Sanjay Kapoor Property Dispute : 'कपूर संपत्ती प्रकरण महाभारतालाही फिके पाडेल'

नवी दिल्ली : दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्या तब्बल ३० हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेवरून सुरू असलेला कौटुंबिक वाद आता सर्वोच्च न्यायालयात अधिकच गाजू लागला आहे. संजय कपूर यांच्या आई राणी कपूर आणि तिसरी पत्नी प्रिया कपूर यांच्यात आर. के. फॅमिली ट्रस्टच्या नियंत्रणावरून संघर्ष सुरू असून, या प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने “हे अत्यंत गुंतागुंतीचे कौटुंबिक प्रकरण महाभारतालाही फिके पाडेल,” अशी तीव्र टिप्पणी केली.



न्यायमूर्ती जे. बी. परडीवाला आणि न्यायमूर्ती उज्जल भुयान यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी झाली. राणी कपूर यांनी ट्रस्टच्या कारभारात हस्तक्षेप करण्यासाठी दाखल केलेली नवी याचिका न्यायालयाने ऐकण्यास सहमती दर्शवली. “आम्ही या प्रकरणाची चौकशी करू,” असे स्पष्ट करत न्यायालयाने या वादाची गंभीर दखल घेतली.



राणी कपूर यांच्या वकिलांनी न्यायालयात दावा केला की, सर्वोच्च न्यायालयाने ७ मे रोजी दिलेल्या आदेशाला बगल देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. न्यायालयाने याआधी या वादात तोडगा काढण्यासाठी माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांची मध्यस्थ म्हणून नियुक्ती केली होती. मात्र, त्यानंतर लगेचच रघुवंशी इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड कडून संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात आली, असा आरोप करण्यात आला.


१८ मे रोजी होणाऱ्या या बैठकीच्या अजेंड्यात दोन नवीन स्वतंत्र संचालकांची नियुक्ती आणि अधिकृत बँक स्वाक्षरीकर्त्यांमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव असल्याचे न्यायालयात सांगण्यात आले. हे सर्व सर्वोच्च न्यायालयाच्या मध्यस्थी प्रक्रियेच्या मूळ उद्देशालाच विरोध करणारे असल्याचा युक्तिवाद राणी कपूर यांच्या बाजूने करण्यात आला. दुसरीकडे, आरआयपीएलच्या वकिलांनी कंपनीने रिझर्व्ह बँकेच्या बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्यांसाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच पावले उचलल्याचे स्पष्टीकरण दिले. मात्र, राणी कपूर यांनी हा प्रयत्न म्हणजे कंपनीच्या गुंतवणुकीवर आणि बँक खात्यांवर नियंत्रण मिळवण्याचा डाव असल्याचा आरोप केला.

Comments
Add Comment

Digital India : आधार ॲपने 31 दशलक्ष डाऊनलोडचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली : आधार ॲपला लोकांमध्ये उत्तम प्रतिसाद मिळत असून हे ॲप सुरु झाल्यापासून अवघ्या पाच महिन्यांपेक्षा कमी

Lucknow Fire : लखनौत तीन मजली इमारतीला आग, १४ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांकडून मदत जाहीर

लखनौ : उत्तर प्रदेशातील लखनौच्या अलिगंजमधील पुरानिया परिसरात आज, सोमवारी दुपारी एक तीन मजली इमारतीला भीषण आग

Massive Fire : लखनौमध्ये कोचिंग सेंटरला भीषण आग; विद्यार्थ्यांचा जीव वाचवण्यासाठी इमारतीतून थरारक उड्या

लखनौ (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एका कोचिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीने मोठी खळबळ उडवून

West Bengal's Bold Budget : सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता २० टक्क्यांनी वाढला; विद्यार्थीनी आणि तरुणांसाठी मोठ्या घोषणा

कोलकाता : पश्चिम बंगालच्या अर्थव्यवस्थेला नवी गती देणारा आणि विविध घटकांना दिलासा देणारा राज्याचा अर्थसंकल्प

Monsoon havoc in Jharkhand : वीज पडून ८ जणांचा मृत्यू, क्रिकेट सामन्यादरम्यान एकाचा दुर्दैवी अंत

रांची (झारखंड) : झारखंडमध्ये नैऋत्य मान्सूनच्या आगमनासोबतच निसर्गाचे रौद्र रूप पाहायला मिळत आहे. गेल्या २४

८.६ लाख मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन तीन टँकर भारताकडे रवाना ऊर्जा पुरवठा सुरक्षेला मोठा दिलासा

नवी दिल्ली : भारताच्या सागरी आणि ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड घडली आहे. भारतीय ध्वज असलेले तीन