Nashik Simhastha : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्या'च्या बोधचिन्हाचे अनावरण , तुम्ही कुंभमेळ्याचे बोधचिन्ह पाहिले का ?

Nashik-Trimbakeshwar Simhastha Kumbh Mela : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्या'च्या बोधचिन्हाचे अनावरण संपन्न झाले.



नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अधिकृत बोधचिन्हामध्ये भारतीय अध्यात्म, श्रद्धा आणि सिंहस्थ परंपरेचे दर्शन घडते.



भगवान शंकराचे त्रिशूळ, पवित्र श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिराची छटा व शिवलिंगाच्या स्वरुपात साकारलेली गोदावरी नदी यांचा या बोधचिन्हामध्ये अत्यंत समर्पक आणि कलात्मक वापर करण्यात आला आहे. सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देणारे हे बोधचिन्ह आहे.


 

 



त्रंबकेश्वर अमृतस्नान तारीख 

ध्वजारोहण करून कुंभ पर्वाला सुरुवात


पहिले अमृस्नान -2-08-2027


द्वितीय अमृस्नान – 31-08- 2027


तृतीय अमृस्नान – 12- 09-2027


नाशिक कुंभ अमृतस्नान तारीख


31-10-2026 ध्वजारोहण करून कुंभ पर्वाला सुरुवात


पहिले अमृस्नान -2-08-2027


द्वितीय अमृस्नान – 31-08- 2027


तृतीय अमृस्नान – 11- 09-2027


 

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा


सिंहस्थ कुंभमेळा हा त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र येथे दर बारा वर्षांनी घडणारा, हिंदू धर्मीयांचा मेळा आहे. जेव्हा गुरू आणि सूर्य सिंह राशीत प्रवेश करतात आणि अमावास्या असते, तेव्हा गोदावरीच्या उगमस्थानावर त्र्यंबकेश्वर येथे हा मेळा भरतो. अशाच प्रकारचे कुंभमेळे हरिद्वार, प्रयाग, उज्जैन येथेही भरतात.


आख्यायिका
समुद्रमंथनाने जो अमृतकुंभ समुद्राच्या बाहेर निघाला तेव्हा देवांना वाटले की जर दानवांनी हे अमृत प्राशन केले तर हे दानव अमर होऊन देव व मनुष्य यांना सळो की पळो करून सोडतील. तेव्हा देवांनी इंद्राचा पुत्र जयंत याला अमृतकुंभ घेऊन आकाशमार्गे पलायन करण्यास सांगितले. या अमृतकुंभाला देवांपासून हस्तगत करण्यासाठी दानवांनी देवांशी १२ दिवस भयंकर युद्ध केले. या युद्धकाळी अमृतकुंभामधून काही थेंब पृथ्वीवर पडले. हे अमृताचे थेंब हरिद्वार, प्रयाग, उज्जैन व त्र्यंबकेश्वर येथे पडले. चंद्राने कलशामधून अमृत सांडताना वाचविले, सूर्याने अमृतकलशास फुटू दिले नाही व बृहस्पतीने राक्षसांपासून रक्षण केले म्हणून जेव्हा सूर्य, चंद्र व गुरू कुंभ राशीत प्रवेशतात तेव्हा कुंभमेळा भरतो. जेव्हा गुरू आणि सूर्य सिंह राशीत प्रवेश करतात आणि अमावास्या असते, तेव्हा गोदावरीच्या उगमस्थानावर त्र्यंबकेश्वरात सिंहस्थ कुंभमेळा भरतो, अशी आख्यायिका आहे.

Comments
Add Comment

NEET UG 2026 Paper Leak : मोबाईल बंद करून लपलेला संशयित अखेर CBI च्या जाळ्यात; NEET पेपरफुटी प्रकरणात अहिल्यानगरमधून संशयिताला घेतले ताब्यात

अहिल्यानगर : वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट (NEET) परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात आता आणखी एक मोठी

Nashik News : नाशिक विभागात युरियाचा मोठा काळाबाजार ? 1120 कोटींच्या सबसिडीवर डल्ला असल्याची चर्चा

नाशिक : नाशिक विभागात अनुदानित युरिया खताच्या काळाबाजाराचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. खरीप आणि रब्बी हंगामात

Devendra Fadnavis : परदेश दौरे रद्द करा, मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्याही कमी करा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश; सामान्य प्रशासन विभागाकडून मंत्र्यांच्या लवाजम्याचा आढावा घेण्यास

Nashik TCS Case :नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांसाठी कामाचे वातावरण भयावह, कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाचा अहवाल

मुंबई : नाशिकमधील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीतील धर्मांतर प्रकरणाने राज्याचे राजकारण ढवळून निघाले

Supreme Court : ....तो अॅट्रॉसिटीचा गुन्हा ठरणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय

Supreme Court : जातीय शिवीगाळ प्रकरणांमध्ये अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची नेमकी मर्यादा काय आहे,

Reserve Bank of India (RBI) : रिझर्व्ह बँकेकडून सर्वोदय सहकारी बँकेचा परवाना रद्द

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) (RBI) मुंबईतील 'सर्वोदय सहकारी बँके'चा परवाना अखेर रद्द केला आहे. बँकेकडे