Anand Paranjpe : राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर आनंद परांजपे शिवसेनेच्या वाटेवर ?

ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एकेकाळचे विश्वासू आणि पुढे राष्ट्रवादीत जाऊन अजित पवारांच्या मार्गदर्शनात स्थिरावलेले माजी खासदार आनंद परांजपे यांनी तब्बल १४ वर्षांच्या राजकीय प्रवासानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. आनंद परांजपे एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात काम करण्यासाठी पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.





माजी खासदार आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्याचे पत्र त्यांनी स्वतःच्या अधिकृत सोशल मीडियाद्वारे प्रसिद्ध केले आहे. आनंद परांजपेंनी राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या सर्वोच्च नेत्या सुनेत्रा पवार यांना राजीनामा पाठवला आहे.


आनंद परांजपे राज्यसभा किंवा विधानपरिषद यापैकी एका सभागृहासाठी इच्छुक होते. पण अजित पवारांनी त्यांना वारंवार वेगवेगळी कारणे देऊन संधी नाकारली. आता अजित पवारांच्या पश्चात संधी मिळेल याची खात्री वाटत नसल्यामुळे आनंद परांजपेंनी राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.


आनंद परांजपे यांनी २०१४ मध्ये श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता आणि श्रीकांत शिंदे खासदार झाले होते. पण २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आनंद परांजपे श्रीकांत शिंदेंसाठी मनापासून प्रचार करताना दिसले. त्यानंतर श्रीकांत शिंदे आणि आनंद परांजपे यांच्यातील सलोखा वाढत गेला. आता तर श्रीकांत शिंदेंमुळेच आनंद परांजपे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.


शिवसेना खासदार प्रकाश परांजपे यांच्या निधनानंतर झालेली लोकसभा निवडणूक पुत्र म्हणून आनंद यांनी लढवली होती. या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी आनंद परांजपे यांना शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आणले होते. एकनाथ शिंदे हे आनंद परांजपेंना त्यांचे मानसपुत्र म्हणत होते.


प्रकाश परांजपेंच्या निधनानंतर उर्वरित कार्यकाळासाठी आनंद परांजपे शिवसेनेच्या तिकिटावर खासदार झाले. ते २००८ ते १६ मे २००९ या काळात ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. नंतर १६ मे २००९ ते १६ मे २०१४ या काळात ते शिवसेनेचेच कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. पण २०१२ मध्ये आनंद परांजपेंनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांनी राष्ट्रवादीसाठी ठाणे जिल्ह्यात पक्ष बांधणीचे भरपूर काम केले. आनंद यांच्या बंडामुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ झाले होते. पण मागील १४ वर्षांत राजकारणात बरंच काही घडलं बिघडलं आहे. आता पुन्हा एकदा आनंद परांजपे नवी इनिंग खेळण्याची तयारी करत आहेत. लवकरच ते पुढील वाटचालीबाबत अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Maratha students : मराठा विद्यार्थ्यांना आता 'ओबीसी'प्रमाणेच शैक्षणिक सवलती

राज्य सरकारचा मोठा निर्णय; 'महाडीबीटी' पोर्टलवर होणार तांत्रिक बदल, यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच

Buldhana Crime : शिर नसलेलं धड बघून सगळेच हादरले; शिवानी कळमेकर प्रकरणात नवे वळण

बुलढाणा : मागील महिन्यात शिवानी कळमेकर प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात गाजलं होत. भावाने आणि

Raigad Crime: दागिन्यांच्या लालसेमुळे वृद्धेचा खून; मृतदेह आंबेनळी घाटाच्या दरीत फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

रायगड : रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटात अंगावर काटा आणणारी घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.अलिबाग

ChandraShekar Bawankule : शासकीय जमीन हस्तांतरण, पुनर्विकासाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय Mumbai : शासकीय जमिनींची विक्री, हस्तांतर

Investment of Maharshtra : इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात ४ हजार कोटींची गुंतवणूक

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार; ४ हजार ७५० रोजगार निर्माण होणार मुंबई : भारतीय अर्थव्यवस्थेचे

MPSC Nipun Setu : एमपीएससीच्या अंतिम निवडीत हुकलेल्या उमेदवारांना 'निपुण सेतू'द्वारे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध स्पर्धा परीक्षांच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचूनही अंतिम