RCB VS KKR : आज आयपीएलमध्ये कोलकाता विरुद्ध आरसीबी आमने सामने ,कोलकाता सलग पाचव्या विजयासाठी सज्ज...

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये आज ५७ वा सामना रायपुरच्या शहीद वीर नारायण स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(आरसीबी) आणि कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) यांच्यात होणार आहे. हा सामना दोघांसाठी प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आरसीबीने आतापर्यंत ११ पैकी ७ सामने जिंकले आहे. ते १४ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहेत. प्लेऑफला पात्र होण्यासाठी आरसीबीला एक सामना जिंकायचा आहे. कोलकाताने या हंगामाची सुरुवात खराब केली होती. मात्र हळुहळू संघाने लय पकडली आहे. संघाने आतापर्यंत १० पैकी चार सामने जिंकले आहेत. केकेआर सलग चार सामन्यात अपराजीत आहे. केकेआर गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. त्यामुळे प्लेऑफमध्ये जाण्यासाठी त्यांना उर्वरित चार सामने जिंकावे लागतील.


या हंगामात आरसीबीसाठी विराट कोहलीने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने ११ सामन्यात ३७९ धावा केल्या आहेत. मात्र आरसीबीसाठी सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे रजत पाटीदारचा फॉर्म. गेल्या सहा सामन्यात रजत काही खास कामगिरी करू शकला नाही आहे. मागील सहा सामन्यात त्याने फक्त एक अर्धशतक मारले आहे. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमारने अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने ११ सामन्यात २१ विकेट्स घेतल्या आहेत. केकेआरसाठी अंगीकृश  रघुवंशीने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने ९ सामन्यात २६९ धावा केल्या आहेत. गोलंदाजीत कार्तिक त्यागीने ९ सामन्यात १३ विकेट्स घेतल्या आहेत. या हंगामात तो केकेआरसाठी सर्वाधिक विकेट्स घेणार गोलंदाज ठरला आहे .



हेड टु हेड


आयपीएलमध्ये आतापर्यंत आरसीबी आणि केकेआर या दोघांमध्ये ३५ सामने झाले आहेत. आज ३६ व्यांदा यांचा आमना सामना होणार आहे. आतापर्यंत झालेल्या ३५ पैकी केकेआरने २० सामने जिंकले आहेत, तर आरसीबीने १५ सामने जिंकले आहेत . गेल्या हंगामात आरसीबने केकेआरचा पराभव केला होता . २०२६ च्या हंगामात या दोंघामध्येही पहिलीच लढत आहे.


पिच रिपोर्ट


रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी संतुलित आहे. सुरुवातीला चांगल्या उसळीमुळे ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अनुकूल ठरते, पण नंतर फिरकी गोलंदाजांना मदत मिळते . ही खेळपट्टी अवघड असली तरी, एकदा टिकून राहिल्यावर, फलंदाजीसाठी एक चांगली आणि अनुकूल खेळपट्टी मानली जाते. सीमारेषा दूर असल्यामुळे रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवणे कठीण जाते. यामुळे या पिचवर अचूक फटकेबाजी करणे आवश्यक आहे.येथे आयपीएलमधील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १७२ आहे.

Comments
Add Comment

Hardik Pandya : हार्दिक पांड्यानं घेतला मोठा निर्णय, महिकासोबत घेतलं तिरुपतीच्या बालाजीचं दर्शन

तिरुपती : दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर असलेला क्रिकेटपटू हार्दिक पांड्या सध्या चर्चेत आहे.

Duleep Trophy 2026 Tilak Varma : तिलक वर्माच्या खांद्यावर मोठी जबाबदारी! दुलीप ट्रॉफीत दक्षिण विभागाचे कर्णधारपद; करुण नायरलाही संधी

मुंबई : भारताच्या टी-20 संघाचा उपकर्णधार तिलक वर्मा (Tilak Varma) याच्यावर बीसीसीआयने (BCCI) आणखी एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. 23

Commonwealth Games 2026 : ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये भारतानं जिंकली ३९ पदकं, समारोप सोहळ्यात दिसेल अहमदाबाद २०३० ची झलक

ग्लासगो : स्कॉटलँडच्या ग्लासगो शहरात सुरू असलेल्या राष्ट्रकुल २०२६ अर्थात

Commonwealth Games 2026 : भूसुरुंगाच्या स्फोटात पाय गमावला, पण जिद्द सोडली नाही; बॉक्सर ते सुवर्णपदक विजेता ठरलेला सोमन राणा

ग्लासगो: २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी आपल्या प्रेरणादायी प्रवासातून संपूर्ण

Jadumani Singh : फुटबॉलप्रेमी जादुमणी काकाच्या सल्ल्याने बॉक्सिंगच्या रिंगमध्ये उतरला आणि...

ग्लासगो : स्कॉटलँडच्या ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल २०२६ अर्थात कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Games) २०२६ स्पर्धेत

Commonwealth Games 2026 : रोजंदारी मजुराचा मुलगा बनला देशाचा अभिमान; प्रवीण चित्रवेलने तिहेरी उडीत पटकावले ऐतिहासिक रौप्य पदक

ग्लासगो: २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या युवा खेळाडूंनी आपल्या अफाट संघर्षमय प्रवासातून