RCB VS KKR : आज आयपीएलमध्ये कोलकाता विरुद्ध आरसीबी आमने सामने ,कोलकाता सलग पाचव्या विजयासाठी सज्ज...

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये आज ५७ वा सामना रायपुरच्या शहीद वीर नारायण स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(आरसीबी) आणि कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) यांच्यात होणार आहे. हा सामना दोघांसाठी प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आरसीबीने आतापर्यंत ११ पैकी ७ सामने जिंकले आहे. ते १४ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहेत. प्लेऑफला पात्र होण्यासाठी आरसीबीला एक सामना जिंकायचा आहे. कोलकाताने या हंगामाची सुरुवात खराब केली होती. मात्र हळुहळू संघाने लय पकडली आहे. संघाने आतापर्यंत १० पैकी चार सामने जिंकले आहेत. केकेआर सलग चार सामन्यात अपराजीत आहे. केकेआर गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. त्यामुळे प्लेऑफमध्ये जाण्यासाठी त्यांना उर्वरित चार सामने जिंकावे लागतील.


या हंगामात आरसीबीसाठी विराट कोहलीने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने ११ सामन्यात ३७९ धावा केल्या आहेत. मात्र आरसीबीसाठी सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे रजत पाटीदारचा फॉर्म. गेल्या सहा सामन्यात रजत काही खास कामगिरी करू शकला नाही आहे. मागील सहा सामन्यात त्याने फक्त एक अर्धशतक मारले आहे. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमारने अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने ११ सामन्यात २१ विकेट्स घेतल्या आहेत. केकेआरसाठी अंगीकृश  रघुवंशीने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने ९ सामन्यात २६९ धावा केल्या आहेत. गोलंदाजीत कार्तिक त्यागीने ९ सामन्यात १३ विकेट्स घेतल्या आहेत. या हंगामात तो केकेआरसाठी सर्वाधिक विकेट्स घेणार गोलंदाज ठरला आहे .



हेड टु हेड


आयपीएलमध्ये आतापर्यंत आरसीबी आणि केकेआर या दोघांमध्ये ३५ सामने झाले आहेत. आज ३६ व्यांदा यांचा आमना सामना होणार आहे. आतापर्यंत झालेल्या ३५ पैकी केकेआरने २० सामने जिंकले आहेत, तर आरसीबीने १५ सामने जिंकले आहेत . गेल्या हंगामात आरसीबने केकेआरचा पराभव केला होता . २०२६ च्या हंगामात या दोंघामध्येही पहिलीच लढत आहे.


पिच रिपोर्ट


रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी संतुलित आहे. सुरुवातीला चांगल्या उसळीमुळे ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अनुकूल ठरते, पण नंतर फिरकी गोलंदाजांना मदत मिळते . ही खेळपट्टी अवघड असली तरी, एकदा टिकून राहिल्यावर, फलंदाजीसाठी एक चांगली आणि अनुकूल खेळपट्टी मानली जाते. सीमारेषा दूर असल्यामुळे रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवणे कठीण जाते. यामुळे या पिचवर अचूक फटकेबाजी करणे आवश्यक आहे.येथे आयपीएलमधील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १७२ आहे.

Comments
Add Comment

Women's Cricket : महिला क्रिकेटपटूंसाठी ICC ने घेतला मोठा निर्णय

नवी दिल्ली : खेळपट्ट्यांवर चौकार-षटकार मारणारी एखादी खेळाडू जेव्हा आई होण्याचा निर्णय घेते, तेव्हा बऱ्याचदा

US Open Badminton Tournament 2026 : लक्ष्य सेन आणि तन्वी शर्माकडे भारतीय संघाचे नेतृत्व

वॉशिंग्टन : यूएस ओपन सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेत अनुभवी लक्ष्य सेन आणि उदयोन्मुख खेळाडू तन्वी शर्मा भारताचे

Yashasvi Jaiswal : वर्ल्ड फादर्स डे निमित्त यशस्वी जयस्वालने आपल्या वडिलांना दिलं 'हे' खास गिफ्ट

मुंबई : भारतीय क्रिकेटमधील युवा स्टार यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. यावेळी त्याच्या

ICC Take Action Against England : ICC ची इंग्लंड संघावर मोठी कारवाई! वर्ल्ड टेस्ट क्रिकेटमधून तब्बल १२ गुण वजा

लंडन : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) अंतिम फेरीत पहिल्यांदाच स्थान मिळवण्याचे इंग्लंडचे स्वप्न मोठ्या

FIFA WORLDCUP 2026 : मोहम्मद सालाहच्या जादूई कामगिरीने इजिप्तचा ऐतिहासिक विजय; न्यूझीलंडचा ३-१ ने पराभव

व्हँकूवर, ब्रिटिश कोलंबिया : फिफा विश्वचषक २०२६ मध्ये इजिप्तच्या संघाने नवा इतिहास रचला आहे. रविवारी रात्री बीसी

FIFA WORLDCUP 2026 : 'लहान' केप व्हर्डेचा 'मोठा' चमत्कार! बलाढ्य उरुग्वेला २-२ ने रोखून रचला इतिहास

मियामी (फ्लोरिडा) : फिफा विश्वचषक २०२६ मध्ये एका छोट्या देशाने फुटबॉल जगताला थक्क केले आहे. केवळ ५ लाख लोकसंख्या