IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये आज ५७ वा सामना रायपुरच्या शहीद वीर नारायण स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(आरसीबी) आणि कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) यांच्यात होणार आहे. हा सामना दोघांसाठी प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आरसीबीने आतापर्यंत ११ पैकी ७ सामने जिंकले आहे. ते १४ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहेत. प्लेऑफला पात्र होण्यासाठी आरसीबीला एक सामना जिंकायचा आहे. कोलकाताने या हंगामाची सुरुवात खराब केली होती. मात्र हळुहळू संघाने लय पकडली आहे. संघाने आतापर्यंत १० पैकी चार सामने जिंकले आहेत. केकेआर सलग चार सामन्यात अपराजीत आहे. केकेआर गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. त्यामुळे प्लेऑफमध्ये जाण्यासाठी त्यांना उर्वरित चार सामने जिंकावे लागतील.
या हंगामात आरसीबीसाठी विराट कोहलीने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने ११ सामन्यात ३७९ धावा केल्या आहेत. मात्र आरसीबीसाठी सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे रजत पाटीदारचा फॉर्म. गेल्या सहा सामन्यात रजत काही खास कामगिरी करू शकला नाही आहे. मागील सहा सामन्यात त्याने फक्त एक अर्धशतक मारले आहे. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमारने अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने ११ सामन्यात २१ विकेट्स घेतल्या आहेत. केकेआरसाठी अंगीकृश रघुवंशीने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने ९ सामन्यात २६९ धावा केल्या आहेत. गोलंदाजीत कार्तिक त्यागीने ९ सामन्यात १३ विकेट्स घेतल्या आहेत. या हंगामात तो केकेआरसाठी सर्वाधिक विकेट्स घेणार गोलंदाज ठरला आहे .
अहमदाबाद : विजयासाठी २० षटकांमध्ये अवघ्या १६९ धावा करण्याचे आव्हान सनरायर्झस हैदराबादला पेलवले नाही. १४. ५ षटकांमध्ये अवघ्या ८६ धावांवरच हैदराबादचा ...
हेड टु हेड
आयपीएलमध्ये आतापर्यंत आरसीबी आणि केकेआर या दोघांमध्ये ३५ सामने झाले आहेत. आज ३६ व्यांदा यांचा आमना सामना होणार आहे. आतापर्यंत झालेल्या ३५ पैकी केकेआरने २० सामने जिंकले आहेत, तर आरसीबीने १५ सामने जिंकले आहेत . गेल्या हंगामात आरसीबने केकेआरचा पराभव केला होता . २०२६ च्या हंगामात या दोंघामध्येही पहिलीच लढत आहे.
पिच रिपोर्ट
रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी संतुलित आहे. सुरुवातीला चांगल्या उसळीमुळे ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अनुकूल ठरते, पण नंतर फिरकी गोलंदाजांना मदत मिळते . ही खेळपट्टी अवघड असली तरी, एकदा टिकून राहिल्यावर, फलंदाजीसाठी एक चांगली आणि अनुकूल खेळपट्टी मानली जाते. सीमारेषा दूर असल्यामुळे रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवणे कठीण जाते. यामुळे या पिचवर अचूक फटकेबाजी करणे आवश्यक आहे.येथे आयपीएलमधील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १७२ आहे.