिलाल रहिवाशी संघ, कादरिया नगर, महात्मा फुले नगर, अजंठा वसाहत, सहदीप वसाहत, मुकुंद नगर, पंजाबी चाळ, नागेवाडी आणि छेडा नगर या परिसरांनाही या पाणी कपातीचा फटका बसणार आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात उभारले जाणार पर्यावरणपूरक 'ग्रीन डेटा सेंटर'; प्रकल्पांच्या अभ्यासासाठी डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती!

उद्योगमंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेत माहिती मुंबई : राज्याचा औद्योगिक विकास वेगाने करतानाच पर्यावरण आणि

Health Minister Prakash Abitkar : खासगी रुग्णालयांनी उपचारांचे दरफलक लावणे बंधनकारक

अतिरिक्त शुल्क घेतल्यास होणार कारवाई मुंबई : राज्यातील खासगी रुग्णालयांनी उपचारांचे दरफलक लावणे बंधनकारक असून

Journalist Controversy : पत्रकार वादावर खासदार संजय पाटील यांनी मागितली माफी

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय पाटील(Sanjay Patil) यांनी पत्रकारांसोबत झालेल्या वादानंतर जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली

Environment Minister Pankaja Munde : प्रदूषण नियंत्रणासाठी शॉर्ट, मिड व लॉंग टर्म आराखडा;

मुंबई : चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लाँग टर्म गोल्सचा स्वतंत्र

Jagar Samatecha : राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त २६ जूनला ‘जागर समतेचा’

मुंबई, दि. २५ : सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या

Nitesh Rane :चंद्रपूर जिल्ह्यात झिंगे पालन व्यवसायाला मोठी चालना देणार

मुंबई, : चंद्रपूर जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाला नवी दिशा देण्यासाठी आणि ग्रामीण भागातील मत्स्य शेतकऱ्यांचे