Bhiwandi Water Cut : भिवंडीकरांनो पाणी जपून वापरा! शहरात उद्यापासून २४ तास पाणीपुरवठा बंद; 'या' भागात होणार परिणाम

ठाणे : भिवंडी शहराला पाणीपुरवठा (Bhiwandi Water Cut) करणाऱ्या यंत्रणेमध्ये तातडीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. स्टेम प्राधिकरणाने (STEM Authority) दिलेल्या माहितीनुसार, टेंघर येथील जलशुद्धीकरण केंद्र आणि भिवंडी शहराला जोडणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या (PWRM Pipeline) दुरुस्तीसाठी बुधवारी, १३ मे रोजी सकाळी ९ वाजल्यापासून ते गुरुवार १४ मे रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवला जाणार आहे.

पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणी मिळण्याची शक्यता


भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या (BNMC) जलविभागाने स्पष्ट केले आहे की, गुरुवारी सकाळी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पुन्हा सुरू होईल. मात्र, जलवाहिन्यांमधील हवेचा दाब आणि प्रक्रियेमुळे गुरुवार आणि शुक्रवारी देखील शहरातील अनेक भागात कमी दाबाने किंवा अपुरा पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी केवळ २४ तास नव्हे, तर पुढील दोन दिवसांचे नियोजन करणे आवश्यक आहे.


पाणी कपातीचे नेमके कारण काय?


महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टेंघर जलशुद्धीकरण केंद्रातील इलेक्ट्रिक केबल्सची देखभाल आणि मुख्य जलवाहिनीवर असणारी गळती काढणे ही कामे अत्यंत तातडीची आहेत. भविष्यात मोठा बिघाड टाळून अखंडित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी ही तात्पुरती कपात अनिवार्य असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. जलपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप पटनावर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी पाणी साठवून ठेवावे आणि पाण्याचा अपव्यय टाळून प्रशासनाला सहकार्य करावे.

भिवंडीतील पाणी कपातीमुळे प्रभावित होणारे प्रमुख भाग


या २४ तासांच्या तातडीच्या शटडाऊनचा परिणाम शहराच्या कानाकोपऱ्यात जाणवणार असून, प्रामुख्याने मध्य भिवंडीतील गजबजलेले विभाग जसे की तीनबत्ती, बाजारपेठ, ब्राह्मण आळी, कासार आळी, कोटर गेट, बर्फ गल्ली आणि काप आळी या परिसरांचा पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित राहील. तसेच कल्याण रोड व लगतच्या परिसरातील पटेल नगर, फरीद बाग, संगमपाडा, आदर्श पार्क, अजय नगर, गोकुळ नगर, इंदिरा नगर आणि साईनाथ सोसायटी या वस्त्यांनाही या पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे.

औद्योगिक आणि निवासीदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या नारपोली व अंजूर फाटा पट्ट्यातील देवजी नगर, विठ्ठल नगर, सोनाबाई कंपाउंड, फैजान कंपाउंड, मेहता कंपाउंड आणि भदवड या भागांतही पाण्यासाठी टंचाई जाणवेल. कामतघर आणि परिसरातील नागरिकांना, विशेषतः ओल्ड आणि न्यू ताडाली, भाग्य नगर, हनुमान नगर, जय आंबे सोसायटी, गणेश सिनेमा परिसर, नवजीवन कॉलनी आणि गौरीपाडा येथील रहिवाशांना या शटडाऊनचा मोठा फटका बसेल. याव्यतिरिक्त, निजामपुरा, इस्लामपुरा, म्हाडा कॉलनी, शास्त्री नगर, नेहरू नगर, मिल्लत नगर (भाग १, २ आणि ३), नवी वस्ती, कोडांजीवाडी, चव्हाण कॉलनी, अन्सारी मोहल्ला आणि टेंघर यांसारख्या इतर महत्त्वाच्या भागांमध्येही पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असल्याने महापालिकेने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.
Comments
Add Comment

Bullet Train : बुलेट ट्रेनचे राज्यातील काम जोरात, तंत्रज्ञांनी पालघर जिल्ह्यात केली कमाल

पालघर : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर आहे. केंद्रातल्या मोदी सरकार आणि राज्यातल्या फडणवीस

Surat Bus Accident : सुरतमध्ये महाराष्ट्राच्या दोन 'एसटी' बसचा अपघात

सुरत : गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील बारडोली जवळून जाणाऱ्या धुळे हायवेवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या

Bomb Threat : अहमदाबादमध्ये खळबळ! स्पोर्ट्स क्लब उडवण्याची धमकी; पत्रात दाऊद आणि लष्कर-ए-तोयबाचा उल्लेख

अहमदाबाद: गुजरातची राजधानी अहमदाबादमधून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. अहमदाबादच्या प्रसिद्ध स्पोर्टस क्लबला

EPFO : युपीआयद्वारे पीएफ धारकांचे पैसे काही सेकंदांत खात्यात मिळणार

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या ८ कोटींहून अधिक सदस्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा

KERALA : मान्सून केरळच्या उंबरठ्यावर

पुढील २४ ते ४८ तासांत धडकणार, महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचा 'यलो अलर्ट' पुणे : कडाक्याच्या उन्हाने हैराण

Trade : मे महिन्यात १४.५ कोटी टन मालवाहतुकीचे लक्ष्य साध्य

चेन्नई : विविध जागतिक आव्हानांना तोंड देत भारतीय रेल्वेने मे महिन्यात १४.५ कोटी टन मालवाहतूक करून आपल्या