Vaibhav Sooryvanshi : वैभवची खरी परीक्षा तर अजून व्हायची आहे, दिग्गज क्रिकेटपटूचे मत

राजस्थान : आयपीएल २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्सने ११ पैकी ६ सामने जिंकत १२ गुणांसह गुणतालिकेत सहावे स्थान मिळवले आहे. अद्याप त्यांचे तीन सामने व्हायचे आहेत. राजस्थानकडून २०२५ मध्ये पदार्पण केलेल्या वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत आयपीएलचे १८ सामने खेळून ६९२ धावा केल्या आहेत. यात १०३ धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. आयपीएलमध्ये दोन शतके आणि तीन अर्धशतके त्याच्या नावावर आहेत. यंदाच्या हंगामात ११ सामन्यांत ४४० धावा करणाऱ्या वैभवने याच वर्षी १०३ ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी केली आहे. यंदाच्या वर्षी त्याने एक शतक आणि दोन अर्धशतके केली आहेत. तुफान फटकेबाजी करणाऱ्या वैभवचे कौतुक करतानाच दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिविलियर्सने एक वास्तव पण सांगितले.वैभव सूर्यवंशी छान खेळत आहे. आयपीएलमधील त्याची कामगिरी कौतुकास्पद आहे. पण त्याची खरी परीक्षा अजून व्हायची आहे. त्याचा पुढील प्रवास एवढा सोपा नसेल; असे एबी डिविलियर्स म्हणाला.



नेमकं काय म्हणाला एबी डिविलियर्स ?


एबी डिविसलियर्स फॉर द लव्ह ऑफ क्रिकेट या पॉडकास्टवर बोलताना म्हणाला, १५ वर्षे या वयात वैभव अशी कामगिरी करत असल्याचे बघून आश्चर्य वाटत आहे. वैभवने केवळ टी-२० क्रिकेटला प्राधान्य दिले तर तो टी -२० इतिहासात सर्वोत्तम खेळाडू होईल यात शंकाच नाही. पण टी-२० व्यतिरिक्त त्याने एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्येही नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला तर त्याला मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. टी-२० हा क्रिकेटचा अतिशय वेगवान प्रकार आहे. या प्रकारात कमी वेळात सामन्याचा निकाल लागतो. पण एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये कामगिरीवर जोर द्यावा लागतो. संयम आणि सामर्थ्य यांची परीक्षा एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये होते. कसोटी क्रिकेटमध्ये मानसिकदृष्ट्या दीर्घकाळ टिकाव धरावा लागतो. थोडक्यात सांगायचे तर टी-२० च्या तुलनेत एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट खूप वेगळे आहे. यामुळे टी-२० सारखेच खेळणे एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये कठीण आहे. शिवाय टी-२० च्या तुलनेत एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये जास्त उत्तम फिटनेसची गरज आहे. अशा वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जात एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट खेळावे लागते. याच कारणांमुळे टी-२० मध्ये चमकदार कामगिरी केली तरी एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये तशीच कामगिरी करणे कठीण आहे. वैभवला सर्व प्रकारचे क्रिकेट खेळायचे असेल तर त्याने या विषयातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे आणि त्यांच्या देखरेखीत तयारी करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा त्याने फक्त टी -२० खेळण्यासाठी नियोजन करून इतिहास घडवावा.

Comments
Add Comment

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटी अनिर्णित; भारताने कसोटी मालिका १-० ने जिंकली

कोलंबो : श्रीलंका दौऱ्यावर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये सहज विजय मिळवून

ICC bans UAE batter : आयसीसीची युएईचा फलंदाज आसिफ खानवर १५ महिन्यांची बंदी

दुबई : संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) अनुभवी फलंदाज आसिफ खान याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) डोपिंग

India U19 Squad : ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी भारताचा १९ वर्षांखालील संघ जाहीर; सेहवाग-द्रविडच्या मुलांना संधी

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाच्या भारत दौऱ्यासाठी भारतीय १९ वर्षांखालील संघाची घोषणा

Dean Elgar Retirement : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार डीन एल्गरने घेतली व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि अनुभवी कसोटी सलामीवीर डीन एल्गरने (Dean Elgar Retirement) व्यावसायिक

IND vs SL 2nd Test Day 5 : भारताला हव्यात ४ विकेट्स, पण पावसामुळे विजय हुकणार? कोलंबोत हवामानाचा मोठा धोका

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना निर्णायक

India vs Sri Lanka : कोलंबो कसोटीत पावसाच्या व्यत्ययाचा भारताला फटका, श्रीलंकेची १६ धावांची आघाडी; पाचव्या दिवशी रंगणार निर्णायक लढत

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला. त्यामुळे चौथ्या