Anand Paranjpe : राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर आनंद परांजपे शिवसेनेच्या वाटेवर ?

ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एकेकाळचे विश्वासू आणि पुढे राष्ट्रवादीत जाऊन अजित पवारांच्या मार्गदर्शनात स्थिरावलेले माजी खासदार आनंद परांजपे यांनी तब्बल १४ वर्षांच्या राजकीय प्रवासानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. आनंद परांजपे एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात काम करण्यासाठी पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.





माजी खासदार आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्याचे पत्र त्यांनी स्वतःच्या अधिकृत सोशल मीडियाद्वारे प्रसिद्ध केले आहे. आनंद परांजपेंनी राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या सर्वोच्च नेत्या सुनेत्रा पवार यांना राजीनामा पाठवला आहे.


आनंद परांजपे राज्यसभा किंवा विधानपरिषद यापैकी एका सभागृहासाठी इच्छुक होते. पण अजित पवारांनी त्यांना वारंवार वेगवेगळी कारणे देऊन संधी नाकारली. आता अजित पवारांच्या पश्चात संधी मिळेल याची खात्री वाटत नसल्यामुळे आनंद परांजपेंनी राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.


आनंद परांजपे यांनी २०१४ मध्ये श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता आणि श्रीकांत शिंदे खासदार झाले होते. पण २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आनंद परांजपे श्रीकांत शिंदेंसाठी मनापासून प्रचार करताना दिसले. त्यानंतर श्रीकांत शिंदे आणि आनंद परांजपे यांच्यातील सलोखा वाढत गेला. आता तर श्रीकांत शिंदेंमुळेच आनंद परांजपे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.


शिवसेना खासदार प्रकाश परांजपे यांच्या निधनानंतर झालेली लोकसभा निवडणूक पुत्र म्हणून आनंद यांनी लढवली होती. या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी आनंद परांजपे यांना शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आणले होते. एकनाथ शिंदे हे आनंद परांजपेंना त्यांचे मानसपुत्र म्हणत होते.


प्रकाश परांजपेंच्या निधनानंतर उर्वरित कार्यकाळासाठी आनंद परांजपे शिवसेनेच्या तिकिटावर खासदार झाले. ते २००८ ते १६ मे २००९ या काळात ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. नंतर १६ मे २००९ ते १६ मे २०१४ या काळात ते शिवसेनेचेच कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. पण २०१२ मध्ये आनंद परांजपेंनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांनी राष्ट्रवादीसाठी ठाणे जिल्ह्यात पक्ष बांधणीचे भरपूर काम केले. आनंद यांच्या बंडामुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ झाले होते. पण मागील १४ वर्षांत राजकारणात बरंच काही घडलं बिघडलं आहे. आता पुन्हा एकदा आनंद परांजपे नवी इनिंग खेळण्याची तयारी करत आहेत. लवकरच ते पुढील वाटचालीबाबत अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात उभारले जाणार पर्यावरणपूरक 'ग्रीन डेटा सेंटर'; प्रकल्पांच्या अभ्यासासाठी डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती!

उद्योगमंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेत माहिती मुंबई : राज्याचा औद्योगिक विकास वेगाने करतानाच पर्यावरण आणि

Health Minister Prakash Abitkar : खासगी रुग्णालयांनी उपचारांचे दरफलक लावणे बंधनकारक

अतिरिक्त शुल्क घेतल्यास होणार कारवाई मुंबई : राज्यातील खासगी रुग्णालयांनी उपचारांचे दरफलक लावणे बंधनकारक असून

Strait of Hormuz : ३० भारतीय जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून बाहेर पडली ; तेल, वायू अन् खतांचा जहाजात समावेश, २० हून अधिक जहाजे रांगेत

३० भारतीय जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून बाहेर पडली नवी दिल्ली : इराण आणि अमेरिका यांच्यातील सामंजस्य

Ketan Agrawal Murder Case : 'खून मी नाही, त्याने केला!'... केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट; पोलिसही चक्रावले

Journalist Controversy : पत्रकार वादावर खासदार संजय पाटील यांनी मागितली माफी

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय पाटील(Sanjay Patil) यांनी पत्रकारांसोबत झालेल्या वादानंतर जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली

Environment Minister Pankaja Munde : प्रदूषण नियंत्रणासाठी शॉर्ट, मिड व लॉंग टर्म आराखडा;

मुंबई : चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लाँग टर्म गोल्सचा स्वतंत्र