Maharashtra : राज्यातील १८३ तालुक्यांत पारा ४५ अंशांवर

उष्णतेची तीव्र लाट; मागील वर्षीच्या तुलनेत जलसाठा मात्र समाधानकारक


मुंबई : मे महिन्याचा पंधरवडा उलटत असतानाच राज्याला उन्हाच्या तीव्र झळांनी वेढले आहे. अवघ्या आठ दिवसांपूर्वी केवळ २१ तालुक्यांपुरती मर्यादित असलेली ही 'हीट वेव्ह' आता तब्बल १८३ तालुक्यांपर्यंत विस्तारली असून राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा ४५ अंशांच्या पुढे गेला आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आपत्ती व्यवस्थापन विभागाने सादर केलेल्या आकडेवारीतून राज्यावरील या अस्मानी संकटाची भीषणता समोर आली आहे.


राज्यात ५ ते १४ मे या कालावधीत उष्णतेची लाट सातत्याने तीव्र होत असल्याचे सादरीकरणात नमूद करण्यात आले. ११ मे रोजी १६ जिल्ह्यांतील ५१ तालुक्यांमध्ये ४५ अंश तापमानाची नोंद झाली होती, मात्र त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत हा आकडा १८३ तालुक्यांपर्यंत पोहोचला आहे. दरम्यान, वाढत्या उष्म्यासोबतच राज्याच्या काही भागांत अवकाळी पावसाचाही तडाखा बसला असून, वीज कोसळून १० व्यक्तींसह २७ जनावरांचा मृत्यू झाला आहे.राज्यातील या वाढत्या उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण राज्याला सतर्कतेचा इशारा दिला आहे. उष्माघातापासून वाचण्यासाठी नागरिकांनी दुपारच्या वेळी बाहेर पडणे टाळावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी, अशा सूचना आरोग्य व आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिल्या आहेत.



जलसाठा समाधानकारक, पण धोक्याची घंटा


एककीकडे उन्हाचा तडाखा वाढत असताना दुसरीकडे पाणीसाठ्याबाबत मात्र राज्याला तूर्तास दिलासा मिळाला आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील ३ हजार २८ धरणांमध्ये सध्या ३५ टक्के (५०३.७६ टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी याच काळात हे प्रमाण ३० टक्के इतके होते. मोठ्या, मध्यम आणि लघू अशा तिन्ही प्रकारच्या प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा अधिक आहे.
यंदा उन्हाची तीव्रता अधिक असली तरी 'एल निनो'च्या प्रभावामुळे मान्सून लांबणीवर पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ही शक्यता लक्षात घेता, उपलब्ध पाणीसाठा समाधानकारक असला तरी तो जूनअखेरपर्यंत टिकवण्यासाठी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे.

Comments
Add Comment

BCCI SQUAD ANNOUNCE : श्रीलंका दौऱ्यासाठी भारत अ संघाची घोषणा, तिलक वर्मा नवीन कर्णधार !

आयपीएल २०२६ आता अखेरच्या टप्प्यात आहे. २०२६ हंगामाचा अखेरचा सामना ३१ मे रोजी होणार आहे. याच दरम्यान BCCI ने

टँक पाखाडी मार्ग आणि हाफिज अली खान मार्गावरील अनधिकृत फेरीवाले, गॅरेज व भंगार विक्रेत्‍यांवर BMC ची कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  ‘ई’ विभाग अंतर्गत प्रभाग क्रमांक २१२ मधील वॉटर स्‍ट्रीट कॉर्नर, टँक पाखाडी मार्ग व

मुंबई क्लायमेंट वीकच्या निष्पत्ती व परिणामकारकता अहवालाचे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

 दुसरा ‘मुंबई क्लायमेट वीक’ फेब्रुवारी २०२७ मध्ये होणार मुंबई : हवामान बदलाच्या प्रश्नांवर जागतिक स्तरावरील

महाराष्ट्राला भारत-आफ्रिका सहयोगाचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी

सिडकोतर्फे महत्त्वपूर्ण आफ्रिका भारत व्यापार केंद्र (एआयबीसी) प्रस्तावित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Devendra Fadnavis : वर्ष २०३०-३१ पर्यंत नवीन फार्मसी अभ्यासक्रमांना स्थगिती

मुख्यमंत्र्यांचा निर्णय; सिंधुदुर्गमध्ये 'हॉटेल मॅनेजमेंट'ला मान्यता, दुर्गम भागात १७ नवीन व्यावसायिक

विदर्भासाठी ५५० कि.मी.च्या चार महामार्गांना मंजुरी

पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत निर्णय; दोन वर्षांत काम पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश मुंबई :