छत्रपती संभाजीनगर : नाशिक येथील गाजलेल्या टीसीएस (TCS) प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला लपण्यासाठी मदत करणे एमआयएमचे माजी नगरसेवक मतीन पटेल यांना चांगलेच भोवले आहे. गुन्हेगारांना आश्रय देणाऱ्यांविरोधात प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला असून, आज पहाटे मतीन पटेल (Matin Patel) यांच्या निवासस्थानावर महापालिकेने बुलडोझर चालवला. या धडक कारवाईमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, गुन्हेगारी प्रवृत्तींना मदत करणाऱ्यांसाठी हा एक कठोर इशारा मानला जात आहे.
नवी दिल्ली : जर तुम्ही येत्या काही दिवसांत लग्नसराईसाठी दागिने खरेदी करण्याचा किंवा गुंतवणुकीसाठी सोने-चांदी घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला आता ...
पोलीस तपासात 'आश्रय' देण्याचे बिंग फुटले
निदा खान आणि तिच्या कुटुंबीयांना अटकेपासून वाचवण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरक्षित स्थळ मिळवून देण्यात मतीन पटेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. केवळ राहण्याची सोयच नाही, तर तपासाची दिशा भरकटवण्यासाठी आणि पोलिसांपासून लपून राहण्यासाठी पटेल यांनी वेळोवेळी मदत केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या गंभीर गुन्ह्यामुळे पोलिसांनी त्यांना आधीच सहआरोपी केले होते, त्यानंतर आता महापालिकेने त्यांच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा फिरवून आर्थिक आणि सामाजिक दणका दिला आहे.
फुलांची उधळण अन् पोलिसांचा कडा पहारा
आज सकाळी ६ वाजता महापालिकेचे पथक बुलडोझरसह घटनास्थळी दाखल झाले. विशेष म्हणजे, प्रशासनाच्या या भूमिकेचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले असून, कारवाई दरम्यान काही लोकांनी महापालिका आयुक्तांवर फुलांची उधळण केली. निदा खान ज्या घरात ७ दिवस राहिली होती, त्या घरावरही लवकरच कारवाई केली जाणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
इम्तियाज जलील यांच्या अटकेची मागणी
मतीन पटेल यांच्यावर झालेली ही कारवाई केवळ घरापुरती मर्यादित नसून, नारेगाव परिसरातील त्यांचे कार्यालय आणि इतर मालमत्तांवरही महापालिकेची टांगती तलवार आहे. या मालमत्तांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, समाधानकारक उत्तर न मिळाल्यास तिथेही बुलडोझर फिरण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणाला आता तीव्र राजकीय वळण लागले आहे. राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी या प्रकरणात थेट माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या अटकेची मागणी केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.